Sunday, July 24, 2011

(71) दानात अहंकार नसावा

गोपाळ शेट नावाचा एक व्यक्ती दानशूर होता. तो गोर-गरीबांना फार मदत करायचा पण आपलं नाव-लोकिक व्हावे ह्या इच्छेनी .
लोकांच्या तोंडातून आपला उदो-उदो ऐकायला त्याला फार आवडायचं.
एकदा स्वामींच्या मनात त्याचा गर्व दुर करायचा विचार येतो, स्वामी चोळप्पाला घेऊन गोपाळशेट च्या गावाला निघतात.
रस्त्यात त्यांना एक व्यक्ती जीव द्यायला जाताना दिसतो.
स्वामी त्याला अडवतात तेव्हा तो आपले दुःख सांगतो.
तो व्यक्ती पत्नी-वियोगानी फार दुखी होता.
सर्वांचा सुखी संसार आहे पण आपला नाही, या भावनेनी तो सदैव व्याकुळ असायचा.
आणी त्या त्रासाला गांजून तो मृत्यु पत्करायला जात होता.
स्वामी त्याला बरोबर घेऊन पुढे प्रवास करतात.
पुढे कर्जापाई सावकाराच्या जाचणी मुळे गांजलेला व्यक्ती जीव देताना सापडतो.
स्वामी त्यालाही बरोबर घेऊन पुढे प्रवास करतात.
त्या दोघांना घेऊन ते गोपाळ शेट च्या घरी येतात.
स्वामी म्हणतात: "गोपाळ शेट तुमचं दानशूर असं नाव-लोकिक  ऐकुन आम्ही तुमच्या कडे या लोकांना घेऊन आलो आहे."
"आम्हाला आशा आहे तुम्ही यांच्या दुखाला दुर करणार."
कर्जानी वैतागलेला व्यक्तीला गोपाळ शेट धनाचीमोठी पोटली देतात.
पत्नी वियोगानी गांजलेल्या व्यक्तीला लग्नासाठी त्याच्या योग्य अशी नवरी पण गोपाळ शेट गाठून देतात,
त्याशिवाय धनाची एक छोटी पोटली पण देतात.
दोन्ही व्यक्तींच्या आनंदाचा पार राहत नाही.
मग गोपाळशेट स्वामींना विचारतात की त्यांना काय अपेक्षा आहे.
स्वामी अगदी फटकळ उत्तर देतात- "आम्हाला जे पाहिजे ते वर बसलेला आमचा बाप देतो."
"आणी जर त्याची इच्छा नसेल तर जगात कोणीही काहीही दिले तरी काहीही फायदा होणार नाही."
गोपाळशेट ला अनावर राग येतो पण तो दात-ओठ चावुन राहतो.
सर्व लोकं गोपाळ शेट कडून परततात.
रस्त्यात त्यातला एक व्यक्ती चोळप्पाला आपली धनाची पोटली सांभाळायला देतो, पण चोळप्पाच्या हाती आधीच एक पोटली
असल्यानी स्वामी खुद्द पोटली हातात घेऊन चालतात.
इकडे गोपाळ शेट आपल्या माणसाला सांगतो की ज्या व्यक्तीच्या हातात काही पोटली नाही त्याला धरुन आण.
गोपाळशेट ला स्वामींना धडा शिकवायचा होता,
म्हणे खूब देव-देव करतो जेव्हा अन्न-पाण्या शिवाय तळघरात डांबून ठेवणार तेव्हा बुद्धी ताळ्यावर येईल.
शेट चा माणूस जेव्हा येतो तेव्हा स्वामींच्या हाती धनाची पोटली असल्यानी त्यांना धरत नाही
आणी उलट ज्याची ती पोटली होती त्याच्या कडे काही नसल्यानी
त्यालाच धरुन आणतो.
गोपाळशेट ला पाहिजे तो व्यक्ती नसल्यानी राग येतो.
गोपाळ शेट त्या माणसाला डांबून ठेवतात आन्ही पुन्हा आपल्या माणसाला तीच
कामगिरी करायला पाठवतात.
योगा-योगानी पत्नी- वियोगानी दुखी झालेला माणूस लघु-शंकेला जायचं म्हणुन आपल्या हातातली पोटली स्वामींना देउन जायला निघतो.
तितक्यात गोपाळ शेट चा माणूस येऊन त्याला धरुन नेतो.
या वेळेला पण गोपाळ शेट चा बेत फसतो.
गोपाळ शेट बारकाईनी  विचार करतो की ज्या माणसांनी आपल्या कडून काहीही घेतले नाही त्यांना आपण पकडू शकलो नाही
आणी उलट ज्यांना पकाडायचे नव्हते ते पकडले गेले.
गोपाळ शेटला "हरी इच्छा बलीअसी" चा सुक्तीचा खरा अर्थ काय तो कळतो.
गोपाळ शेट स्वामींच्या शरणी येतो.
चोळप्पाला काय चालले आहे तेच कळत नाही.
स्वामी म्हणतात: "अरे व्यक्ती कितीही समर्थ असला तरी ज्याच्यावर ईश्वराची सावली असते त्याचे काहीही
वाईट करू शकत नाही. ही गोष्ठ गोपाळ शेटला आता कळली आहे."
"त्या दोन व्यक्तींच्या जीवनात आतापर्यंत जे घडले ते त्यांच्या कर्मा मुळे प्राप्त झालेल्या प्रारब्धा मुळे झाले."
गोपाळशेट प्रांजळ पणे हात जोडून उभा असतांना स्वामी म्हणतात:" अरे त्या निर्दोष लोकांना सोड!"
गोपाळ शेट मान्य करतो.
"लक्ष्यात घे, दान करणे चांगले आहे, पण दानाचा अहंकार नसावा."
"एका हातानी केलेले दान दुसऱ्या हाताला ही कळायला नको"
"दान करुन नाव-लोकिकाची अपेक्षा करणे हे दान नसुन व्यापार झाला."
गोपाळ शेटला चूक पटून तो पुढे नाव-लोकीकाची अपेक्षा न करायचं ठरवतो.

Sunday, July 17, 2011

माणसाची पारख

नरेंद्र महाराजांना एक अंगरक्षक पाहिजे होता पण पाहिजे तसा मिळत नव्हता.
त्यांच्या राज्यात एक वीर नावाचा व्यक्ती होता. नावा सारखाच तो खरा वीर होता पण दारिद्रानी गांजला होता.
या साठी तो नरेंद्र राजा कडे नौकरी मागायला जातो. रस्त्यात एक गुंड एक माणसाला लुटत होता,वीर प्राणांवर खेळून
त्या माणसाला वाचवतो.
राजाचे मुनीम हे पाहून त्याला राज्या कडे घेऊन येतात.
राज्याच्या अंगाराक्षकाचे काम करायला वीर तैयार होतो पण दिवसाला ५०० मोहोरा मागतो, एवढी जास्त रक्कम ऐकुन राजा
विचार करू असं म्हणुन त्याला परतावतो.
स्वामींशी भेट होता ते राजाला म्हणतात कि काही दिवस वीर ला ठेऊन परीक्षा पहा, उतीर्ण झालं तर नियुक्त करा, आम्ही स्वत:
परीक्षेत तुझी मदत करू.
वीरची नियुक्ती होते,तो आपलं काम योग्य पणे करतो.
एक दिवस राजाला एक स्त्री चे रुदन ऐकू येते. तो वीर ला कोण रडते आहे, हा तपास करायला सांगतो.
वीर शोध घेतो, ते त्याला एक सुंदर व कुलीन स्त्री रडतांना दिसते.
विचारल्यावर ती सांगते कि मी राज्याची राजलक्ष्मी आहे.पण आता राजाला सोडुन जाणार आहे.
आता राजा दरिद्री होणार.मागोमाग राजा येऊन गवाक्षातून हे एकत असतो.
वीर उपाय विचारतो.
राजलक्ष्मी म्हणते कि तुझ्या ३२ शुभ लक्षणानी युक्त मुलाची बळी दिली तर मी इथे थांबीन.
वीर घरी जाऊन संकल्प सोडुन विष पाजून आपल्या मुलाचा बळी देतो.
निपुत्रिक होऊन कसे जगायचे म्हणुन तो स्वत: ही विष पिऊन जीव देतो.
पती आणी पुत्र गेल्यावर त्याची पत्नी पण विष पिऊन प्राण त्यागते.
राजा पर्यंत गोष्ट येते, आपण राजा असून प्रजेचे रक्षण करू शकलो नाही याचा त्याला खंत वाटतो.
तो स्वताच्या तलवारींनी आपलीच मुंडकी छाटायला जातो पण तलवार मानेच्या एक बोटं पर्यंत येऊनच थांबते.
तितक्यात स्वामी प्रगट होतात.
स्वामी म्हणतात:" राजा तु कनवाळू आहे, आपल्या मुळे प्रजेचा जीव गेला याची तुला खंत वाटून तु प्राण द्यायला गेला.
राजा असाच असावा.आम्ही तुझ्या वर प्रसन्न आहो."
राजा स्वामींकडे वीर च्या परिवाराचे जीवन मागतो. स्वमिकृपेनी वीर परिवारा सकट जिवंत होतो.
मग स्वामी राजलक्ष्मी चे रूप दाखवून त्यांना जाणीव करुन देतात कि ही त्यांचीच रचना होती.
वीर आणी नरेंद्र राजा दोन्ही परीक्षेत उतीर्ण होतात.
स्वामी नरेंद्र राजाला म्हणतात: "उत्तम माणसांना ओळखा आणी त्यांना जपा."
"वस्तू उत्तम असली तर किम्मत ही उत्तम मोजावी लाजते."

Monday, July 11, 2011

मोहाचे पाश

बापट नावाचा एक व्यक्ती स्वामीभक्त होता.स्वामींच्या दर्शनासाठी आलेले लोकांची राहायची सोय तो करायचा,जे प्रेमानी मिळायचे ते स्वीकारायचा.
त्याची उपजीविका नाक्यावर जकात वसूल करायची होती.पण हळू-हळू त्याला लाच खाऊन लोकांना कमी कर घेऊन सोडायची वृत्ती होते.
काही दिवसांनी त्याच्या मुलाला दम्याची बाधा होते,दिवस प्रती-दिवस रोग वाढत जातो.
एक दिवस त्याच्या बोलवण्याला हुसकावून वैद्य दुसऱ्या गावी पाटीलाच्या मुलाला पाह्यला जातात.
बापट विचार करतो की आपण श्रीमंत नाही म्हणुन आपल्या कडे न येता वैद्यबुवा पाटला कडे गेले.
मग तो श्रीमंत व्हायला काहीही करायचे ठरवतो.
भयंकर लाच खायला लागतो. स्वामी दर्शनाला आलेले जे लोकं त्याच्याकडे मुक्काम करायचे त्या लोकांना अपमानित करुन भयंकर पैशे उकळतो.
काहीही करू पण श्रीमंत होऊ आणी चांगल्यात चांगला वैद्य आणून आपल्या शरदचा आजार बरा करू.
एक-दोन दा अटक व्हायची पण वेळ येते पण शिपायाला लाच देउन तो सुटतो.
आजार बरा होत नाही, म्हणुन तो स्वामींकडे सांकडं घालायला जातो.
स्वामी त्याला वाल्या-कोळ्याची गोष्ठ सांगतात.
त्या गोष्टीचा बोध असा -"आपले पापांचे आपणच जवाबदार असतो, पत्नी आणी मुलांना पाप करुन प्राप्त धनानि कितीही सुख दिले तरी ते पापाचे वाटेकरू
नसतात. म्हणुन माणसांनी नितीपूर्वक सचोटीने वागावे.घरच्यांना सुख देण्या साठी अडलेल्या-नडलेल्या लोकांचा छळ करू नये."
पण बापटवर काही परिणाम न होता तो परततो.
स्वामींनी काही आश्वासन न दिल्या बद्दल तो नाखुश असतो.
एकदा त्याचे चार मित्र येतात. ते आप-आपल्या परिवाराची सर्व व्यवस्था लाऊन, 'वैराग्य पत्करून स्वामी चरणात शेवटचे आयुष्य काढू',असा विचार करुन येतात.
त्यांचा मुक्काम बापट कडेच असतो. त्यांच्या समोर पुन्हा बापट ला अटक व्हायची वेळ येते पण त्या मित्र पैकी एकाची मोठ्या अधिकार्याशी मैत्री असल्या मुळे बापट पुन्हा सुटतो.
पण बापट आपलं वर्तन सुधारत नाही.
ते चारी जण स्वामींकडे येऊन आपला मनोगत सांगतात. स्वामी चोळप्पाला सांगून त्यांची राहण्याची व्यवस्था करवतात.
बापटला पुन्हा अटक होते पण या वेळेला तो काहीही करुन सुटत नाही.
इकडे शरदचा रोग फार वाढतो. बापटची बायको मनात स्वामींची करुणा भाकते.
स्वामी चोळप्पा च्या हाती औषध पाठवतात.ते औषध खाऊन शरद अगदी खड-खडीत बरा होतो.
एका रात्री चारी मित्र झोपले असतांना, रात्री चोर त्यांच सामान चोरी करता..
ते सर्व विलाप करतात आणी दुसऱ्या दिवशी स्वामी कडे घाराणं घालतात.
स्वामी म्हणतात: " छान झालं ! सुंठेवाचून खोकला गेला!"
"अरे तुम्ही सर्वस्व त्याग करुन वैराग्य पत्करायला आले ना? मग जरासे ऐवज गेले तर का विलाप करतात?"
"अरे वैराग्य सोपे नाही, आधी ते मनात आले पाहिजे. मनात वैराग्य नसले आणी जर घर-दार सोडून वनात जाणार तर वनात दुसरे घर तयार होईल."
"आधी मनातून मोह,चिंता,लालसा हे सर्व शत्रू काढा, तेव्हा खंर वैराग्य येईल."
बापट ची बायको शरद ला घेऊन स्वामी कडे आभार व्यक्त करायला येते.अटक झालेला बापट सुद्धा शिपायाची गया-वया करुन येतो.
स्वामी म्हणतात:" अरे बापटा ! शरद तुझ्या वाईट कर्मांच्या फळा मुळेच आजारी पडला होता.
"आणी ते वाईट कर्म गुरु-भक्ती किंवा नामस्मरण करुन नष्ट करायचे सोडुन तु आणखी वाईट कर्मांचा भर घालत होता,"
"म्हणूनच शरद चा आजार वाढत जात होता."
"अरे पानं-पाचोळ्याला लागलेला विस्तव अजून पानं घालुन कसा शांत होणार, आणी तु नामस्मरणाचे पाणी घालायच्या जागी आणखी पानं घालुन
तो विस्तव वाढवत होता."
"आम्ही तुला वाळ्याची गोष्ठ सांगितली तरीही तुला काहीही बोध झालं नाही."
"अरे वाळ्यानी अफाट पाप केले पण त्याच्या तोडीचे नामस्मरण करुन ते नष्ट केले."
"पाप करतांना सहज होत गेले पण त्यांचा विमोड करतान त्याला कठोर तपस्या करावी लागली."
"आणी तपस्या पण साधी नाही, जेवढा वेळ पाप करण्यात गेला त्याच्या अनेक-पट वेळापर्यंत त्याला तपस्या करावी लागली."
"एवढा एकनिष्ठ झाला कि शरीरावर मुंग्यांनी वारूळ केले तरी त्याला कळले नाही."
बापटला आपली चूक कळते, तो पुन्हा पहिल्या सारखा सचोटीनी आणी निष्ठेनी वागण्याचं ठरवतो."