Saturday, March 3, 2012

(११७) सर्वथा तूची त्राता




संताजी नावाचा एक भक्त स्वामींना २०० मोहरा द्यायला येतो. 
स्वामी म्हणतात: -" ठेव आपल्या कडे, आम्ही म्हणू तेव्हा देशील."
गणेश नावाचा एक कर्तव्यनिष्ठ आणी स्वामीभक्त गृहस्थ होता. तो एका सावकाराच्या  खाजगी सेवेत होता.
एकदा सावकार त्याला २०० मोहरा देऊन त्याला शेजारच्या गावात आपल्या भावाला देऊन व्यापार आणायला सांगतो.
गावाला जाताना गणेश एका मंदिरात विसाव्याला बसतो. तिथे त्याचा डोळा लागतो. डोळे उघडून पाहतो तर काय मोहरांची पोटली नव्हती.
तो कावरा-बावरा होऊन इकडे तिकडे पाहत फिरतो. रक्कम फार मोठी होती. जन्म भर राबून पण ती फेडणे त्याला शक्य नव्हते.
त्याला वाटले की आता सावकार आपल्याला चाबकांनी फोडणार.
तितक्यात पुजारी बुवा येऊन त्याला म्हणतात: " अरे शुंभा सारखा काय उभा आहे! मंदिराच्या पायथ्याशी जा आणी तिथे रस्ताभर पाहत जा .
कुठे तरी पडली असेल."
माणूस संकटात  असतो तेव्हा तो पटकन कोणीही काही सांगितले तर  ऐकतो. 
गणेश आपली राहिली-सुरलेली शक्ती एकत्र करून मंदिराच्या पायथ्याशी पहात-पहात जातो.तितक्यात त्याच्या समोर एक पोटली येऊन पडते.
त्या पोटळीत नेमक्या २०० मोहरा असतात. गणेशचे संकट टळते.
सावकाराचे काम करून तो परततो.
तिकडे संताजी स्वामींकडे येऊन म्हणतो:-"तुमच्या दृष्टांता प्रमाणे मी निर्दिष्ट जागे वर मोहरांची पोटली भिरकावली. "
"मी फक्त या गोष्टीची खात्री करायला आलो आहे की माझी सेवा तुमच्या पर्यंत पोहचली की नाही?"
स्वामी म्हणतात: " हो तुझी सेवा आमच्या पर्यंत पोहचली." 
तितक्यात गणेश येऊन आपल्या बरोबर घडलेली विलक्षण घटना सांगतो.
सर्वंना स्वामींनी गणेशची कशी मदत केली हे लक्ष्यात येते. गणेश ला पण खुण पटते की स्वामीनीच पुजाऱ्याचे रूप घेऊन आपले मार्गदर्शन केले.
नंतर स्वामींची आज्ञा  घेऊन गणेश, बायको आणी मुलाला घेऊन ज्योतिबा आणी महालक्ष्मीच्या दर्शनाला जातो.
स्वामी त्याला म्हणतात  कि रस्त्यात जो जे सांगेल तशे कर.
ज्योतिबाच्या मंदिराच्या खाली एक माणूस गणेशला हळद लाऊन सांगतो:-"ज्योतीबा आणो महालक्ष्मी च्या समोर एक-एक कवड ठेव."
"आणी ज्योतिबा समोर एक नारळ फोड."
गणेश ज्योतिबा समोर कवड ठेऊन नारळ फोडायला जातो. तिथला पुजारी त्याला काळभैरवाच्या समोर नारळ फोड अशे सांगतो.
गणेश तसच करतो.
आता महालक्ष्मी कडे जायची तैयारी असते. तिथे जायच्या आधी ते विसावा घेतात.
बाळ रडतो म्हणून गणेश त्याला हवेत भिरकावतो आणी हवेतच अलगद झेलून घेतो. अस तो परत-परत करतो.
पण दुर्लक्ष्य होऊन बाळ जमिनीवर पडतो. पण आश्रयच म्हणा बाळाच्या केसाला पण धक्का लागत नाही.
इतक्या उंचावरून पडून सुद्धा बाळाला काहीपण इजा होत नाही. बाळ रडत सुद्धा नाही.
ही सर्व स्वामींचीच कृपा असं समझुन ते महालक्ष्मी चे दर्शन करून स्वामींकडे येतात.
गणेश म्हणतो: "स्वामी, इतक्या वरून बाळ पडून पण काही इजा झाली नाही."
स्वामी म्हणतत: " अरे तू काळ भैरवा समोर नारळ फोडला ना ! म्हणून तुझ्या बाळाला पडून पण इजा झाली नाही."
चाणाक्ष्य बाळप्पांना लगेचच समझत की आपण डोक्याला नारळ म्हणतो.
स्वामींनी विविध रूप धरून रस्त्यात गणेशचे मार्गदर्शन केले आणी काळभैरवा समोर नारळ फोडायला लाऊन त्या लहान मुलाच्या जीवावर आलेले
गंडांतर टाळले.
स्वामीकृपेची प्रचीती येऊन गणेश स्वामी चरणी मस्तक ठेवतो.

No comments:

Post a Comment