Tuesday, October 5, 2010

(20) स्वामी तारी त्यास कोण मारी

स्वामी भक्तांना विचारतात :-" आम्ही कोण आहे?"
चोळप्पा उत्तर देतात:-"आपण त्रिभुवन नायक आहा !"
स्वामी संतुष्ट होत नाही.
स्वामी म्हणतात:-"आज जर बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते."

स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्याला मामलेदार होता.
त्या वेळेला  मंगळवेढ्याला दुष्काळ पडला होता. लोकं अन्न-पाण्याला पारखे झाले होते.
लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्ह्ते.

इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी, स्वामींची परीक्षा पहायला आला होता.
'स्वामी स्वताला दत्त अवतार असल्याची हवा पसरून लोकांना भ्रमित करतात', असं त्याचं मत होतं.
आल्या-आल्या, तडका-फडकीनी तो वट-वृक्षा खाली बसलेल्या स्वामींकडे येतो.

त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात:- "काय रे! गाणगापूर मंदिराचा तु पुजारी ना!"
"आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला ना ?"
पुजारी चपापतो पण स्पष्टपणे कबुली देतो.
मग स्वामी विचारतात-" गाणगापूरला कोणाची भक्ती करतो?"
पुजारी उत्तर देतो-" श्रीनरसिंहसरस्वतीची!"
स्वामी म्हणतात-" आंम्ही नरसिंहभान आहो !"
"नीट बघ आम्हाला!"
पुजारी पाहतो  तर काय स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंहसरस्वती उभे आहे.
पुजाऱ्याला गहिवरून येतं.
काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात.
पुजाऱ्याला पूर्ण प्रचीती येते कि स्वामी साक्षात दत्त अवतार आहे.
तो स्वामी-चरणी मस्तक ठेऊन क्षमा मागतो.
मग म्हणतो- "अक्कलकोट हेच गाणगापूर आणी गाणगापूर हेच अक्कलकोट आहे!"

इकडे मामलेदार यशवंत, सरकारी धान्य गोदामातलं धान्य गरजवंत लोकांमध्ये वाटून टाकतो.
सरकारी धान्य वाटल्या मुळे त्याला '१०,००० रु, दुसऱ्यादिवशी संध्याकाळ पर्यंत
सरकारी खजिन्यात जमा करा ', असा  खलीदा येतो.

यशवंत घर-दार,शेत व बायकोचे दागिने विकायला काढतो पण त्या सर्वांचे मात्र १००० रु मिळणार,असं सावकार सांगतो.
सावकार शिल्लक ९,००० रुपयाचे कर्ज द्यायला स्पष्ट नकार देतो.
पैशे न भरल्या मुले वरिष्ठ अधिकारी यशवंताला अटक करायला येतात.
त्याला बेड्या पडणारच होत्या तेव्हा स्वामी एका शेटाच्या रुपात येतात,  वरिष्ठ अधिकाऱ्यांना
१०,००० रु देऊन यशवन्ताची सुटका करतात.

अधिकारी लोकं गेल्यावर स्वामी यशवंताला आपलं खर रूप दाखवतात.
यशवंत नौकरीला राजीनामा देऊन , स्वामीसेवेतच आयुष्य काढण्याचं ठरवतो.
 

No comments:

Post a Comment