Sunday, June 12, 2011

(६५) देव देतो आणी कर्म नेतो

शारदा नावाची एक स्त्री स्वामीभक्त होती पण कर्मकांड,कर्मठपणा इत्यादी गोष्ठींना फार महत्व द्यायची.
शारदा संतानसुखा पासुन वंचीत होती, तिच्या कडे काम करणारी सखुच दु:ख पण हेच होतं.
सखु पण संतान सुखाला पारखी होती.
पण सखुच्या बाबतीत एक गोष्ठ वेगळी होती, तिला स्वामींवर अतुट श्रद्धा होती, एवढी कि संतान सुख
देणार तर स्वामीच, नाहीतर संसारातला कोणताही उपाय लागू पडणार नाही.
शारदा पुत्र सुखासाठी औषध उपचार, पूजापाठ करवत असते.
ती सखुसाठीही ह्या गोष्ठी करू पाहते, पण सखु स्वामींशिवाय दुसरी कोणतीही गोष्ठीवर विश्वास ठेवायला तैय्यार नसते.
एक दिवशी शारदेची बहिण रेणुका तिच्याकडे  येणार होती. शारदेचा नवरा तिला घ्यायला जातो,
 पण रेणुका कुठेही भेटत नाही, म्हणुन परत येतो.
शारदेला भीती वाटते, रेणुका गाणदेवीच्या मंदिरा समोर तर नाही गेली ना?
गावा मध्ये एक गाणदेवीच मंदीर होतं. तिच्या प्रकोपाला पूर्ण गाव घाबरायचा.
रात्री-अपरात्री नको त्या अवस्थेत जर  स्त्रिया तिच्या समोरून गेल्या, तर त्यांना गाणदेवी झपाटते, अशी समझ होती.
थोड्या वेळानी सखु आणी तिचा नवरा, रेणुकेला शोधून आणतात, ती गाणदेवीच्या मंदिर समोर बेशुद्ध झालेली सापडते.
मग काय रेणुका मांत्रिकाला बोलावते.
घरात आरडा-ओरड ऐकुन तिथुन  जात असलेले बाळप्पा आत येतात.
पाहतात तर काय, मांत्रिक अघोरी पणानी  आपले प्रयोग करत असतो,
आणी मग तो रेणुकेला  बरं करण्यासाठी कोंबड्याची बळी मागतो.
बाळप्पा सर्वांना समझवतात कि हा सर्व अंधविश्वास आहे, पण ऐकतो  कोण?
शेवटी बाळप्पा सर्व प्रकार स्वामींच्या कानावर घालतात.
दुसऱ्या दिवशी स्वामी गाणदेवीचा प्रतीक असलेला दगड उपटून काढायला जातात.
मांत्रिक देवीच्या प्रकोपाची भीती घालतो. स्वामी त्याच्या श्री मुखात एक ठेवतात.
दम दिल्यावर मांत्रिक कबुल करतो कि गाणदेवीच्या नावानी दगड त्यानीच ठेवला होता.
गावात काहीही वाईट झालं तर त्याचा संबंध तो गाणदेवीच्या प्रकोपाशी लावून, गावकऱ्या कडून पैशे उकळायचा.
स्वामींच्या उलघड्या मुळे मांत्रिक गाव सोडून जातो.
खर तर, रेणुका रात्री वाट चुकाल्यानी पहिलेच घाबरलेली होती,
 आणी गाणदेवीच्या मंदिरा समोर येऊन पोहचल्य मुळे ती भितीनी गारठून कोसळली होती.
काही काळानी ती स्वताच शुद्धीवर येते.
इकडे चोळप्पा यांच्या घरी एक घुबड शिरून बसतं. घुबड म्हणजे अपशकुन असं समझुन चोळप्पा घराला ताळा
लावून बायको-मुलाला घेऊन शारदेच्या घरी येतात.
शारदा आणी चोळप्पांची पत्नी, अगदी जीवा-भावाच्या मैत्रिणी होत्या.
स्वामींना हे सर्व कळल्यामुळे, स्वामी शारदे कडे येतात, तिथे चोळप्पाला घरी परत ये, अशी आज्ञा करतात.
शारदा स्वामींना म्हणते,मला मुल व्हावं असा आशीर्वाद द्या, नाहीतर मी आमरण उपोषण करीन.
स्वामी काहीही उत्तर न देता परततात.
चोळप्पा घरी आल्यावर स्वामी खुद्द त्या घुबडाला उचलुन वनात सोडून देतात.
स्वामी म्हणतात: "अरे चोळप्पा ! अरे तुला निर्माण करणाऱ्या देवानीच त्या प्राण्याला पण निर्माण केले ना,
मग त्या प्राण्यामुळे तुला अपशकुन कसा होणार?"
"अरे!, आप-आपल्या कर्मामुळे प्राणी विभिन्न योनीत जन्म घेतात, पण सर्वाच्या ठाई एकच ईश्वर असतो."
"जेव्हा जीवांच्या शरीरातला ईश्वर निघून जातो, जीव निधन पावतो."
"अरे असा अंधविश्वास पाळु नका. अरे आमचा शिष्य म्हणवतो,
मग काही भयं वाटलं तर आमच्या कडे यायचं सोडून असा पळपुट्या सारखा काय पळून जातो !"
चोळप्पा आपली चूक मान्य करतो.
तिकडे शारदेच पाहून सखु पण उपोषण करते. शेवटी त्यांचे नवरे स्वामींकडे घाराणं घालतात.
स्वामींच्या आज्ञेनी दोघांना स्वामींकडे आणण्यात येतं.त्या वेळेला स्वामी श्मशान भूमीत असतात.
स्वामी म्हणतात: "दोघांना अपत्य सुख हवं आहे ना? "
असं म्हणुन स्वामी समोर पडलेली दोन हाडं उचलतात.
त्यातलं एक हाड शारदे कडे भिरकवतात.
शारदा थबकून मागे सरकते. हाड तिच्या समोर जमिनीवर पडतं.
मग स्वामी सखुकडे दुसरं हाड भिरकवतात, सखु ते हाड झेलून, मस्तकाला लावते.
शारदा म्हणते: "अरे काय करते ! फेक ते हाड . विटाळ होणार त्यामुळे. "
सखु म्हणते : "सद्गुरुंनी  काहीही दिले तर ते ग्रहण करण्यात शिष्याचं कल्याणच असतं."
हा सर्व प्रकार पाहून स्वामी म्हणतात: "अरे याला म्हणतात, देव देतो आणी कर्म नेतो".
"अरे तुम्ही लोकांच्या चांगल्या आणी वाईट कर्मांच्या आधारावर परमेश्वर प्रारब्द्ध लिहितो."
"मनुष्याला ते प्रारब्ध भोगणे भाग असतं, पण काही विशेष परिस्थितीत परमेश्वर त्यात बदल करतो,
पण त्या साठीसुद्धा मनुष्याचे सद्कर्म असायला हवे."
"आम्ही देऊ केलेला प्रसाद शारदेनी नाकारला पण सखुनी स्वीकारला."
"शारदेच्या मनात एकनिष्ठ भक्ती नव्हती. कर्मकांडा सारखीच गुरुभक्ती पण तिला एक उपाय वाटला."
"सर्व करू तेव्हा काही तरी मना सारखं होईल."
"अरे तेही मान्य करू, पण मनात जे संकल्प-विकल्प निर्माण झाले त्याचं काय?"
"अरे हाडांना पाहून कोणीही थबकेल, पण कोण देत आहे या गोष्ठी वर लक्ष्य गेलं नाही!"
"कारण तेच, एकनिष्ठ भक्ती नसणं."
"अरे जेव्हापर्यंत मन, चित्त आणी बुद्धी एकत्र नाही होणार तेव्हा प्रपंच असो किंवा परमार्थ यश मिळणार नाही."
"अरे श्रद्धा असायला  सुद्धा उपासना लागते, आणी तिथेच शारदा कमी पडली."
सर्व जण परततात.
काही दिवसांनी सर्वजण शारदेच्या घरी परस्पर चर्चा करत असतांना सखुला वामन होतं.
सखुला लगेच कळतं कि स्वामींचा आशीर्वाद पावला आहे.
शारदेला खंत वाटतो कि आपण जर स्वामींवर एकनिष्ठ भक्ती ठेऊन प्रसाद स्वीकारला असता
तर आपण ही संतानसुखाला प्राप्त झाली असते.
"गतस्य शोचना नास्ति " असा विचार करुन शारदा भक्तीत एकनिष्ठ होण्या साठी उपासना वाढवायचा निश्चय करते.


 

Sunday, June 5, 2011

(६४) मैत्री आणी नातं

वटवृक्षा खाली स्वामी आणी बाळप्पा आपसात बोलत असतात-
स्वामी : "बाळ्या मैत्री असावी तर कृष्ण आणी सुदामा सारखी, कुठून ही काही साम्य नसले तरी एक-मेका वर अफाट प्रेम."
बाळप्पा :" स्वामी ! ते द्वापारीच झालं पण आजच्या जगत ते शक्य आहे का?"
स्वामी : "बाळ्या आहे अशी एक जोडी- आपल्या श्रीपाद आणी सदाची."
"लवकरच, भेट होईल तुझी त्यांच्याशी "

काही वेळानी सदा आणी श्रीपाद स्वामींच्या दर्शनास येतात.
सदा आणी श्रीपाद लहानपणाचे मित्र असतात पण त्यांच्यात सख्या भावा सारखं प्रेम असतं.श्रीपाद फार श्रीमंत घराचा असतो आणी सदा साधारण परिवाराचा असतो.
श्रीपादची बहिण निहारिका रूपस होती, आणी ती आणी सदा मनातल्या मनात एक-मेकाशी आकर्षित होते.
श्रीपादला ही गोष्ठ लक्षात आलेली  होती, व सदा सर्व प्रकारांनी योग्य असल्या मुळे तो स्वताच दोघांच लग्न ठरवतो.
इकडे सदाच्या शेजारी सखू नावाची युवती राहायची, ती आणी सदा बालपणाचे मित्र होते. षोडशी ओलांडल्यावर सखुचं सदावर प्रेम जडलं होतं.
पण सदाचं तिच्या बद्दल असं काही नसल्यामुळे, सखुचं प्रेम एकतर्फी झालेलं  होतं.
एक दिवस सखू सदा  समोर आपलं मनोगत प्रगट करते पण सदा तिचं म्हणण फेटाळून लावतो.
सखुचा भाऊ रामाला जेव्हा हे सर्व कळतं तेव्हा तो सदाला समझवायचा प्रयत्न करतो, त्याला हुंड्याच लालूच पण देतो,पण सदा लग्नासाठी चक्क
नकार देतो.
सर्व बाजूनी निराश होऊन सखू विहिरीत उडी मारून जीव देते.
या प्रकरणामुळे,सदाच मन त्यालाच खात होतं. तो स्वामी दर्शनास जाऊन स्वामींना  आपली मनोव्यथा सांगतो.
स्वामी म्हणतात: "जे व्हायचं ते झालं, पण आता तु निहारीकाशी लग्न  करुन आपला आयुष्य नव्यानी सुरु कर!"
मग काय,सदा आणी निहारीकेच थाटात लग्न होतं, खुद्द स्वामी येऊन त्यांच्यावर अक्षत टाकतात.
इकडे सखू गेल्यामुळे राम वैतागलेला असतो, त्याच्या मनात एक क्रूर कटाची रचना होते.
तो सरकारी शिपायाला लाच देउन त्याला श्रीपाद  कडे पाठवतो.
शिपाई: "सरकार तुमच्या मित्राची ओढ्या कडची  जागा घेण्या साठी उत्सुक आहे. सरकारला तिथे धर्मशाळा बांधायची आहे. त्याबद्दल सरकार त्याला दुसरी त्यापेक्षा मोठी जागा देणार आहे.
सदा घरी न भेटल्या मुळे मी तुमच्या कडे आला आहे."
"तुम्ही त्याच्या कडून स्वाक्षरी घेऊन ठेवा मी कागद पत्र नंतर घेऊन जाईन."
श्रीपाद: 'सदा भेटल्या बरोबर मी त्याला सर्व सांगीन."

काही वेळानी सदा येतो, श्रीपाद त्याला सर्व प्रकरण सांगतो.
श्रीपादवर अतुट विश्वास असल्यानी सदा न वाचता कागदांवर स्वाक्षरी देतो.
पण प्रत्यक्षात असं काहीही नसतं, सरकारला कोणतीही जागा नको असते, आणी त्या कागदांची किम्मत शून्य असते.
एकदा त्या जागेवर काम करतांना सदाला तोच शिपाई अडवतो आणी सरकारी जागेवर काम नको करू असं सांगुन जातो.
सदाला काही समझत नाही.
तेव्हाच राम त्याला सांगतो कि तुझी जमीन श्रीपादनी बाहेरच्या बाहेर सरकारला विकली आहे.
सदाला पहिले विश्वास होत नाही पण नंतर रामाच्या जाळ्यात सापडून तो श्रीपाद कडे खुलासा करायला जातो.
तिथे शिपाई पाहिलेपासून बसलेला असतो आणी तो श्रीपाद्ला रकमेची पोटली देतो. खर तर ती श्रीपाद्च्या दुसऱ्या जागेच्या बद्दल मिळालेला मोबदला असतो.
पण सदाला रामानी सांगितलेल्या गोष्ठींवर विश्वास होतो आणी तो सत्य न जाणता, श्रीपाद वर आळ घालुन  हुज्जत घालतो.
गोष्ठ माराहाणीवर येते आणी दोघांच्या मैत्रीला तडा जातो.
स्वामी खुद्द येऊन रामाला सत्य प्रगट करायला सांगतात ,पण आपल्या बहिणीच्या दुखात जळणरा राम नकार देतो.
काही दिवसांनी एक वाटमारा  पैश्यासाठी रामाची हत्या करतो आणी सदावर खुनाचा खोटा आळ येऊन त्याला अटक होते.
निहारिका आपल्या सोभाग्याचं रक्षण कर, असं म्हणुन आपल्या भावासमोर पदर पसरते.
मोठ्या मनाचा श्रीपाद रामाच्या खुनाचा आळ स्वता वर घेतो, सदाची सुटका होते पण या खुनापाई श्रीपादला फाशी होण्याची शक्यता असते.
पण काही वेळानी खरा अपराधी पकडला जाऊन श्रीपादचीपण सुटका होते.
नंतर सदाची आई येऊन खुलासा करते कि हा सर्व कट रामचा रचलेला होता.
सदाला आपल्या वर्तनाचा खंत वाटतो आणी तो श्रीपादची माफी मागतो.
श्रीपाद पण उदार मनानी सदाला क्षमा करतो.
सर्वजण स्वामींना भेटायला येतात.
स्वामी म्हणतात: "सखु आणी रामच्या प्रारब्धात हे लिहिलेले होतं. असा टोकाचा निर्णय घेण्यासाठी सखुचं अपरीपक़्व मन जवाबदार होतं आणी राम आपल्या कर्मांमुळे
अश्या दारुण मृत्यूच्या मुखात सापडला."
"अरे कोणाच्याही नात्यात गैर-समझ होता कामा नये कारण गैर-समझाचं औषध नसतं, त्यात विश्वास असायला पाहिजे."
"आणी सर्वानी त्या विश्वासाला जपलं पाहिजे."
"कोणत्याही गोष्ठीची पूर्ण शाह-निशा न करता कुणावरही आरोप लावू नका."
सदाला आपली चूक पटते. तो स्वामींची आणी श्रीपाद्ची माफी मागतो.

Friday, May 27, 2011

(६३) सांभाळुनी मार्गावरीता आणीता न दुजा त्राता

श्रीधर कुलकर्णी नावाचा एक स्वामीभक्त व्यक्ती होता. सरकारी नौकरीतुन निवृत्त झाल्यावर श्रीधर बुवा मुलांसाठी गुरुकुल
चालवायचे. श्रीधर बुवांना एक मुलगा व एक मुलगी होती. मुलगी तनु सर्व-गुण संपन्न असुन आज्ञाधारक होती.
श्रीधर बुवांचा मुलगा तुषार अगदी वाया गेलेला होता. त्याला दारू,जुगार सारखे व्यसन तर होतेच
पण मारहाण आणी चोरीपर्यंत पण त्याची मजल गेलेली होती.
कितीही समझावले तरी तुषार ऐकत नव्हता.
तुषार मुळे श्रीधरबुवा जाम वैतागले होते.
जेव्हा तुषारनी घरात चोरया करायला सुरुवात केली तेव्हा तर त्यांच्या डोक्यावरून पाणीच गेलं.
चोरीच्या पैशानी तुषार जुगार खेळायचा. जुगारात हरल्यावर तो तनुच्या लग्नासाठी केलेल्या दागिन्यांची सुद्धा चोरी करतो.
गावाच्या जमीनदाराचं श्रीधर बुवांच्या गुरुकुलावर लक्ष्य होतं.त्याल ती जागा खाजगी गरजे करता पाहिजे होती पण काहीही केल्या
श्रीधर बुवा जागा विकायला तैय्यार नसतात.
जुगारात हरून कफल्लक होऊन फिरतांना, तुषारला जमीनदार गाठतो. त्याला तो काही पैशे देतो.
तुषार ते पैशे सुद्धा हरतो. पुन्हा पैशे देण्यासाठी जमीनदार तुषारला गुरुकुलाचे कागद आणून द्यायची अट घालतो.
तुषार ते कागदपत्रे सुद्धा चोरून जमिनदाराला आणून देतो.
तिकडे तुषार चे कृष्ण-कृत्य कळल्यामुळे तनूचं लग्न मोडतं.
जमीनदार गुरुकुलाच्या जमिनीवर जब्ती आणतो.
या सर्व गोष्टीनी श्रीधर बुवांचा मानसिक तौल जातो आणी ते पोलिसात तक्रार नोंदवतात.
पोलीस मागे लागल्यामुळे तुषार एका जागेवर दडून बसतो. तिथे त्याला एक व्यक्ती भेटतो आणी आपुलकीनी बोलतो.
नाव विचारल्यावर तो व्यक्ती अवधूत असं नाव सांगतो.
अवधूत आपला व्यवसाय सोंगाड्याचा सांगतो.
अवधूत च प्रेमळ बोलण्यामुळे व व्यक्तित्वात कमालीचं आकर्षण असल्यामुळे तुषार ला त्याच्यापासून दुर जाता येत नाही.
अवधूत जे म्हणेल त्याला ते इच्छा-नसून पण करावे लागायचे.
अवधूत त्याला आमराईत काम करुन पैशे कमवायला लावतो, त्या पैशाची भाकर खाताना तुषार ला खरं समाधान मिळतं.
रात्री झोपतांना तुषार ला दारू लागायची पण अवधूत त्याला दुध पाजतात.
काही दिवसांनी अवधूत त्याला त्याची सर्व कृष्ण-कृत्य सांगतात.
अवधूत ला आपली सर्व कृष्ण कृत्य माहित आहे हे कळ्यावर तुषार थबकतो.
अवधूत सांगतात:-" तुझ्या या कृत्यामुळे तनूचं लग्न मोडलं आणी गुरुकुलावर जमीनदारांनी ताबा घेतला."
तनूचं लग्न आपल्या मुळे मोडलं हे ऐकुन तुषार ला फार खंत होतो.
अवधूत त्याला श्रीधर बुवांकडे नेतात. कितीही माफी मागितली तरी श्रीधरबुवांचा तुषारवर विश्वास बसत नाही.
तुषार मेहनत करुन पैशे कमवून गुरुकुलाचे कागदपत्रे जमीनदारा कडून परत मिळवतो.
श्रीधर बुवा म्हणतात:-"अरे गुरुकुल तर मी सुद्धा पैशे जोडून परत मिळवले असते पण तनूचं लग्न मोडले त्याचं काय?"
तुषार एका स्वामीभक्त मुलाला आणतो. त्या मुलाची लग्नाबद्दल कुठलीही अट नसते व स्वामीभक्त
परिवाराची वधु मिळणार म्हणुन तो आनंदित असतो.
तरीही श्रीधर बुवांच मन पूर्व-अनुभवांमुळे मानत नव्हतं.
तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात आणी म्हणतात:-
"श्रीधर ! अरे तुषार बदलला आहे. आम्ही स्वत: गेले आँठ दिवस त्याच्या बरोबर होतो."
"तो पश्चातापानी पोळला आहे ,त्याला नवीन आयुष्य सुरु करू दे."
तुषार ला कळतं कि गेले आँठ दिवस खुद्द स्वामी आपल्या बरोबर राहुन आपल मार्गदर्शन करत होते.आपण इतक्या चुका
 करूनही स्वामी नी आपल्याला क्षमा करुन शहाणे केले या मुळे त्याला गहिवरून येतं.
स्वामींच्या वचनांना शिरोधार्य करुन श्रीधरबुवा तुषार ला क्षमा करुन घरात घेतात.