Sunday, November 20, 2011

(१०५) कथा एका किमायागाराची




स्वामी चोळप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळतात.स्वामी म्हणतात-"जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिझे ! लक्ष केंद्रित करावं लागतं."
खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच.चोळप्पाची सासू पारायण करत असते, तिला त्रास होतो. चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात,
निदान थोड्या वेळपर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते.
स्वामी मान्य करतात.पण समझ पण देतात-"पारायण करताना खेळाचा आवाज ऐकु तरी कसा येतो ? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताताना तर ती उच्च पातळीची हवी."
चोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो.वामन बुवा स्वामींना पहातच राहतात.
एका मुलाला भूख लागली म्हणून स्वामी आतून नेवेद्याचे अन्न आणून घास भरवतात.
नेवेद्याचे अन्न आणताना ,चोल्प्पाची सासू विरोध करते.पण स्वामी दुमानत नाही. स्वामी सांगतात:"पोथी नुसती वाचू नका आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळं-ओवळं यांच्या जास्त नादी लागू नका.चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाशी तक्रार करतात पण चोळप्पा काही ऐकत नाही.
तिकडे शास्त्रीबुवा वामनबुवांना स्वामी बद्दल घालुन-पाडुन बोलतात.मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु घोलपस्वामी कडे जातात.
घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमानत नाही. उलट ते घोलपस्वामींना,आपल्या गुरु स्वामीसमर्था बद्दल सांगतात.
घोलपस्वामी सोन्याचं लालूच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात. वामनबुवा आणि घोलपस्वामी यांच्यात वाद विवाद होतो. जाता-जाता वामन बुवा सांगून जातात कि माझे गुरु येईल तुमची परीक्षा पहायला.
इकडे स्वामी चोळप्पाला गांवो-गाव फिरून आपला उपदेश जन-सामान्यात आपला उपदेश पोचंव, असं सांगतात-"तू सर्वाना समर्पण शिकवू शकतो. वामनाला पण तू दीक्षा दिली.खूप सोसले आहे त्यांनी माझ्या साठी.मी त्याच्या पाठीशी आहे. "
तिकडे शास्त्रीबुवा घोलपस्वामी कडे दगडं घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात.अर्ध सोनं आम्ही घेऊ अश्या अटीवर घोलपस्वामी,आपले प्रयत्न सुरु करतात. पण काय,काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही,त्यांना वाटतं कि वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे,म्हणून सूड घ्यायला घोलपस्वामी धर्मशाळेत जातात.
घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामन बुवांवर टाकायला जातात. पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणी उलट तेच स्वता पडून त्याचं धोंड्या खाली चिरडले जातात.
धोंड्याच्या आवाजांनी वामन बुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते,ते मनो-मन स्वामींना आपले रक्षण केल्या बद्दल धन्यवाद देतात.
काही वेळानी घोलप जागे होतात, त्यांना स्वामींच्या सामर्थाची प्रचीती येते.
ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात.
स्वामी बोध करतात: "घोलप, आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये.अरे आपले सामर्थ आणी शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणा करता करावा."
"त्यांना धर्म-प्रवृत्त करण्यात करावा."
"ब्रह्मचा अंतिम सत्य आहे बाकी सर्व क्षण भंगुर आहे' ह्या गोष्टीची जाणीव सर्वाना करुन द्यायला हवी."
स्वामी घोलपना माहूर ला जान राहायची आज्ञा करतात.
पहिले घोलप यांना स्वामी-चरण सोडुन जाणे जीवावर येतं पण मग ते बारकाई नी  विचार करतात कि माहूरला आदिमायेच्या रुपात स्वामीच आहे,
 असे समझुन ते माहूर साठी प्रस्थान करतात.
स्वामी मग वामन बुवाचे कौतुक करतात.
स्वामी म्हणतात: "अरे इतके प्रलोभन वाहत असताना सुद्धा तु तटस्थ राहिला, गुरुवर निष्ट आढळ ठेवली."
"तु परीक्षेत उतीर्ण झाला आहे."
"तुझी मोक्षाची वाटचाल आता सुरु झाली आहे."

No comments:

Post a Comment