Sunday, September 4, 2011

(७९) गौतमीचा गौतम झाला

बसप्पा आणी मणब्याचा वृतांत ऐकल्यानंतर शास्त्री बुवा पुढे निघतात.
स्वामी कोणी तरी मांत्रिक असावा असं त्यांना वाटतं. रस्त्यात त्यांना एक व्यक्ती भेटतो, शास्त्रीबुवा थोड्याश्या
तिरस्कारानी त्याला म्हणतात इथे स्वामी समर्थ कुठे भेटतील,फार भाकड गोष्टी ऐकल्या आहे त्यांच्या बद्दल.
तो युवक त्यांना स्वामी महिमा सांगतो तरीही शास्त्रीबुवा म्हणतात:- "अस केले तरी काय आहे, स्वामी समर्थांनी?"
युवक म्हणतो :- " मी कोण आहे?"
शास्त्री बुवा म्हणतात:- "हा काय प्रश्न झाला ? पुरुष आहे तु."
युवक म्हणतो: " हो मी पुरुष आहे माझं नाव गौतम, पण काही दिवसा पूर्वी पर्यंत मी एक स्त्री होतो."
शास्त्रीबुवांना घेरी येत नाही तेवढंच, ते म्हणतात: " काय रे ! डोकं-वोकं तर फिरले नाही ना तुझं?"
गौतम आपला वृतांत सांगतो.
एक सावकार होता, तरुणपणात त्याची बायको वारते.
वार्धक्यपणात त्याला एकांत खायला येतो. संतती नसल्याचे त्याला खंत वाटते.
घर सांभाळणारी एक वृद्ध स्त्री-गडी त्याला दत्तक पुत्र घे असं सुचवते.
सावकाराला पटतं, पण त्याला पाहिजे तसा मुलगा मिळत नाही.
हरी नावाचा गुराखी त्याचा गडी होता.
त्याला ३ मुली होत्या. गरीबिनी मुक्ती व्हावी म्हणुन तो आपल्या लहान मुलीला मुलगा बनवून
सावकाराला दत्तक द्यायचे ठरवतो.
गौतमी त्याची कनिष्ठ कन्या, तिला तर आपल्या स्वामी आजोबाचं वेड.
कुठून-कुठून फुलं वेचून आणायची आणी त्यांची माळ करुन स्वामींना घालायची.
एकदा स्वामी खुश होऊन म्हणतात:-" बाळ काय करू तुझ्या साठी ?"
लहानगी गौतमी म्हणते: " काही नाही फक्त मी जेव्हा हाक मारीन तेव्हा या. "
तिचा उद्देश एवढाच होता की करमत नाही तेव्हा आपल्या लाडक्या आजोबांनी यावे आणी आपल्या बरोबर खेळावे.
स्वामी मान्य करतात.
इकडे हरी, गौतमीला मुला सारखे वागणे शिकवतो, तिला मुला सारखं पोशाख करवतो.
सावकारा कडे काम करणाऱ्या आजी बाईला मिळणाऱ्या पैश्यातून वाटा देईन अशी लालूच  देउन, बिंग न फुटावे याची हमी घेतो.
आजीबाई पण तयार होतात.
मग काय गौतमीला गौतम बनवुन सावकारा कडे पाठवले जाते.
गौतमी चुणचुणीत तर होतीच सावकारांनी विचारलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तर देउन सावकाराचे मन जिंकते.
सावकार तिला मुलगा समझुन दत्तक घेतो.
आजीबाई डोळ्यात तेल घालुन सावधगिरी बाळगतात, म्हणुन गौतमी मुलगी आहे हे बिंग फुटत नाही.
काही वर्षांनी सावकाराला गौतमचे लग्न करुन सूनमुख पाहु असं वाटतं.
मग काय गौतमचे लग्न ठरवले जाते.
आता मात्र गौतमीला घाम फुटतो, तिची सर्व हुशारी घाटावर जाते.
मुलाची आई जेव्हा गौतमीचे पाय धुते तेव्हा पायांची कोमलता आणी चेहऱ्यावर स्त्रीसुलभ भाव पाहून
तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकते.
त्या रोखून गौतमी कडे पाहतात. गौतमीचा धीर जातो.
होणाऱ्या सासुबाई पटकन ओळखतात की गौतमी पुरुष नाही.
त्या फर्रकन गौतमचे पागोटे ओढतात.गौतमीचे  लांब-सडक केस सुटतात.
आता तर गौतमीला गौतम बनवून फसवणूक करण्याचा आळ सावकारावर येतो.
गौतमीचे होणारे सासरे गावाचे कुलकर्णी होते. ते पटकन गौतामीला वनात नेऊन तिचा वध करा असा निकाल देतात.
मग काय गौतमीला वनात नेण्यात येतं.शिपाई वनात तिचा वध करणार त्या आधी देवाची आठवण कर म्हणुन वेळ देतात.
गौतमी कळ-कळुन स्वामींना हाक मारते:-"स्वामी आता शेवटचे तरी भेटा हो!."
गौतमीच्या लहानपणाच्या वचनांनी बांधलेले स्वामी लगेचच तिथे प्रगट होतात.
तिथे ते शिपायांना रागावतात:- " काय रे  या निर्दोष युवकाचा कशाला प्राण घेतात?"
शिपाई म्हणतात:" अहो स्वामी ती फार लबाड स्त्री आहे फक्त वेश पुरुषाचा आहे ."
स्वामी स्मित-हास्य करुन गौतमी कडे पाहतात. स्वामींच्या दृष्टीनी काया-पाळट होऊन गौतमी पूर्ण पणे एका युवकात बदलते"
स्वामी म्हणतात:" अरे मूर्खो वह् पुरुष है, स्त्री नही. "
शिपाई भीत-भीत गौतमीचं परीक्षण करतो तर सर्व लक्षणे पुरुषाची.
ते आता गौतमला घेऊन सावकारा कडे परत जातात, आपण दत्तक घेतलेली संतती पुरुषच आहे म्हणुन तो समाधान पावतो.
सासुरवाडीचे लोकंही संतुष्ट होऊन गौतमला आपली मुलगी देतात.
गौतमच्या मुखातून ही गोष्ट ऐकुन शास्त्रीबुवांच्या कपाळाला घाम फुटतो.
ते स्वामींना भेटायला पुढे जातात पण या वेळेला मनातल्या संकल्प-विकल्पाचे ओझे घेऊन.

(७८) सापाचे झाले सोने

मणब्याचा उद्धार पाहून स्वामींना भेटायला निघालेले शास्त्री एका जागेवर विसाव्या साठी थांबतात.
तिथे एका वृद्द्ध आणी गरीब माणसाला पाणी पाजायला एक श्रींमत माणूस घोड्यावरून
उतरून येतो. तो व्यक्ती त्या म्हाताऱ्या माणसाला पण स्वामी म्हणुन हाक मारतो.
शास्त्रीबुवानी विचारल्यावर तो माणूस आपला पूर्व वृतांत सांगतो.
तो बसप्पा असतो, जातींनी तेली पण प्रपंचात मन लागत नाही.
कोणतेही आजीविकेचे कार्य करायची त्याला इच्छाच होत नाही त्याल सुचते ते फक्त नामस्मरण आणी ईश्वराचे ध्यान.
त्यामुळे घरचे अगदी कंटाळले होते.
आणी कंटाळणार पण का नाही? घरात अन्न नाही, भूखेनी रडणारे मुलं-बाळं.
काहीही झाले तरी बसप्पाला ईश्वर उपासने शिवाय दुसरे कार्य करायचीच इच्छा होत नाही.
चित्त शांत व्हावे म्हणुन तो अनेक साधुंशी भेटला अनेकांना गुरु करू पहिले पण चित्ताला ओळख पटली नाही
या मुळे तो उद्विग्न राहायचा.
एकदा वनात त्याला काट्यांमध्ये झोपलेले स्वामी दिसतात.
काट्या मध्ये शांत पणे झोपणारा माणूस साधारण नसावा ,म्हणुन बसप्पा स्वामींशी संवाद करतो.
बसप्पाला पहिल्या  बरोबर स्वामी म्हणतात;-"काय रे तेल्या! घर संसार सोडुन मोक्ष पाहिझे?"
"अरे अशी जवाबदारी टाकून का पळत आहे?"
"घरच्यांना कोण पाहणार?"
स्वामी अंतर्यामी आहे हे कळल्यावर बसप्पा घट्ट स्वामींचे पाय धरतो.
स्वामी म्हणतात:-"योग्य वेळ आली की तुला बोलावु"
काही दिवसांनी रात्री स्वप्नात दृष्टांत देउन स्वामी बसप्पाला बोलावतात.
बसप्पा येतो पण स्वामी दुर जातात.बसप्पा पण मागे-मागे येतो, स्वामींच्या मागे जातांना काटे लागून बसप्पा रक्त-बंबाळ
होतो, तेव्हा स्वामी थांबतात.
स्वामी म्हणतात: 'हमारे साथ चलना इतना आसान नही है, जावो वापस जावो "
"आपल्या संसाराची काळजी घे."
बसप्पा म्हणतो:" प्रपंच आणी परमार्थ एका बरोबर जमत नाही, प्रपंचात ईश्वराचा विसर होतो"
स्वामी म्हणतात:" अरे रामदास स्वामी म्हणुन गेले आहे- "प्रपंच करावा नेटका .........."
"देव प्राप्तीसाठी पळण्याची गरज नाही लायकी झाल्यावर देव स्वत: भेटायला येईल"
" पुंडलिका कडे पांडुरंग आला, एकनाथ कडे पाणी भरले "
स्वामी पुढे जातात. बसप्पा तसाच लंगडत येतो. या वेळेला स्वामी जिथे थांबतात तिथे चारी कडे सापच-साप होते.
स्वामी म्हणतात :- "आमची एवढी सेवा केली त्या बद्दल तुला काही देऊ."
"पण आमच्या कडे काय आहे ? जा हे साप घेऊन जा . वाट्टेल तेवढे साप घेऊन जा."
बसप्पा थरथरतो.
स्वामी एक साप उचलून देतात,बसप्पा जवळ असलेल्या कपड्याची झोळी पसरवतो आणी त्यात साप बांधून घरी जातो.
रस्त्यात साप सोडुन द्यावा असा विचार येतो पण स्वामींनी दिलेला साप कसा सोडु , असा विचार करुन मुकाट्यानी चालत जातो.
घरी गेल्यावर बायको आशेनी गाठोडीत काय आहे म्हणुन विचारते.
तिला काही म्हणणार त्याआधी बायको गाठोडी हिसकवुन घेते.
उघडते तर काय, त्यात चक्क सोन्याचा साप.
बसाप्पाच्या बायकोनी कधी गुंजभर सोनं पाहिलेले नव्हते, आणी आता तर भला मोठ्ठा सोन्याचा साप.
बसप्पा एका काळी पोरा-बाळांना पोटभर अन्न सुद्धादेऊ शकत नव्हता तो आता गावाचा श्रीमंत माणूस बनतो.
त्या दिवशी पासुन बसप्पा प्रत्येक अडलेल्या-नाडलेल्या व्यक्ती मध्ये स्वामी पाहून त्यांना स्वामी म्हणुन हाक मारायचा.आणी यथासांग मदत करायचा.
बसाप्पाचा असा वृतांत ऐकुन नारायण शास्त्री आणखीच गोन्धलतात आणी नव्या जोमानी अक्कलकोट कडे चालायला लागतात.

(७७) गोष्ट मणब्याची

राम नवमी होती. रामजन्मासाठी गावातले प्रकांड विद्वान नारायण शास्त्रींना बोलावण्यात येतं.
रामजन्माच्या वेळेला केशव सपत्नीक येतो. केशवला पहून शास्त्री बुवाच्या तळपायाची आग मस्तकात जाते.
शास्त्रीबुवा केशवच्या कमरेत लात घालुन पाडून देतात. ते
गड्याच्या हाती केशवला हकलून देतात.
केशवचे सर्व पुत्र जन्मापासून मतिमंद होते, म्हणुन शास्त्री बुवा त्याला पापी समझुन तिरस्कार करायचे.
पण केशव अनन्य स्वामीभक्त होता, कितीही वाईट झालं तरी त्याची स्वामी वर श्रद्धा अढळ होती.
त्यांच्या मते गावात अशे पापी माणसे राहिले तर गावावर गंडांतर येतं.
दुसऱ्या दिवशी शास्त्रीबुवा पंचायत बोलावून केशवला परिवारा सकट गावा बाहेर काढायला लावतात.
सगळ्या गावात शास्त्रीबुवांचा दरारा होता, म्हणुन पंच त्यांच्या इच्छेप्रमाणे निकाल देतात.
गाव सोडुन, आपल्या मतीमंद मुलांना कुठे जाऊ या चिंतेनी केशव परिवारा सकट विषपान करतो.
संध्याकाळी केशव गाव सोडुन गेला की नाही, हे पाह्यला शास्त्री बुवा गावकऱ्या बरोबर येतात.
पाहतात तर पूर्ण परिवार विषप्राशन करुन पडला होता,फक्त मणब्याची नाडी चालत होती.
शास्त्री बुवा मणब्याला वनात सोडायला सांगतात.
गावकरी मणब्याला वनात सोडायला जातात. वनात त्यांना भारदस्त चाहूळ लागते, कोणी तरी हिंस श्वापद
असावं, असं समझुन गावकरी मणब्याला तिथेच सोडुन परततात.
दुसऱ्या दिवशी शास्त्रीबुवा आणी गावकरी मणब्या बद्दल गोष्ठी करत असतात..
शास्त्रीबुवा म्हणतात: "अर्ध्या रस्त्यात मणब्याला सोडले तरी काही काळजी करू नका,
आधीच पोटात विष आहे आणी तुम्ही लोकांच्या
मागे जे श्वापद लागले होते त्यांनीच त्याला खाऊन टाकले असावे.
" नाही... नाही ...., शास्त्रीबुवा तुमच्या दोन्ही गोष्ठी चूक आहे, मी जिवंत आहे."

शास्त्रीबुवा पाहतात तर काय? हे वाक्य मणब्याच्या तोंडाततुन पडले होते.
मणब्या जो आधी बे..बे असा आवाज काढून इशाऱ्यानी बोलायचा तो असं अस्खळीत बोलत होता.
शास्त्री बुवा म्हणतात: "तु जिवंत कसा आणी तु बोलायला कसा लागला?"
मणब्या फाड-फाड बोलून सांगतो की वनात एक साधू आले आणी त्यांच्या कृपेनी मी बोलायला लागलो आणी
माझा मतीमंद पण पण गेला.
गावकरी म्हणतात की असं भेटलं तरी कोण तुला ?
मणब्या ओल्या मातीवर काडीनी रेखा चित्र काढून दाखवतो.
गावकरी पटकन ओळखतात: " हे तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ"
शास्त्रीबुवा दातओठ चावुन राहतात. आता कोणच्याही कारणांनी मणब्याला गावा बाहेर काढता येणार नव्हते.
सर्व लोकं स्वामींचा जय-जयकर करतात.
शास्त्रीबुवा पुन्हा मणब्याला विचारतात " स्वामींनी मग तुझ्या आई-वडिलांना आणी भावांना का नाही वाचवले?"
मणब्या एका विद्वानासारखे उत्तर देतो-" संत निसर्ग नियमात सहसा बदल करत नाही, अगदी विशिष्ट परिस्थिती ला वगळून"
"माझे आई-वडील आणी भाऊ आपल्या गतीला प्राप्त झाले, त्यांच्या साठी हेच उत्तम होते."
"जीवन जगणे हे महत्वाचे नाही जन्म-मरणाच्या चक्रातून सुटणे हे महत्वाचे आहे."
मणब्याच्या काय पालट मुळे शास्त्री बुवांचे डोके एकदम फिरते.
ते मुकाट्यानी असा स्वामी समर्थ आहे तरी कोण हे पहायला अक्कलकोट साठी प्रस्थान करतात.