Sunday, November 20, 2011

(106) बाळप्पाची स्वामीभेट


कोंडुनाना स्वामींशी तीर्थयात्रे साठी परवानगी मागतात. स्वामी होकार देतात आणि म्हणतात: "जा पण आमच्या श्वानाला पण घेऊन ये."
कोंडु नानाला पाहून चोळप्पा पण तुळजापूरला भवानी मातेचे दर्शन करण्या साठी आज्ञा मागतो.
स्वामी चोळप्पाला तुळजापूरच्या भवानी मातेचे रूप दाखवतात.
चोळप्पा गहिवरून म्हणतो:-"स्वामी ३३ कोटी देव माझ्या समोर असतांना मी उगीच तीर्थ यात्रेची कामना केली हो !"
कोंडुनाना गाणगापूरला येतात. तहानेनी व्याकुळ होऊन ते विहिरीतून पाणी काढून प्यायला जातात.
जसच पाणी काढले जाते, त्यांच्या कम्भरेत एक लात पडते.
मागे पाहतात तर काय घोड्यावर बसलेला एका इंग्रजांनी ती लात मारली होती.
ती विहीर ब्रिटीश अधिकाऱ्यांना पाणी-पुरवठा करण्यासाठी होती, आणि सत्तेत आंधळे झालेल्या इंग्रजांनला 
एका गरीब भारतीयांनी त्यातून पाणी घेतलेले सहन झाले नाही.
बाळप्पा कोंडुनानाला हात देऊन उचलतात आणि धर्मशाळेत नेतात.
बालप्पा श्रीमंत घराचे असतात,त्यांचा मोठ्ठा कारोबार असतो आणि ते घर आणि व्यवसाय सोडून 
गुरूच्या शोधात बाहेर निघालेले असतात.
कोंडुनानांना बाळप्पाला भेटुन  कळते कि स्वामिनी ज्या श्वानाला आण म्हटले ते हेच.
ते बाळप्पाना म्हणतात कि तुमचा गुरूचा शोध संपला, अक्कलकोट चे स्वामींनी तुम्हाला बोलावले आहे.
बाळप्पा अक्कलकोटला यायला तैयार होतात.
पण रात्री स्वप्नात दृष्टांत देऊन स्वामी बाळप्पाला म्हणतात:-" उतावळा होऊ नको. भेटेची वेळ अजून आली नाही."
तिकडे त्या इंग्रजाला अकस्मात पायात इजा होते-ज्या पायांनी लात मारली त्याच पायात.
रस्त्यात भेट झाल्यावर इंग्रज आपले दुख कोंडु नानाला सांगतो.कोन्दुंना त्याल स्वामींच्या शरणी ये असे सांगतात.
इंग्रज अधिकारी कोंडु नाना बरोबर अक्कलकोटला येतो. बाळप्पा गाणगापुरलाच  राहूनच आराधना करतात.
इंग्रज अक्कलकोटला स्वामींच्या चरणात पडून म्हणतो कि स्वामी मला स्पर्श करून बरं करा.
स्वामी म्हणतात: "अरे पहिले आम्हाला लाता मारतो आणि आता चरणानी स्पर्श करा असे म्हणतो!"
इंग्रज म्हणतो: " मी केंव्हातुम्हाला लात मारली?"
स्वमी म्हणतात: ' आम्ही आमच्या भक्तांच्या ठाई वास करतो. आणि तू आमच्या भक्ताला लात मारली."
इंग्रज  आपली चूक मान्य करतो.
मग स्वामी उपाय सांगतात: " तांदूळ धुतलेले पाणी आणि वाटलेले आळू चे कांदे एकत्र करून लाव तुझा पाय बरा होईल."
तिकडे धर्मशाळेत बाळप्पा पाण्याच्या नांदीत बुडत असलेल्या विन्चुला पाहतात.
त्या विन्चुचे प्राण वाचवायला बाळप्पा त्याला हातानी बाहेर काढतात.या प्रयत्नात विंचू त्यांना चावतो पण बाळप्पा त्याला बाहेर काढतात.
स्वामी बाळप्पाला  दृष्टांत देऊन सांगत्तात: "बाळप्पा तू परीक्षेत उतीर्ण झाला".
बाळप्पा ठरवतात कि जर एका हि घरात भिक्षेत जर गव्हाच्या पोळ्या मिळाल्या तर यालाच 
स्वामींची आज्ञा मानून अक्कलकोटला प्रस्थान करायचं.
शेवटी एका घरात गव्हाच्या पोळ्या मिळतात आणि बालप्पा अक्कलकोटला येतात.
बाळप्पा नी आणलेली खाडी साखर स्वामी सर्वाना देतात पण बाळप्पाला देत नाही.
स्वामी म्हणता: " बाळप्पा इथे राहणे सोपे नाही. तुला स्वताला सिद्ध करावे लागेल."
त्यानंतर बाळप्पा गुरु सेवेला लागतात आणि लहान-मोठे सर्व कार्य करायला लागतात.
बाळप्पा श्रीमंत घरातले असल्यानी, स्वामी नी हे हि योजना केलेली होती.

No comments:

Post a Comment