Monday, October 24, 2011

(९८) प्रपंच आणी परमार्थ

रामू आणी अनुसुया, हे एक जोडपं होते. वयाची साठी ओलांडली तरी वागणे एका नूतन लग्न झालेल्या जोडप्या सारखे-
सदैव बरोबर हिंडणे, बरोबर जेवणे, त्यांना जणुएकमेकाशिवाय करमत नव्हते.
एकदा स्वामी रामू ला म्हणतात -" अरे साठी ओलांडली तरी फक्त प्रपंचात काय गुरफटला आहे.
काही देवाचे कर तीर्थाटन कर."
मग काय रामू बुवा निघाले तीर्थाटन करायला पण जोडीनी.
काही दुर गेल्यावर अनुसूया बाई दमतात आणी रामू बुवा तिच्या साठी पाणी आणायला जातात.
पाणी घेऊन येतात तर पहातात त रकाय अनुसूया बाई जागेवर नाही. कितीही शोधले तरी सापडत नाही.
रामू बुवा स्वामी कडे परतून आपले घाराणे सांगतात.
स्वामी रामूची हाजिरीघेतात: " काय रे जन्म घेताना बरोबर घेऊन आला होता का ? अरे जाताना तिला बरोबर घेऊन जाणार
होता का? अरे योग होतो पण कधी न कधी तर वियोग तर होणारच."
"अरे आप्तजनांचा वियोग तर होणारच कारण जग असच नश्वर आहे.".
"अरे म्हणुन तर नश्वर चा त्याग करुन ईश्वरा कडे जायला पाहिजे."
रामू स्वीकारार्थी चर्या करतो पण खिन्नपणा नी तिथुन निघतो.
स्वामी हाक मारतात: " अरे एकटा काय जात आहे, या अनुसुयेला कोण नेणार ?"
रामू मागे पाहतो तर काय अनुसूया उभी होती.
अनुसूया सांगते की मी जिथे बसली होती तिथे डोळे लागले आणी डोळे उघडले तेव्हा इथे आलेली होती.
रामुला कळते की आपली प्रपंचाची आसक्ती कमी होऊन आध्यात्मिक उन्नती व्हावी म्हणुन स्वामींनी ही लीला केली होती.

No comments:

Post a Comment