Friday, December 2, 2011

(१०७) राज हट्टाचा पराभव




बडोद्याचे राजा मल्हारराव गायकवाड यांच्या मनात स्वामींना बडोद्याला आणायचा विचार येतो..
लोकानी  स्वामींना बडोद्याचे स्वामी समर्थ अशे जाणावे, असे  त्यांना वाटले.
ते दरबारात विडा ठेवतात कि जो कोणी स्वामींना बडोद्याला आणेल त्यांना धन आणी जागीर देऊ.
तात्या साहेब नावाचे सरदार तो विडा उचलतात.ते अक्कलकोट साठी निघतात.
सुंदराबाई नावाची एक स्त्री होती, ती पायाला झालेल्या घावांनी बेजार झाली होती. काहीही केल्या घाव बरा होत नव्हता.
कोणी तरी तिला अक्कलकोटला स्वामींच्या शरणी जा, अस सुचवतात.
तात्या साहेबांना आपण स्वामी भक्त आहे अशी सूचना देऊन सुंदराबाई चक्क त्यांच्या रिकाम्या असलेल्या घोड्यावर बसून अक्कलकोटला येतात.
स्वामींच्या फक्त कृपादृष्टीनी सुन्दाराबाईचा पाय बरा होतो.
स्वामींकडे येणाऱ्या लोकांची गर्दी आणी अक्कलकोटचे ऐश्वर्य पाहून सुंदाराबाई अक्काल्कोटलाच राहण्याचा विचार करत्तात.
तात्यासाहेब स्वामींना बडोद्याला या अस निमंत्रण करतात, स्वामी साफ ते निमंत्रण फेटाळून लावतात.
तात्यासाहेब खूप प्रयत्न करतात. दान-धर्म.,अन्नदान पण स्वामी काही अक्कलकोट सोडायला तैयार होत नाही.
शेवटी ते चोळप्पा ला १०,००० रु. ची जागीरीचे लालूच देतात.
चोळप्पा स्वामींना बडोद्याला चला असा सल्ला देतात.
स्वामी म्हणतात: " अरे चोळ्या ! साक्षात तुझ्या समोर त्रिभुवनाचे वैभव लोळत आहे तरी तू १०,००० रु. च्या जागिरी बद्दल विचार करत आहे."
चोळप्पा खजील होतात.
शेवटी हार मानून तात्या साहेब परततात.
यशवंत राव या वेळेला विडा उचलतात.
ते स्वामींना थोड्या धाकाच्या भाषेत बोलतात, स्वामी एकदम ओरडतात- " अरे याला बेड्या घाला.".
कुणालाही काही कळत नाही. पण  थोड्याच वेळात बडोद्याचे सैनिक येऊन यशवंतरावला बेडया घालून अटक करतात.
नंतर उलघडा होतो कि यशवंतरावानी राजाला दासीच्या हाती विष दिले होते. पण राजाचे प्राण वाचतात.


राजाला पण आपली चूक कळते कि राजहट्टाचा अंमल मायेत गुंतलेले साधारण माणसावर चालवता येतो पण मायेचा समुद्र ओलांडून गेलेले 
थोर संतांवर आपण सत्ता गाजवू शकत नाही.
राजा आपला हट्ट सोडतो.





No comments:

Post a Comment