Sunday, May 15, 2011

(६२) विधिलिखित बदलणार नाही

आनंद नावाचा एक मुलगा लग्नाबद्दल सशंकित होता. त्याच्या मते लग्न म्हणजे जुगार होते कारण जर
बायको सुगरण, आज्ञा धारक आणी प्रेमळ असेल तर लग्नाचं  सार्थक होतं पण जर ती कजाग,
उद्धट आणी भांडखोर असली तर प्रपंच नाकी नऊ आणतं.
याचं कारणांनी तो लग्नाला कचरत होता.
त्याचे वडील त्याला स्वामी कडे आणतात.
तिकडे  माधवी नावाची एक उपवर झालेली युवती असते, तीच्या लग्नाचा योग काढायला
तिचे आई-वडील तिला ज्योतिश्या कडे आणतात.
ज्योतिषी हात पाहून सांगतात कि काडी-मोडीचा योग आहे.
उद्धट माधवी ज्योतीश्याला उलटे बोल बोलुन परतते.
तिचे वडील तिला स्वामींकडे आणतात आणी लग्नाच्या योगा बद्दल विचारतात पण ज्योतिश्याचं भाकीत सांगत नाही.
स्वामी त्यांना आनंद सुचवतात.
स्वामींचा आशीर्वाद आहे, असं दोन्ही पक्षांना वाटून, आनंद आणी माधवीच लग्न लावण्यात येतं.
सासरी आल्याबरोबर माधवी आपले रंग दाखवायला लागते.
उलटे उत्तर देणे,काम चुकार पणा करणे तर जणू तिची दिनचर्याच झाली होती.
रोज  आजारीपणाच खोंट सोंग करायची आणी नवरा शेतावर गेल्यावर नट्टा-पट्टा करायची.
एक दिवशी तर हद्दच होते,
आनंदच्या आईचं श्राद्ध असतं आणी प्रसाद करायचं सोडून ती माहेरी जायला निघते.
आनंद समझवायचा प्रयत्न करतो तर ती त्याच्या कै. आई बद्दल अनादरानी बोलते.
आनंदचा तौल जातो आणी तो माधवीच्या श्रीमुखात एक चापटी लावतो. माधवी उग्र होऊन अनर्गल बोलायला लागते.
आनंद काडीमोड घेणार असं सांगून माधवीला घरातून हकलून देतो.
माधवी माहेरी परतते.
माधवीच्या आई-वडिलांना आश्चर्य होतं, स्वामींचा आशीर्वाद असतांना असं कस झाले.
ते स्वामींकडे कारण विचारायला येतात.
स्वामी त्यांची हजेरी घेतात:-" फार छान! आमच्या आधी ज्योतिष्याकडे जातात !"
"प्रतिकूल उत्तर मिळालं म्हणुन मग आमच्या कडे येतात पण प्रतीकुल भाकीत लपवतात!"
"अरे तुम्हाला काय वाटतं, वाटेल तशे कर्म करुन जे प्रारब्ध निर्माण करुन घेतात,ते स्वामींनी पुसून टाकायचं."
"अरे आपल्या मुलीला साधी शिस्त सुद्धा तुम्हाला शिकवता आली नाही!"
"मोठ्यांशी कसं वागायचं,त्यांचा कसा मान राखायचा, हे सुद्धा शिकवलं नाही."
"अरे स्त्रीसाठी नवरा परमेश्वर असतो त्याच्याशी नीट सुद्धा बोलता नाही आलं."
"आम्ही प्रारब्धात बदल करतो ते अपवाद स्वरूप परिस्थितीत,आणी त्याच्या मागे विशेष उद्देश असावा लागतो."
माधवीला त्यावेळेला पश्चाताप होतो, ती पुढे नीट वागायचं वचन देते.
आनंद व त्याचे वडील तिला एक संधी देतात आणी माधवी सासरी परत येउन जीवन सावरायचा नवीन प्रयत्न सुरु करते.

No comments:

Post a Comment