Monday, February 27, 2012

(११६) स्वर्ण विद्येच्या शिल्पकाराचा उद्धार




बीडकर नावचे एक गृहस्थ अत्तराचे व्यापारी होते. त्यांचा व्यापार तर 
चांगलाच चालायचा पण त्यात त्यांना जडीबुटीनी धातूचे स्वर्णकरण्याची विद्या पण हस्तगत झाली होती.
त्यांचे एका नर्तकी वर प्रेम होते आणी तिला लग्नाचे वचन पण दिले होते.
नर्ताकिनी पण दुसऱ्या लोकासाठी नाचणे बंद केले होते.
ती बीडकरांच्या मागे लग्ना साठी लागली होती.
पण बीडकर यांचे आधीच लग्न झालेले होते म्हणून त्यांना प्रश्न पडला होता.
आपल्या मित्राला आपली चिंता सांगताना त्यंना खबर येते की त्या नर्तकीचा सर्प दंशानी मृत्यू झाला.
मित्र त्यांना म्हणतो की ईश्वरानीच तुमची या प्रश्ना पासून सुटका केली.
पण त्या नर्तकी वर जीव असल्यानी त्यांना जगा-प्रती थोडा वीतराग आला होता.
संसार दु:ख प्राप्त  झाल्यावरच मनुष्याला अध्यात्माची आठवण येते.
मनाच्या शांतीसाठी बीडकर आध्यात्मात उपाय शोधात्तात.
तितक्यात एक रामदासी उयुन त्यांना  म्हणतो की आध्यात्म-मार्ग इतका सोपा नसतो आणी त्यात तुझ्या सारखा ऐश्वर्यात लोळणारा माणूस 
काय आध्यात्मा कडे वळणार?
त्या रामदासाचा टोमणा बीडकर च्या हृदयात लागतो.
ते आपल्या आराध्य देव मारुतीचा मंदिरात जातात.
तिथे ते मारुतीचा धावा करतात. तितक्यात त्यांना देववाणी ऐकू येते की अक्कलकोटला स्वामी समर्था कडे जा.
बीडकर अक्कलकोटला येतात.
तिथे ते स्वामी सेवेत राहतात.
एकदा स्वामींचे पाय चेपताना त्यांचा डोळा लागतो. डोळे उघडतात तेव्हा पाहतात तर काय स्वामी जवळ एक मोठ्ठ्या फणेचा नाग बसला आहे.
बीडकर स्वामींवर विश्वास ठेऊन मुखांनी नामस्मरण करत पाय चेपत राहत्तात.
स्वामी लगेच उठतात. आणी उठल्या बरोबर बीडकरांच्या श्रीमुखात एक जोरदार ठेवतात.
बीडकरचा चेहरा आनंदानी खिळून उठतो. ते आनंदात डोलू लागतात.
स्वामी मग त्या नागाला हातात धरून तिथून निघतात.
गुरु आपल्या निवडक शिष्यावर शक्तिपात करतो तेव्हा त्याचे प्रकार वेग-वेगळे  असतात.
चापटी मारणे हा ही एक शक्तीपाताचा प्रकार होता.
या मुळे बीडकर यांच्या मनातला द्वंद संपून त्यांना होणाऱ्या उद्वेगाचे निरसन होते. खर ज्ञान मिळाल्यानी त्यांचा चेहरा प्रफुल्लित होतो.
ते स्वामी शरणी येतात. स्वामी त्यांना सहस्त्र भोजन घाल असे सांगतात.
बीडकर आपल्याकडे असलेल्या अत्तराच्या बाटल्या विकायला निघात्ता पण त्यांना ठेच लागून बाटल्या चकनाचूर होतात.
हुशार बाळप्पा त्यांना मार्ग सांगतात. त्या राहिली-सुध्लेल्या अत्तराचं अष्टगंध करून ते राजाला विकून येतात.
आणी त्या पैशानी बीडकर सहस्त्र भोजनपार पाडतात.
स्वामी भोजन ग्रहण करून म्हणतात: " भोजन तो दिया अब दक्षिणा देणने का वक्त आ गया है."
पण बिद्कारांकडे पैशे नसतात. सर्व पैशे तर सहस्त्र भोजनात खर्च झालेले असतात.
मग स्वामी म्हणतत अरे दक्षिणा नसेल तर एक वचन दे- " जडी बुटी चे  कार्य सोडून दे"
जडी-बुटी चे   कार्य म्हणजे धातू  चे सोने बनवण्याचे कार्य.
बीडकरांना प्रश्न पडतो पण ते सद्गुरू आज्ञेला  सर्वोपरी मानून सोनं बनवणार नाही अशे वचन देतात.
स्वामी मग त्यांना नर्मदा प्रदिक्षणा घालायला सांगतात.
माया ही ब्रह्मा आणी मोक्ष प्राप्तीत सर्वात मोठी बाधा असते.
बीडकर यांची आध्यात्म मार्गावर उन्नती व्हावी म्हणू स्वामींनी केलेली ही उपाय योजना होती.
नुसते धातूचे स्वर्ण करत बसल्या पेक्ष्या आता बीडकर स्वताच्या जीवनाचे सुवर्ण करण्याच्या मार्गावर चालायला लागले होते.

No comments:

Post a Comment