बापट नावाचा एक व्यक्ती स्वामीभक्त होता.स्वामींच्या दर्शनासाठी आलेले लोकांची राहायची सोय तो करायचा,जे प्रेमानी मिळायचे ते स्वीकारायचा.
त्याची उपजीविका नाक्यावर जकात वसूल करायची होती.पण हळू-हळू त्याला लाच खाऊन लोकांना कमी कर घेऊन सोडायची वृत्ती होते.
काही दिवसांनी त्याच्या मुलाला दम्याची बाधा होते,दिवस प्रती-दिवस रोग वाढत जातो.
एक दिवस त्याच्या बोलवण्याला हुसकावून वैद्य दुसऱ्या गावी पाटीलाच्या मुलाला पाह्यला जातात.
बापट विचार करतो की आपण श्रीमंत नाही म्हणुन आपल्या कडे न येता वैद्यबुवा पाटला कडे गेले.
मग तो श्रीमंत व्हायला काहीही करायचे ठरवतो.
भयंकर लाच खायला लागतो. स्वामी दर्शनाला आलेले जे लोकं त्याच्याकडे मुक्काम करायचे त्या लोकांना अपमानित करुन भयंकर पैशे उकळतो.
काहीही करू पण श्रीमंत होऊ आणी चांगल्यात चांगला वैद्य आणून आपल्या शरदचा आजार बरा करू.
एक-दोन दा अटक व्हायची पण वेळ येते पण शिपायाला लाच देउन तो सुटतो.
आजार बरा होत नाही, म्हणुन तो स्वामींकडे सांकडं घालायला जातो.
स्वामी त्याला वाल्या-कोळ्याची गोष्ठ सांगतात.
त्या गोष्टीचा बोध असा -"आपले पापांचे आपणच जवाबदार असतो, पत्नी आणी मुलांना पाप करुन प्राप्त धनानि कितीही सुख दिले तरी ते पापाचे वाटेकरू
नसतात. म्हणुन माणसांनी नितीपूर्वक सचोटीने वागावे.घरच्यांना सुख देण्या साठी अडलेल्या-नडलेल्या लोकांचा छळ करू नये."
पण बापटवर काही परिणाम न होता तो परततो.
स्वामींनी काही आश्वासन न दिल्या बद्दल तो नाखुश असतो.
एकदा त्याचे चार मित्र येतात. ते आप-आपल्या परिवाराची सर्व व्यवस्था लाऊन, 'वैराग्य पत्करून स्वामी चरणात शेवटचे आयुष्य काढू',असा विचार करुन येतात.
त्यांचा मुक्काम बापट कडेच असतो. त्यांच्या समोर पुन्हा बापट ला अटक व्हायची वेळ येते पण त्या मित्र पैकी एकाची मोठ्या अधिकार्याशी मैत्री असल्या मुळे बापट पुन्हा सुटतो.
पण बापट आपलं वर्तन सुधारत नाही.
ते चारी जण स्वामींकडे येऊन आपला मनोगत सांगतात. स्वामी चोळप्पाला सांगून त्यांची राहण्याची व्यवस्था करवतात.
बापटला पुन्हा अटक होते पण या वेळेला तो काहीही करुन सुटत नाही.
इकडे शरदचा रोग फार वाढतो. बापटची बायको मनात स्वामींची करुणा भाकते.
स्वामी चोळप्पा च्या हाती औषध पाठवतात.ते औषध खाऊन शरद अगदी खड-खडीत बरा होतो.
एका रात्री चारी मित्र झोपले असतांना, रात्री चोर त्यांच सामान चोरी करता..
ते सर्व विलाप करतात आणी दुसऱ्या दिवशी स्वामी कडे घाराणं घालतात.
स्वामी म्हणतात: " छान झालं ! सुंठेवाचून खोकला गेला!"
"अरे तुम्ही सर्वस्व त्याग करुन वैराग्य पत्करायला आले ना? मग जरासे ऐवज गेले तर का विलाप करतात?"
"अरे वैराग्य सोपे नाही, आधी ते मनात आले पाहिजे. मनात वैराग्य नसले आणी जर घर-दार सोडून वनात जाणार तर वनात दुसरे घर तयार होईल."
"आधी मनातून मोह,चिंता,लालसा हे सर्व शत्रू काढा, तेव्हा खंर वैराग्य येईल."
बापट ची बायको शरद ला घेऊन स्वामी कडे आभार व्यक्त करायला येते.अटक झालेला बापट सुद्धा शिपायाची गया-वया करुन येतो.
स्वामी म्हणतात:" अरे बापटा ! शरद तुझ्या वाईट कर्मांच्या फळा मुळेच आजारी पडला होता.
"आणी ते वाईट कर्म गुरु-भक्ती किंवा नामस्मरण करुन नष्ट करायचे सोडुन तु आणखी वाईट कर्मांचा भर घालत होता,"
"म्हणूनच शरद चा आजार वाढत जात होता."
"अरे पानं-पाचोळ्याला लागलेला विस्तव अजून पानं घालुन कसा शांत होणार, आणी तु नामस्मरणाचे पाणी घालायच्या जागी आणखी पानं घालुन
तो विस्तव वाढवत होता."
"आम्ही तुला वाळ्याची गोष्ठ सांगितली तरीही तुला काहीही बोध झालं नाही."
"अरे वाळ्यानी अफाट पाप केले पण त्याच्या तोडीचे नामस्मरण करुन ते नष्ट केले."
"पाप करतांना सहज होत गेले पण त्यांचा विमोड करतान त्याला कठोर तपस्या करावी लागली."
"आणी तपस्या पण साधी नाही, जेवढा वेळ पाप करण्यात गेला त्याच्या अनेक-पट वेळापर्यंत त्याला तपस्या करावी लागली."
"एवढा एकनिष्ठ झाला कि शरीरावर मुंग्यांनी वारूळ केले तरी त्याला कळले नाही."
बापटला आपली चूक कळते, तो पुन्हा पहिल्या सारखा सचोटीनी आणी निष्ठेनी वागण्याचं ठरवतो."
Monday, July 11, 2011
Sunday, July 3, 2011
(६८) पेढ्यांची सांखळी
माधव आणी मंगेश सक्खे भाऊ होते. मंगेश हा धाकटा होता. दोघेही स्वामी भक्त होते.
त्यांच्या घरी दत्ताच्या पादुका होत्या आणी दोन्ही भाऊ अगदी निष्ठेनी त्या पादुकांच पूजन करायचे.
पूजेच्या तैयारीची जवाबदारी दोघांच्या बायकांवर होती.मोठी जाऊ कामचुकार होती आपली जवाबदारी नीट पार पडायची नाही आणी
छोटी तिच्या ठरलेल्या दिवसा शिवाय पूजेची व्यवस्था करायला तैय्यार नसायची.
त्यांच्यात याच्यावरून भांडण होत राहायचे.
दोघी भावांना स्वामी सांगतात:- "अरे घराची व्यवस्था नीट ठेवणं हे पुरुषा पेक्ष्या स्त्रीच्या हाती जास्त असतं."
"पुरुषांनी स्त्रीच्या जास्त आहारी जाऊ नये. जे योग्य आहे तेच करावं."
लहान मुलांच्या भांडणावरून पुन्हा दोन्ही जावांच भांडण होतं. मोठी जाऊ छोटीच्या मुलावर हात उगारते.
मंगेश विरोध करतो आणी त्यावरून दोघा भावात भांडण होतात.
काही दिवसांनी माधवला त्याचा मित्र श्याम स्वामींचा प्रसाद म्हणुन पेढा देतो आणी सांगतो -
"अशेच २१ जणांना पेढे वाटायचे आणी
ज्याला पेढा मिळाला त्यांनी पण २१ लोकांना पेढे वाटायचे, पेढ्याची सांखळी तुटता कामा नये.
जो असं करेल त्यावर स्वामी कृपा करतील आणी
जो नाही करणार त्याच्यावर स्वामींचा कोप होईल"
.माधव पेढे वाटतो.
मुळात दोघा भावात आपसात फार प्रेम असतं या मुळे दोघांनाही या गोष्ठीची खंत वाटतो.ते दोघे एक-मेकाची
क्षमा मागून समेट करतात. मंगेश ला एकविसावा पेढा देउन माधव त्याला साखळी कायम ठेव अस सांगतो.
पण मंगेश खऱ्या अर्थानी स्वामी भक्त होता तो अश्या अंध-विश्वासांना मानत नव्हता.
पेढे नाही वाटले तर स्वामी कोपतील, ही एक भ्रामक कल्पना आहे असं म्हणुन तो आपल्या मोठ्या भावाला सांगतो पण माधवला
पटत नाही.
पुन्हा एकदा बायकांच्या भांडणावरून दोघा भावात विवाद होतो.
पुन्हा समेट करतांना माधव मंगेश ला सांगतो कि तु पेढ्याची सांखळी मोडली म्हणून आपल्यात भांडण झालं
तरीही मंगेश चा विश्वास बसत नाही.
एकदा तर हद्दच होते. छोट्या जाऊबाईनी केलेल्या पापडा वर मोठी जाऊ घेरी आल्याच निमित्त करुन पाण्याचा घडा पाडते.
सर्व पापड खराब होतात.या वेळेला भांडण फार उग्र होउन शेवटी दोघा भावांची वेगळं व्हायची वेळ येते.
मंगेश वेगळा जायला निघतो पण दत्त-पादुका बरोबर न्यायला जातो ,माधव सांगतो कि पादुका मोठ्या भावा कडेच राहणार.
मंगेश ऐकत नाही आणी पादुका उचलायला जातो, यावरून माधव त्याला बेदम मारून हकलून देतो.
मंगेश स्वामींकडे जाऊन आपलं घाराणं सांगतो.
मग मंगेश एक क्रूर वाक्य म्हणतो कि जर माधव आणी त्याचा मुलगा मेले तर पादुका आपल्याला मिळतील.
स्वामी थोडसं रागवून त्याला साम्झावतात- "अरे काय पादुका-पादुका करत आहे? अरे देव काय फक्त पादुकात असतो का?"
"अरे जली,स्थळी,काष्ठी पाषाणी व सर्व जीवात देव असतो."
"देव सर्वत्र व्याप्त आहे- देव नाही असं कोणचच ठिकाण नाही."
"अरे देवाची निर्गुण उपासना कर,पादुका तर उपासना करण्यात सहायता करतात पण पादुका नसल्या तर उपासनाच करता येत नाही
असं मानणं चुकीचं आहे.त्या पादुकांसाठी आपल्या भावा आणी पुतण्याची मृत्यु इच्छितो, काही वाटतं कि नाही तुला?"
मंगेश मान खाली घालुन परततो.
इकडे चोळप्पा स्वामींनी काहीही सांगितलेलं कार्य स्वता न करता राघवच्या हाती करवून घेत होता.
एका शिष्यांनी विचारल्यावर स्वामी सांगतात कि चोळप्पा हा पूर्व आयुष्यात गडगंज श्रीमंत असल्यानी त्याच्यात ही वृत्ती आहे पण
त्याच्या आध्यात्मिक प्रगतीत बाधक ही गोष्ठ आम्ही दुर करू.
एकदा असच स्वामींनी दिलेलं कार्य चोळप्पा राघव ला सांगतो.
स्वामी रागावतात:- "अरे चोळ्या स्वता होऊन आमची सेवा करण्याच तु पत्करलं आहे ना? मग आम्ही दिलेले कार्य
करायला तुला पड-सेवेकरी कशाला पाहिजे?"
" 'अरे शिष्याला "दीर्घदण्डं नमस्कृत्य निर्लज्जो गुरुसन्निधौ' या वृत्तींनी गुरु कडे वावरलं पाहिजे."
(जगाची परवा न करता निर्लज्य होऊन शिष्यांनी गुरुला दंडवत नमस्कार केलं पाहिजे)
"अरे हे कार्य आमी तुमचा अहं भाव जायला करवतो,जो तुमच्या आध्यात्मिक प्रगतीत बाधक आहे."
"वरना हमे किसी से कोई काम करवाने की जरुरत नही है."
चोळप्पा चूक मान्य करतात.
तिकडे घरी जाऊन मंगेशला कडकडून ताप येतो. काहीही केल्या ताप उतरत नाही. मंगेश ला वाटतं कि पेढ्यांची साखळी
मोडल्या मुळे हे सर्व झालं असावं.
घरी पूजा करत असतांना माधव चा एक हात निकामी होतो.
दुसऱ्या दिवशी आप-आपल्या रोगापासून हैराण होऊन दोघे भाऊ स्वामींकडे येतात.
मंगेश म्हणतो-" स्वामी पेढ्यांची सांखळी तुटल्या मुळे माझ्यावर त्रासांचा मारा होत आहे".
माधव पण आपल्या समस्येसाठी सांखळी तुटायला कारणीभूत ठरवतो.
स्वामी जाम भडकतात:-" महा मूर्खांनो ! सांखळी तुटल्यानी काही झालं नाही. तुम्ही सर्व आपल्या कर्मामुळे दुखी झाला आहे."
"मंगेश तु पादुकांसाठी आपल्या भाउ आणी पुतण्याची मृत्यु इच्छिली."
"आणी माधव तु आपल्या पातळयंत्री आणी कामचुकार बायकोच्या सांगण्यात येऊन आपल्या भावाशी भांडण केले,
त्याला बेदम मारलं."
"अरे सांखळीचा आध्यात्मिक दशहतवाद कौन पसरवतो याचा विचार का नाही केला?
"पेढे खपल्या मुळे कुणाला फायदा होणार एवढी छोटीशी गोष्ठ तुम्ही सर्वांच्या लक्ष्यात कशी नाही आली?"
दोन्ही भाऊ आपली चूक मान्य करतात.
स्वामी म्हणतात:-"माधवा,आपल्या छोट्या भावाला प्रेमानी कुशीत घे."
माधव म्हणतो :"-स्वामी पण माझा हात निकामी झाला आहे."
स्वामींच्या कृपादृष्टीनी माधव चा हात बरा होतो, तो मंगेशला कुशीत घेतो,
आणी चटकन ओरडतो-"अरे मंगेश तुझा ताप पूर्णपणे उतरला आहे."
स्वामी कृपेनी दोघे भाऊ पूर्णपणे निरोगी होतात.
आता मागे झालेल्या चुकांना विसरून ते पुन्हा गुणा-गोविंदांनी एकत्र रहाण्याचं ठरवतात.
त्यांच्या घरी दत्ताच्या पादुका होत्या आणी दोन्ही भाऊ अगदी निष्ठेनी त्या पादुकांच पूजन करायचे.
पूजेच्या तैयारीची जवाबदारी दोघांच्या बायकांवर होती.मोठी जाऊ कामचुकार होती आपली जवाबदारी नीट पार पडायची नाही आणी
छोटी तिच्या ठरलेल्या दिवसा शिवाय पूजेची व्यवस्था करायला तैय्यार नसायची.
त्यांच्यात याच्यावरून भांडण होत राहायचे.
दोघी भावांना स्वामी सांगतात:- "अरे घराची व्यवस्था नीट ठेवणं हे पुरुषा पेक्ष्या स्त्रीच्या हाती जास्त असतं."
"पुरुषांनी स्त्रीच्या जास्त आहारी जाऊ नये. जे योग्य आहे तेच करावं."
लहान मुलांच्या भांडणावरून पुन्हा दोन्ही जावांच भांडण होतं. मोठी जाऊ छोटीच्या मुलावर हात उगारते.
मंगेश विरोध करतो आणी त्यावरून दोघा भावात भांडण होतात.
काही दिवसांनी माधवला त्याचा मित्र श्याम स्वामींचा प्रसाद म्हणुन पेढा देतो आणी सांगतो -
"अशेच २१ जणांना पेढे वाटायचे आणी
ज्याला पेढा मिळाला त्यांनी पण २१ लोकांना पेढे वाटायचे, पेढ्याची सांखळी तुटता कामा नये.
जो असं करेल त्यावर स्वामी कृपा करतील आणी
जो नाही करणार त्याच्यावर स्वामींचा कोप होईल"
.माधव पेढे वाटतो.
मुळात दोघा भावात आपसात फार प्रेम असतं या मुळे दोघांनाही या गोष्ठीची खंत वाटतो.ते दोघे एक-मेकाची
क्षमा मागून समेट करतात. मंगेश ला एकविसावा पेढा देउन माधव त्याला साखळी कायम ठेव अस सांगतो.
पण मंगेश खऱ्या अर्थानी स्वामी भक्त होता तो अश्या अंध-विश्वासांना मानत नव्हता.
पेढे नाही वाटले तर स्वामी कोपतील, ही एक भ्रामक कल्पना आहे असं म्हणुन तो आपल्या मोठ्या भावाला सांगतो पण माधवला
पटत नाही.
पुन्हा एकदा बायकांच्या भांडणावरून दोघा भावात विवाद होतो.
पुन्हा समेट करतांना माधव मंगेश ला सांगतो कि तु पेढ्याची सांखळी मोडली म्हणून आपल्यात भांडण झालं
तरीही मंगेश चा विश्वास बसत नाही.
एकदा तर हद्दच होते. छोट्या जाऊबाईनी केलेल्या पापडा वर मोठी जाऊ घेरी आल्याच निमित्त करुन पाण्याचा घडा पाडते.
सर्व पापड खराब होतात.या वेळेला भांडण फार उग्र होउन शेवटी दोघा भावांची वेगळं व्हायची वेळ येते.
मंगेश वेगळा जायला निघतो पण दत्त-पादुका बरोबर न्यायला जातो ,माधव सांगतो कि पादुका मोठ्या भावा कडेच राहणार.
मंगेश ऐकत नाही आणी पादुका उचलायला जातो, यावरून माधव त्याला बेदम मारून हकलून देतो.
मंगेश स्वामींकडे जाऊन आपलं घाराणं सांगतो.
मग मंगेश एक क्रूर वाक्य म्हणतो कि जर माधव आणी त्याचा मुलगा मेले तर पादुका आपल्याला मिळतील.
स्वामी थोडसं रागवून त्याला साम्झावतात- "अरे काय पादुका-पादुका करत आहे? अरे देव काय फक्त पादुकात असतो का?"
"अरे जली,स्थळी,काष्ठी पाषाणी व सर्व जीवात देव असतो."
"देव सर्वत्र व्याप्त आहे- देव नाही असं कोणचच ठिकाण नाही."
"अरे देवाची निर्गुण उपासना कर,पादुका तर उपासना करण्यात सहायता करतात पण पादुका नसल्या तर उपासनाच करता येत नाही
असं मानणं चुकीचं आहे.त्या पादुकांसाठी आपल्या भावा आणी पुतण्याची मृत्यु इच्छितो, काही वाटतं कि नाही तुला?"
मंगेश मान खाली घालुन परततो.
इकडे चोळप्पा स्वामींनी काहीही सांगितलेलं कार्य स्वता न करता राघवच्या हाती करवून घेत होता.
एका शिष्यांनी विचारल्यावर स्वामी सांगतात कि चोळप्पा हा पूर्व आयुष्यात गडगंज श्रीमंत असल्यानी त्याच्यात ही वृत्ती आहे पण
त्याच्या आध्यात्मिक प्रगतीत बाधक ही गोष्ठ आम्ही दुर करू.
एकदा असच स्वामींनी दिलेलं कार्य चोळप्पा राघव ला सांगतो.
स्वामी रागावतात:- "अरे चोळ्या स्वता होऊन आमची सेवा करण्याच तु पत्करलं आहे ना? मग आम्ही दिलेले कार्य
करायला तुला पड-सेवेकरी कशाला पाहिजे?"
" 'अरे शिष्याला "दीर्घदण्डं नमस्कृत्य निर्लज्जो गुरुसन्निधौ' या वृत्तींनी गुरु कडे वावरलं पाहिजे."
(जगाची परवा न करता निर्लज्य होऊन शिष्यांनी गुरुला दंडवत नमस्कार केलं पाहिजे)
"अरे हे कार्य आमी तुमचा अहं भाव जायला करवतो,जो तुमच्या आध्यात्मिक प्रगतीत बाधक आहे."
"वरना हमे किसी से कोई काम करवाने की जरुरत नही है."
चोळप्पा चूक मान्य करतात.
तिकडे घरी जाऊन मंगेशला कडकडून ताप येतो. काहीही केल्या ताप उतरत नाही. मंगेश ला वाटतं कि पेढ्यांची साखळी
मोडल्या मुळे हे सर्व झालं असावं.
घरी पूजा करत असतांना माधव चा एक हात निकामी होतो.
दुसऱ्या दिवशी आप-आपल्या रोगापासून हैराण होऊन दोघे भाऊ स्वामींकडे येतात.
मंगेश म्हणतो-" स्वामी पेढ्यांची सांखळी तुटल्या मुळे माझ्यावर त्रासांचा मारा होत आहे".
माधव पण आपल्या समस्येसाठी सांखळी तुटायला कारणीभूत ठरवतो.
स्वामी जाम भडकतात:-" महा मूर्खांनो ! सांखळी तुटल्यानी काही झालं नाही. तुम्ही सर्व आपल्या कर्मामुळे दुखी झाला आहे."
"मंगेश तु पादुकांसाठी आपल्या भाउ आणी पुतण्याची मृत्यु इच्छिली."
"आणी माधव तु आपल्या पातळयंत्री आणी कामचुकार बायकोच्या सांगण्यात येऊन आपल्या भावाशी भांडण केले,
त्याला बेदम मारलं."
"अरे सांखळीचा आध्यात्मिक दशहतवाद कौन पसरवतो याचा विचार का नाही केला?
"पेढे खपल्या मुळे कुणाला फायदा होणार एवढी छोटीशी गोष्ठ तुम्ही सर्वांच्या लक्ष्यात कशी नाही आली?"
दोन्ही भाऊ आपली चूक मान्य करतात.
स्वामी म्हणतात:-"माधवा,आपल्या छोट्या भावाला प्रेमानी कुशीत घे."
माधव म्हणतो :"-स्वामी पण माझा हात निकामी झाला आहे."
स्वामींच्या कृपादृष्टीनी माधव चा हात बरा होतो, तो मंगेशला कुशीत घेतो,
आणी चटकन ओरडतो-"अरे मंगेश तुझा ताप पूर्णपणे उतरला आहे."
स्वामी कृपेनी दोघे भाऊ पूर्णपणे निरोगी होतात.
आता मागे झालेल्या चुकांना विसरून ते पुन्हा गुणा-गोविंदांनी एकत्र रहाण्याचं ठरवतात.
Sunday, June 26, 2011
स्वामी हाच आधार
महारुद्रराव एक श्रीमंत व्यक्ती होता. त्याची मुलगी राधा उपवर झाली असून तिचं लग्न जमत नव्हते.
श्रीमन्ताची मुलगी आपल्या कडे सुखानी नांदणार नाही, असं म्हणुन गरीब लोकं मागणी घालत नव्हते.
श्रीमंत स्थळ यायचे पण अफाट हुंडा मागायचे, जे महारुद्ररावांच्या तत्वा विरुद्द्ध होतं.
शेवटी ते स्वामींचं स्मरण करुन पुन्हा स्थळासाठी प्रयत्न सुरु करायचा निश्चय करतात.
स्वामी कृपेनी काही दिवसांनी घर बसल्या सर्वप्रकारे योग्य असं स्थळ येऊन राधेच लग्न जमतं.
महारुद्ररावांच्या आनंदाचा पार नाही राहत, ते स्वामींच्या मठात सहस्त्र भोजन घालायचं ठरवतात.
सर्व स्वामींकडे येतात.
भेटल्या बरोबर स्वामी महारुद्राला म्हणतात :" सावधगिरी बाळगा, हलगर्जीपणा करू नका."
आनंदाच्या भरात महारुद्रराव, स्वामी वचनाला फारसे महत्व देत नाही.
मग काय सहस्त्र भोजन होतं, सर्व लोकं जेवण करुन झोपतात.
अर्ध्या रात्री स्वामी ओरडतात:-"अरे झोपला काय आहे! चोर येऊन सर्व लुटून गेले आहे."
महारुद्रराव पाहतात तर त्यांचं सर्व सामान चोरी गेलं होतं. राधेच्या लग्नासाठी केलेले सर्व दागिने पण त्यात होते.
महारुद्रराव स्वामींना वैतागून म्हणतात:-"स्वामी चोर आले तेव्हाच का नाही हो सांगितलं?"
स्वामी म्हणतात:-"अरे आम्ही काय पहारेकरी आहो का? आम्ही पहिलेच सांगितले होते, सावध राहा पण तुम्ही
गाफील राहिला."
महारुद्ररावला आपली चूक कळते तो स्वामींची करुणा भाकतो.
स्वामी म्हणतात:- "५ चोर होते. शोध त्यांना "
कोण ते विचारल्यावर स्वामी म्हणतात कि आमच्या पोरांना विचारा.
महारुद्रराव विचार करतात कि स्वामींचे पोरं कोण?
चोळप्पा विचार करतात कि शरीरातले चोर म्हणजे चित्त आणी मन ,पण त्यांचा बंदोबस्त करायला विवेक पाहिजे,
स्वामी ज्यांना विवेकाची प्रतीमुर्ती म्हणतात ते फसलगावचे भगवान देशपांडे, हेच स्वामींचे पुत्र असावे.
महारुद्रराव आणी चोळप्पा त्यांच्या कडे जातात.
देशपांडे मदत करायला तय्यार पण होतात पण म्हणतात कि हे काम मी एकटा नाही करू शकत.
मला कुणाची मदत पाहिजे.
चोळप्पा म्हणतात कि आपल्याला आता स्वामींच्या दुसऱ्या पोराला शोधले पाहिजे.
पण तो दुसरा पोरगा कोण असावा?
तितक्यात रस्त्यात जाताना दोन व्यक्ती बोलत असतात.
एक व्यक्ती दुसऱ्याला एका कहाणीचा बोध सांगत असतो- " अरे विवेकाला बुद्द्धी ची जोड लागते."
चोळप्पा सर्वाना म्हणतात आता बुद्धियुक्त कोण व्यक्ती स्वामींचा पोर असावा?
तितक्यात देशपांडे म्हणतात- "माझा एक मित्र आहे, गावाचा पाटील आहे बुद्धी आणी शक्तीनी युक्त आहे आणी तो अनन्य स्वामी भक्त आहे."
सर्व जण पाटील यांच्या घरी जातात. पाटीलांना जेव्हा कळतं कि पाच चोर होते , तेव्हा ते सर्वांना घेऊन चोरांच्या एका
ठिकाणाची झडती घेतात.
पण तिथे फक्त दोन व्यक्ती सापडतात.
त्यांच्या बरोबर असलेला जमादार जेव्हा त्यांना दम देतो तेव्हा चोरं त्यांना सांगतात कि बाकीचे तीन बाहेर गेलेले आहे.
चोरांना शिक्षेत कमीचं लालूच देउन पाटील त्यांना बाकीच्या तिघांना पकडण्या करता मदत मागतात.
दोघे चोर हमी देतात. मग काय ठरवलेल्या जागेवर ३ चोर आपल्या साथींना भेटायला येतात आणी पकडले जातात.
महारुद्रराव यांना राधेसाठी केलेले दागिने मिळतात.
ते स्वामींकडे येऊन म्हणतात:-"सर्व लोकं आम्हाला विचारायचे कि आम्ही स्वामी भक्ती का करतो?"
कारण त्यांच्या मते सर्व सुख असणाऱ्या व्यक्तीला स्वामी उपासनेची काय गरज असावी."
"तेव्हा मी त्यांना उत्तर देत होतो कि स्वामी भक्तिनी समाधान मिळतं."
"पण आता मला जाणीव झाली कि स्वामी भक्तिनी आधार पण मिळतो."
"काही कार्य करतांना जेव्हा माणसाला विकल्प येतात, मन कामापासून परावृत्त करतं तेव्हा सद्गुरुचं नाव त्याला धीर देतं आणी तो
कार्य करायला तैयार होतो."
"सद्गुरू, हे तत्व माणसाचं भयं नष्ट करुन त्याला कार्य करायला प्रेरीत करतं."
स्वामी स्मित मुद्रेनी म्हणतात: " भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे "
श्रीमन्ताची मुलगी आपल्या कडे सुखानी नांदणार नाही, असं म्हणुन गरीब लोकं मागणी घालत नव्हते.
श्रीमंत स्थळ यायचे पण अफाट हुंडा मागायचे, जे महारुद्ररावांच्या तत्वा विरुद्द्ध होतं.
शेवटी ते स्वामींचं स्मरण करुन पुन्हा स्थळासाठी प्रयत्न सुरु करायचा निश्चय करतात.
स्वामी कृपेनी काही दिवसांनी घर बसल्या सर्वप्रकारे योग्य असं स्थळ येऊन राधेच लग्न जमतं.
महारुद्ररावांच्या आनंदाचा पार नाही राहत, ते स्वामींच्या मठात सहस्त्र भोजन घालायचं ठरवतात.
सर्व स्वामींकडे येतात.
भेटल्या बरोबर स्वामी महारुद्राला म्हणतात :" सावधगिरी बाळगा, हलगर्जीपणा करू नका."
आनंदाच्या भरात महारुद्रराव, स्वामी वचनाला फारसे महत्व देत नाही.
मग काय सहस्त्र भोजन होतं, सर्व लोकं जेवण करुन झोपतात.
अर्ध्या रात्री स्वामी ओरडतात:-"अरे झोपला काय आहे! चोर येऊन सर्व लुटून गेले आहे."
महारुद्रराव पाहतात तर त्यांचं सर्व सामान चोरी गेलं होतं. राधेच्या लग्नासाठी केलेले सर्व दागिने पण त्यात होते.
महारुद्रराव स्वामींना वैतागून म्हणतात:-"स्वामी चोर आले तेव्हाच का नाही हो सांगितलं?"
स्वामी म्हणतात:-"अरे आम्ही काय पहारेकरी आहो का? आम्ही पहिलेच सांगितले होते, सावध राहा पण तुम्ही
गाफील राहिला."
महारुद्ररावला आपली चूक कळते तो स्वामींची करुणा भाकतो.
स्वामी म्हणतात:- "५ चोर होते. शोध त्यांना "
कोण ते विचारल्यावर स्वामी म्हणतात कि आमच्या पोरांना विचारा.
महारुद्रराव विचार करतात कि स्वामींचे पोरं कोण?
चोळप्पा विचार करतात कि शरीरातले चोर म्हणजे चित्त आणी मन ,पण त्यांचा बंदोबस्त करायला विवेक पाहिजे,
स्वामी ज्यांना विवेकाची प्रतीमुर्ती म्हणतात ते फसलगावचे भगवान देशपांडे, हेच स्वामींचे पुत्र असावे.
महारुद्रराव आणी चोळप्पा त्यांच्या कडे जातात.
देशपांडे मदत करायला तय्यार पण होतात पण म्हणतात कि हे काम मी एकटा नाही करू शकत.
मला कुणाची मदत पाहिजे.
चोळप्पा म्हणतात कि आपल्याला आता स्वामींच्या दुसऱ्या पोराला शोधले पाहिजे.
पण तो दुसरा पोरगा कोण असावा?
तितक्यात रस्त्यात जाताना दोन व्यक्ती बोलत असतात.
एक व्यक्ती दुसऱ्याला एका कहाणीचा बोध सांगत असतो- " अरे विवेकाला बुद्द्धी ची जोड लागते."
चोळप्पा सर्वाना म्हणतात आता बुद्धियुक्त कोण व्यक्ती स्वामींचा पोर असावा?
तितक्यात देशपांडे म्हणतात- "माझा एक मित्र आहे, गावाचा पाटील आहे बुद्धी आणी शक्तीनी युक्त आहे आणी तो अनन्य स्वामी भक्त आहे."
सर्व जण पाटील यांच्या घरी जातात. पाटीलांना जेव्हा कळतं कि पाच चोर होते , तेव्हा ते सर्वांना घेऊन चोरांच्या एका
ठिकाणाची झडती घेतात.
पण तिथे फक्त दोन व्यक्ती सापडतात.
त्यांच्या बरोबर असलेला जमादार जेव्हा त्यांना दम देतो तेव्हा चोरं त्यांना सांगतात कि बाकीचे तीन बाहेर गेलेले आहे.
चोरांना शिक्षेत कमीचं लालूच देउन पाटील त्यांना बाकीच्या तिघांना पकडण्या करता मदत मागतात.
दोघे चोर हमी देतात. मग काय ठरवलेल्या जागेवर ३ चोर आपल्या साथींना भेटायला येतात आणी पकडले जातात.
महारुद्रराव यांना राधेसाठी केलेले दागिने मिळतात.
ते स्वामींकडे येऊन म्हणतात:-"सर्व लोकं आम्हाला विचारायचे कि आम्ही स्वामी भक्ती का करतो?"
कारण त्यांच्या मते सर्व सुख असणाऱ्या व्यक्तीला स्वामी उपासनेची काय गरज असावी."
"तेव्हा मी त्यांना उत्तर देत होतो कि स्वामी भक्तिनी समाधान मिळतं."
"पण आता मला जाणीव झाली कि स्वामी भक्तिनी आधार पण मिळतो."
"काही कार्य करतांना जेव्हा माणसाला विकल्प येतात, मन कामापासून परावृत्त करतं तेव्हा सद्गुरुचं नाव त्याला धीर देतं आणी तो
कार्य करायला तैयार होतो."
"सद्गुरू, हे तत्व माणसाचं भयं नष्ट करुन त्याला कार्य करायला प्रेरीत करतं."
स्वामी स्मित मुद्रेनी म्हणतात: " भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे "
Subscribe to:
Posts (Atom)