Monday, November 7, 2011

(१०२) पाप पुण्याचा जमाखर्च

गोविंद नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता. तो फार दान-पुण्य करायचा. पण तो एका भयंकर व्याधींनी ग्रस्त होता-
भोजन झाल्यावर त्याच्या पोटात भयंकर वेदना व्हायच्या.
त्याचा मित्र त्याला स्वामींकडे आणतो.
स्वामी उपाय संगतात्त- "सात दिवस फक्त गाईचे शेण खायचे आणी गोमुत्र प्यायचे, या अतिरिक्त काहीही खायचे नाही."
उपाय म्हणजे अगदी द्रविडी प्राणायामच होता पण प्रचंड  वेदनेंना आठवून गोविंद तैयार होतो, सात दिवसा नंतर
तो पूर्ण पणे बरा होऊन स्वामींच्या चरणी पडतो.
तो स्वामींना विचारतो-" मी इतके दान पुण्य करतो तरी माझ्या वाटेला हे दुख का आले?"
स्वामी म्हणतात:" अरे भाग्यानी तु श्रीमंत झाला आणी थोडे-फार दान पुण्य करण्याची काय गमजा मारतो?"
"अरे जे थोडे फार असते त्यातले पण कुणाला देणे ह्याला खरी किम्मत आहे."
"श्रीमंतानी सुपात्र गरजवंतांना दान केलेच पाहिजे."
"आणी तुझ्या भोगला तुझीच कर्म जवाबदार आहे."
गरीब असताना तुझ्या कडे एक गाय होती, ती वृद्ध होऊन तिनी जेव्हा दुध देणे बंद केले तेव्हा तु तिचा चारा बंद केला."
"ती गोमाता भूखेच्या वेदना सहन करत मेली, तुझ्या हातून घडलेल्या या पापा मुळे तुला हे भोग प्राप्त झाले आहे."
"अरे आपली कशीही परिस्थिती असली तरी मनुष्याला आपले कर्तव्य सोडता येत नाही."
गोविंद आपली चुक मान्य करतो आणी स्वामींनी रोगमुक्त केल्या मुळे स्वामींच्या चरणी मस्तक ठेवतो.

No comments:

Post a Comment