Tuesday, June 12, 2012

स्वामींच्या गोष्टींपासून शिकवण-1



स्वामींचा साक्षात्कार एखाद्यालाच होतो पण स्वामींची शिकवण सर्वासाठी असते. 
स्वामींच्या शिकवणी, मनुष्याचे दोन्ही लोकं सुधारवयास साह्य करतात आणी मनुष्याचे जीवन सोपे करतात.


कहाणी: शिकवण


(१) स्वामींचा हिरा: अनेक रूप असले तरी ईश्वर एक आहे.
(२)वामन बुवांची गोष्ट: सद्गुरूच्या ठाई ईश्वर असतोच.
(३) मला ब्रह्म दाखवा: पात्रता नसताना ईश्वराचे सगुण दर्शन होत नाही त्या साठी आराधना करून पात्रता वाढवायचाच प्रयत्नच मनुष्याच्या हाती असतो.
(४) स्वामी नखांचे ताईत करून विकणारा न्हावी: परमार्थाचा विक्रय करू नये.
(५)परमार्थात स्त्री-पुरुष भेद नसतो : रूप,लावण्य किंवा धन हे काही चिरकाल पर्यंत टिकत नाही, जे टिकते ते आध्यात्मिक धन

Saturday, March 3, 2012

(११७) सर्वथा तूची त्राता




संताजी नावाचा एक भक्त स्वामींना २०० मोहरा द्यायला येतो. 
स्वामी म्हणतात: -" ठेव आपल्या कडे, आम्ही म्हणू तेव्हा देशील."
गणेश नावाचा एक कर्तव्यनिष्ठ आणी स्वामीभक्त गृहस्थ होता. तो एका सावकाराच्या  खाजगी सेवेत होता.
एकदा सावकार त्याला २०० मोहरा देऊन त्याला शेजारच्या गावात आपल्या भावाला देऊन व्यापार आणायला सांगतो.
गावाला जाताना गणेश एका मंदिरात विसाव्याला बसतो. तिथे त्याचा डोळा लागतो. डोळे उघडून पाहतो तर काय मोहरांची पोटली नव्हती.
तो कावरा-बावरा होऊन इकडे तिकडे पाहत फिरतो. रक्कम फार मोठी होती. जन्म भर राबून पण ती फेडणे त्याला शक्य नव्हते.
त्याला वाटले की आता सावकार आपल्याला चाबकांनी फोडणार.
तितक्यात पुजारी बुवा येऊन त्याला म्हणतात: " अरे शुंभा सारखा काय उभा आहे! मंदिराच्या पायथ्याशी जा आणी तिथे रस्ताभर पाहत जा .
कुठे तरी पडली असेल."
माणूस संकटात  असतो तेव्हा तो पटकन कोणीही काही सांगितले तर  ऐकतो. 
गणेश आपली राहिली-सुरलेली शक्ती एकत्र करून मंदिराच्या पायथ्याशी पहात-पहात जातो.तितक्यात त्याच्या समोर एक पोटली येऊन पडते.
त्या पोटळीत नेमक्या २०० मोहरा असतात. गणेशचे संकट टळते.
सावकाराचे काम करून तो परततो.
तिकडे संताजी स्वामींकडे येऊन म्हणतो:-"तुमच्या दृष्टांता प्रमाणे मी निर्दिष्ट जागे वर मोहरांची पोटली भिरकावली. "
"मी फक्त या गोष्टीची खात्री करायला आलो आहे की माझी सेवा तुमच्या पर्यंत पोहचली की नाही?"
स्वामी म्हणतात: " हो तुझी सेवा आमच्या पर्यंत पोहचली." 
तितक्यात गणेश येऊन आपल्या बरोबर घडलेली विलक्षण घटना सांगतो.
सर्वंना स्वामींनी गणेशची कशी मदत केली हे लक्ष्यात येते. गणेश ला पण खुण पटते की स्वामीनीच पुजाऱ्याचे रूप घेऊन आपले मार्गदर्शन केले.
नंतर स्वामींची आज्ञा  घेऊन गणेश, बायको आणी मुलाला घेऊन ज्योतिबा आणी महालक्ष्मीच्या दर्शनाला जातो.
स्वामी त्याला म्हणतात  कि रस्त्यात जो जे सांगेल तशे कर.
ज्योतिबाच्या मंदिराच्या खाली एक माणूस गणेशला हळद लाऊन सांगतो:-"ज्योतीबा आणो महालक्ष्मी च्या समोर एक-एक कवड ठेव."
"आणी ज्योतिबा समोर एक नारळ फोड."
गणेश ज्योतिबा समोर कवड ठेऊन नारळ फोडायला जातो. तिथला पुजारी त्याला काळभैरवाच्या समोर नारळ फोड अशे सांगतो.
गणेश तसच करतो.
आता महालक्ष्मी कडे जायची तैयारी असते. तिथे जायच्या आधी ते विसावा घेतात.
बाळ रडतो म्हणून गणेश त्याला हवेत भिरकावतो आणी हवेतच अलगद झेलून घेतो. अस तो परत-परत करतो.
पण दुर्लक्ष्य होऊन बाळ जमिनीवर पडतो. पण आश्रयच म्हणा बाळाच्या केसाला पण धक्का लागत नाही.
इतक्या उंचावरून पडून सुद्धा बाळाला काहीपण इजा होत नाही. बाळ रडत सुद्धा नाही.
ही सर्व स्वामींचीच कृपा असं समझुन ते महालक्ष्मी चे दर्शन करून स्वामींकडे येतात.
गणेश म्हणतो: "स्वामी, इतक्या वरून बाळ पडून पण काही इजा झाली नाही."
स्वामी म्हणतत: " अरे तू काळ भैरवा समोर नारळ फोडला ना ! म्हणून तुझ्या बाळाला पडून पण इजा झाली नाही."
चाणाक्ष्य बाळप्पांना लगेचच समझत की आपण डोक्याला नारळ म्हणतो.
स्वामींनी विविध रूप धरून रस्त्यात गणेशचे मार्गदर्शन केले आणी काळभैरवा समोर नारळ फोडायला लाऊन त्या लहान मुलाच्या जीवावर आलेले
गंडांतर टाळले.
स्वामीकृपेची प्रचीती येऊन गणेश स्वामी चरणी मस्तक ठेवतो.

Monday, February 27, 2012

(११६) स्वर्ण विद्येच्या शिल्पकाराचा उद्धार




बीडकर नावचे एक गृहस्थ अत्तराचे व्यापारी होते. त्यांचा व्यापार तर 
चांगलाच चालायचा पण त्यात त्यांना जडीबुटीनी धातूचे स्वर्णकरण्याची विद्या पण हस्तगत झाली होती.
त्यांचे एका नर्तकी वर प्रेम होते आणी तिला लग्नाचे वचन पण दिले होते.
नर्ताकिनी पण दुसऱ्या लोकासाठी नाचणे बंद केले होते.
ती बीडकरांच्या मागे लग्ना साठी लागली होती.
पण बीडकर यांचे आधीच लग्न झालेले होते म्हणून त्यांना प्रश्न पडला होता.
आपल्या मित्राला आपली चिंता सांगताना त्यंना खबर येते की त्या नर्तकीचा सर्प दंशानी मृत्यू झाला.
मित्र त्यांना म्हणतो की ईश्वरानीच तुमची या प्रश्ना पासून सुटका केली.
पण त्या नर्तकी वर जीव असल्यानी त्यांना जगा-प्रती थोडा वीतराग आला होता.
संसार दु:ख प्राप्त  झाल्यावरच मनुष्याला अध्यात्माची आठवण येते.
मनाच्या शांतीसाठी बीडकर आध्यात्मात उपाय शोधात्तात.
तितक्यात एक रामदासी उयुन त्यांना  म्हणतो की आध्यात्म-मार्ग इतका सोपा नसतो आणी त्यात तुझ्या सारखा ऐश्वर्यात लोळणारा माणूस 
काय आध्यात्मा कडे वळणार?
त्या रामदासाचा टोमणा बीडकर च्या हृदयात लागतो.
ते आपल्या आराध्य देव मारुतीचा मंदिरात जातात.
तिथे ते मारुतीचा धावा करतात. तितक्यात त्यांना देववाणी ऐकू येते की अक्कलकोटला स्वामी समर्था कडे जा.
बीडकर अक्कलकोटला येतात.
तिथे ते स्वामी सेवेत राहतात.
एकदा स्वामींचे पाय चेपताना त्यांचा डोळा लागतो. डोळे उघडतात तेव्हा पाहतात तर काय स्वामी जवळ एक मोठ्ठ्या फणेचा नाग बसला आहे.
बीडकर स्वामींवर विश्वास ठेऊन मुखांनी नामस्मरण करत पाय चेपत राहत्तात.
स्वामी लगेच उठतात. आणी उठल्या बरोबर बीडकरांच्या श्रीमुखात एक जोरदार ठेवतात.
बीडकरचा चेहरा आनंदानी खिळून उठतो. ते आनंदात डोलू लागतात.
स्वामी मग त्या नागाला हातात धरून तिथून निघतात.
गुरु आपल्या निवडक शिष्यावर शक्तिपात करतो तेव्हा त्याचे प्रकार वेग-वेगळे  असतात.
चापटी मारणे हा ही एक शक्तीपाताचा प्रकार होता.
या मुळे बीडकर यांच्या मनातला द्वंद संपून त्यांना होणाऱ्या उद्वेगाचे निरसन होते. खर ज्ञान मिळाल्यानी त्यांचा चेहरा प्रफुल्लित होतो.
ते स्वामी शरणी येतात. स्वामी त्यांना सहस्त्र भोजन घाल असे सांगतात.
बीडकर आपल्याकडे असलेल्या अत्तराच्या बाटल्या विकायला निघात्ता पण त्यांना ठेच लागून बाटल्या चकनाचूर होतात.
हुशार बाळप्पा त्यांना मार्ग सांगतात. त्या राहिली-सुध्लेल्या अत्तराचं अष्टगंध करून ते राजाला विकून येतात.
आणी त्या पैशानी बीडकर सहस्त्र भोजनपार पाडतात.
स्वामी भोजन ग्रहण करून म्हणतात: " भोजन तो दिया अब दक्षिणा देणने का वक्त आ गया है."
पण बिद्कारांकडे पैशे नसतात. सर्व पैशे तर सहस्त्र भोजनात खर्च झालेले असतात.
मग स्वामी म्हणतत अरे दक्षिणा नसेल तर एक वचन दे- " जडी बुटी चे  कार्य सोडून दे"
जडी-बुटी चे   कार्य म्हणजे धातू  चे सोने बनवण्याचे कार्य.
बीडकरांना प्रश्न पडतो पण ते सद्गुरू आज्ञेला  सर्वोपरी मानून सोनं बनवणार नाही अशे वचन देतात.
स्वामी मग त्यांना नर्मदा प्रदिक्षणा घालायला सांगतात.
माया ही ब्रह्मा आणी मोक्ष प्राप्तीत सर्वात मोठी बाधा असते.
बीडकर यांची आध्यात्म मार्गावर उन्नती व्हावी म्हणू स्वामींनी केलेली ही उपाय योजना होती.
नुसते धातूचे स्वर्ण करत बसल्या पेक्ष्या आता बीडकर स्वताच्या जीवनाचे सुवर्ण करण्याच्या मार्गावर चालायला लागले होते.