Tuesday, February 21, 2012

(११२) हरी इच्छा बलीयसी


चोळपा स्वामी आज्ञा घेऊन आपली मुलगी राजुबाई ला  भेटायला जातो. तिच्या घरी गेल्यावर त्याला कळते की राजुबाई ला क्षय झाला आहे.
काहीही इलाज केला तरी गुण येत नाही. इकडे स्वामी शेणाच्या गवऱ्या बनवतात.
चोल्प्पा अक्कलकोटला परतून स्वामींकडे  साकडे घालतो. स्वामी काही न म्हणता त्याला केलेली गवरी देतात.
स्वामींचा इशारा समझुन चोळप्पा थबकतो.
काही दिवसांनी राजु बाईला देवाज्ञा होते. 
 महिन्या नंतर चोळपाच्या मुलगा- कृष्णप्पा आजारी पडतो.
त्याल वैद्या कडे नेता-नेताच त्याला देवाज्ञा होते.
चोल्प्पा वर तर जणू दुखाचा पर्वतच कोसळतो.कृष्णप्पाच्या ओर्ध्देहिकाची तैयारी चालू असताना स्वामी तिथे येतात.
स्वामी म्हणता: " रडायला काय झाले आहे?"
चोळप्पाची सासू फणफणून महानते:- 'अहो स्वामी कृष्णप्पा गेला हो .."
चोलप्पाची पत्नी स्वामींना दूषण लावते.
स्वामी म्हणता: " कौन म्हणतो कृष्णप्पा मेला आहे ? तो झोपला आहे."
मग स्वामी कृष्णप्पाला आवाज देतात- "कृष्णप्पा उठ......."
मग स्वामी हाक मारतात:- "अरे नीलकंठा उठ...".
स्वामींची ही हाक ऐकून कृष्णप्पा उठून बसतो.
स्वामी मग खुलासा करतात: " राजु बाई चा वेळ आला होता आणी त्यानंतर तिला नवीन जन्म पण घ्यायचा पण होता पण 
कृष्ण्प्पाचा हा शेवटचा जन्म होता.
या जन्मा नंतर त्याला मोक्ष मिळणार होता. तुमच्या साठी आम्ही त्याला जीवन दिले. आम्ही विधीलीखीतात अत्यंत विशेष परिस्थितीतच बदल करतो.
चोळप्पाचा परिवार स्वामींची क्षमा मागतो.

Friday, January 6, 2012

(१११) भक्ता हाती विप्रमद जिरवले


श्रीपाद नावाचा एक ब्राह्मण अनन्य स्वामी भक्त होता. एक दिवशी स्वामिनी त्याला काशीला जा अशी आज्ञा करतात.
काशी मध्ये विद्वान ब्राह्मणाचा घोळका आढळतो. ते ब्राह्मण श्रीपादच्या अज्ञाना पाई त्याचा पदोपदी अपमान करतात.
परिस्थितीमुळे श्रीपादचे शिक्षण फारसे झाले नव्हते. 
या सर्व अपमाना मुळे तो विप्र-सभेत जायचे टाळतो.
काशीत एक दिवस फिरत असताना स्वामी एकदम त्याच्या समोर प्रगट होतात.
स्वामी श्रीपाद ला घेऊन विप्रसभेत जातात. विप्र सभा एका देऊळात भरली होती.
श्रीपाद तिथे स्वामींना चोरंगावर बसवून त्यांची पाद्य पूजा करतो.
स्वामी म्हणतात -"पाद्य पूजा झाली पण नैवैद्य कुठे आहे."
त्या ज्ञानांनी उन्मत्त झालेल्या ब्राह्मणा मधून एक स्वामींच्या समोर मांसाहारी पदार्थ नैवैद्य म्हणून ठेवतो.
स्वामी हे पाहून संतप्त  होतात. तितक्यात देऊळात एक देवी प्रगट होते. देवी फार क्रोधित असते.
ती म्हणते-" चांडाळा तू स्वामींना मांसाहाराचा नैवैद्य दाखवला ! " मी  तुला आता भस्म करणार."
पाहता-पाहता तो ब्राह्मण भस्म होतो.
श्रीपाद स्वामींच्या चरणी मस्तक ठेवतो.
स्वामी त्याच्या मस्तकावर हात ठेवतात.
स्वामींच्या हस्त-स्पर्शांनी श्रीपाद च्या डोक्यात चारी वेद, सहा पुराण व त्या शिवाय अनेक शास्त्रांचे ज्ञान जागृत होतं.
विश्वाचे सर्व ज्ञान मनुष्याच्या डोक्यात असते पण फक्त कुणात ते जागृत होतं आणी कुणात  नाही. मनन,पठण,अवलोकन,अनुभव आणी गुरूची 
शिकवण, हे सामान्य रुपानी मनुष्याच्या डोक्यात असलेल्या सुप्त ज्ञानाला जागृत करतात.
स्वामी कृपेनी एका क्षणात श्रीपाद मध्ये ते ज्ञान जागृत होतं.ज्ञानेश्वर महाराजांनी पण आपल्या स्पर्शांनी रेड्याकडून वेद म्हणवले होते.
श्रीपाद स्वामी आज्ञेनी त्या ब्राह्मणांशी वाद-विवाद करायला बसतो.
काही क्षणातच तो त्या सर्व ब्राह्मणांचा चोफेर पराभव करतो.
ब्राह्मणांना स्वामींचे सामर्थ्य कळतं आणी ते स्वामींचा शरणी येतात.

Sunday, December 18, 2011

(११०) क्यो रंडी छोडी कि नही?




सोहनी नावाचा एक माणूस विधुर होता. दोन विवाह करून पण त्याचं कुटुंब नव्हते.
आपल्या आईच्या सल्ल्यानी तो तिसरे लग्न करायचे ठरवतो व त्या साठी स्वामींची परवानगी मागतो.
स्वामी चक्क नकार देतात तरीही आईच्या सांगण्यानी सोहनी लग्न करतो.
इकडे चोळप्पा आणी त्याची पत्नी स्वामी मुळे झालेल्या सोई आणी आमदनी मुळे खुश असतात.
त्यात अक्कलकोट संस्थाना कडून स्वामिनी मिळवून दिलेल्या मेहनतान्यानी त्यांना फार आधार असतो.
पण स्वामी जर सोडून गेले तर हे सर्व सुखं नाहीसे होईल अशी शंका चोळप्पाची बायको काढते.
चोळप्पा एक खड्डा खणतो. त्याचा उद्देश तो खड्डा स्वामींच्या समाधी साठी खणण्याचा असतो.
स्वामींना जेव्हा हे कळते तेव्हा ते म्हणतात: " अरे चोळ्या, आमच्या आधी आम्ही तुला या खड्यात घालून जाऊ."
स्वामी वचनाचे गांभीर्य कळून चोळप्पाची बायको कासावीस होते.
पण चोळप्पा गुरूच्या आधी जर शिष्याचे मरण आले तर याला भाग्य समजतो.
सोहनी आपल्या नूतन पत्नी सह स्वामींचा आशीर्वाद घ्यायला येतो.
स्वामी रागावतात :"अरे नाही म्हटले तरी तू लग्न केले ना . आता कशाला इथे आला आहे?".
सोहनी आपल्या नूतन पत्नी सह स्वामींचे पाय पडतो.
स्वामी म्हणतात: "तुझ्या ललाटी जे लिहिले आहे ते तुला प्राप्त हो. "
काही दिवसांनी सोहनीची बायको जीना उतरताना खाली पडते, तिच्या कम्भरेला मार बसून ती कायमची अंथरुणाला खिळते.
सोहनी स्वामी शरणी येतो.
स्वामी म्हणतात; " अरे तुला म्हटले होते, लग्न नको करू, त्तरी आमची आज्ञा मोडून तू लग्न केले."
"तुझ्या भाग्यात लग्न होते पण लग्नाचे सुखं नव्हते."
"आता जा इथून, आमच्या कडे काही उपाय नाही."

सोहनी निराशहून परततो.
त्याच्या घरी आळंदीचे नृसिंह सरस्वती आलेले असतात.
सोहनी व त्यांची मातोश्री त्यांना सर्व घाराणे सांगून उपाय मागतात.
नृसिंह स्वामी म्हणतात: "स्वामींनी म्हटले म्हणजे विधिलिखित, ते टळणे शक्य नाही."
"माझ्या जवळ सिद्ध्य आहे पण सिद्धीनी सुखं मिळते विधिलिखित टळत नाही."
सोहनी च्या सल्ल्यावर नृसिंह महाराज स्वामींना भेटायला जातात.
नृसिंह महाराज यायच्या आधी स्वामी शिष्या कडून व्याघ्रांबर मांडून ठेवतात.
नृसिंह महाराजांना पाहताच स्वामी म्हणतात:" क्यो रंडी छोडी की नही?"
नृसिंह स्वामी म्हणतात: " अभी तक तो नाही छोडी पार आपकी कृपा हुई तो जल्दी ही छोड दुंगा."

सर्व शिष्यांना नृसिंह स्वामींचा किळस येतो, एवढे मोठे महात्मा असून अशे चाळे.
स्वामी ओरडून म्हणतत: " अरे मुर्खानो रंडी म्हणजे कोणी स्त्री नसून आमचा अर्थ सिद्धीशी आहे.
जो पर्यंत हा नृसिंह सिद्धीच्या तावडीतून सुटणारा नाही तो पर्यंत त्याचा मोक्ष मार्ग उघडणार नाही.
मग स्वामी नृसिंह महाराजांना त्या व्याघ्रांबरा वर ध्यान लावायला सांगतात.
स्वामी कृपेनी त्यांना मोक्ष मार्ग सापडतो. आपण कुठे कमी पडत होतो ते कळते.
मग स्वामी त्यांना आशीर्वाद देतात, कि तुला तर मोक्ष मिळेलच पण तुझे दर्शन करणाऱ्यांना पण मोक्ष मिळणार.