Sunday, June 19, 2011

(६६) करावे तसे भरावे

मोरेश्वर नावाचा एक सावकार होता. तो वृत्तींनी अत्यंत अप्रामाणिक होता.कोणीही जर जागा गहाण ठेवायला आला तर त्याला तो
कर्ज न फेडता आल्यास जागा जब्त होईल, अशी भीती दाखवून त्या ऐवजी जागेचा विक्रय कर असं सुचवायचा.
जागेची किम्मत पण तो चालत्या भावा पेक्षा जास्त द्यायचा पण व्यक्ती जागा विक्रय करुन परतताना आपला पाळलेला वाटमारा
पाठवून ती रक्कम लुटून घ्यायचा.
अश्या प्रकारे, त्यांनी कित्येक लोकांना लुबाडलं होतं.
एकदा एक लुबाडला गेलेला भक्त स्वामींकडे आपलं घाराण मांडतो. स्वामी त्याला सांगतात कि वाटमारा मोरेश्वराचाच माणूस होता,
तु पोलिसात तक्रार नोंदव.
मग काय मोरेश्वराला अटक होते. अधिकारी लांच खाऊन आपल्याला सोडत नाही या साठी मोरेश्वर तुरुंगातून सुटका व्हावी म्हणून
स्वामींना चांदीच्या पादुका अर्पण करायचा नवस सांगतो.
इकडे मोरेश्वरची पत्नी स्वामींकडे घाराणं घालते. स्वामी पहिले तिच्या नवऱ्याचा वागणुकी बद्दल तिची हाजिरी घेतात
मग तिला आश्वस्त करुन पाठवतात.
मोरेश्वरची पुराव्या अभावी सुटका होते.
पण सुटका होताच मोरेश्वर वेगळीच भाषा बोलू लागतो-"
माझी सुटका माझ्या पैश्या मुळेच झाली आहे, स्वामींना केलेला नवस फळला नाही."
बायको त्याला सांगते की मी करुणा भाकली म्हणुन स्वामींनी तुम्हाला सोडवले आहे, तुम्ही नवस फेडा.
मोरेश्वर चांदीच्या पादुका घेऊन स्वामींकडे जातो पण मनात विकल्प येतात.
अत्यंत लोभानी तो पादुकांच्या खुंट्या तोडून खिशात ठेवतो आणी समाधान मानतो की एवढी चांदी तर वाचली.
स्वामींना पादुका अर्पण करण्यात येतात. खुंट्या तुटलेल्या पादुका पाहून स्वामींना राग येतो.
स्वामी: " काय रे मोरेश्वर! आत्ता पर्यंत जगाला फसवत होता, आज आम्हाला फसवण्यापर्यंत तुझी मजल गेली !"
स्वामी रागवून मोरेश्वरला हाकलून देतात पण जाता जाता त्याला म्हणतात की घरी आम्ही तुझ्या साठी एक भेट ठेवली आहे.
घरी जाऊन मोरेश्वरला कळत कि त्याचा मुलगा वामन वाईट मार्गाला लागला आहे, तो मद्यपान करतो,जुगार खेळतो ,
घरातले पैशे पण चोरतो.
मोरेश्च्वर रागावतो तर वामन दुरुत्तर करतो.
मोरेश्वर आणखी काही सांगणार, त्या आधी शिपाई त्याला परत अटक करतो कारण त्याच्या विरुद्ध पुरावे सापडले होते.
मोरेश्वरला अटक होताच वामन सर्व संपत्ती आपल्या नावावर करण्याचा कारभार सुरु करतो.
आपला वाया गेलेला मुलगा आपल्याला देशोधडीला लावणार या भितीनी मोरेश्वरची बायको तुरंगात त्याला भेटायला जाते.
शिपायाची गया-वाया करुन ते स्वामी दर्शन घडवा अशी विनंती करतात.
शिपाई कंटाळून त्यांची इच्छा पूर्ण करवतो.
मोरेश्वर स्वामींची करुणा भाकतो.
स्वामी रागावतात:- "मोरेश्वरा तु पैसा कमावत नव्हता, लुबाडत होता. "
"अरे जगातल्या न्याय मंदिरात सुटला तरी परमेश्वराच्या न्याय मंदिरातुन कसा सुटणार? "
"अरे तिथे तर एक-एक पैश्याचा आणी तो प्राप्त करण्यासाठी केलेल्या कर्मांचा हिशोब द्यावा लागतो."
"अरे तुला काय कमी होती? अरे धन, हे तर आहेत्या जन्मापुर्तेच असते, "
"धन पुढच्या जन्मात नेता येत नाही पण धन मिळवण्यासाठी
केलेले वाईट कर्म मात्र पुढच्या जन्मात भोगावे लागतात."
"अरे धन जोडायचे तर सत्कर्माचे जोडा ते जन्मो-जन्मी तुम्हाला साथ देणार."
"तुझ्या वाईट वर्तनाचा तुझ्या मुलावर पहा काय परिणाम पडला आहे, तोही तुझ्या सारखा दुराचारी व्हायला निघाला आहे."
"तुझ्या त्याला लाख समझाव तो ऐकणार नाही कारण तु स्वताच वाईट कर्म करतो."
"अरे कुणाला उपदेशकरण्या आधी आपण स्वत: त्या लायकीचे असायला हवे, नाहीतर कोणीही किम्मत देणार नाही."
मोरेश्वर शरणागती पतकारतो. स्वामींची करुणा भाकतो.
स्वामी म्हणतात:- "आम्ही तुला सोडवू पण ज्याचे जे-जे लुबाडले आहे ते त्यांना परत कर. तुझ्या मुलाला परत कसं ताळ्यावर
आणायचे ते ही पाहु.
मोरेश्वर प्रामाणिक पणे कबुली देतो आणी स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे चालायचे वचन देतो.

No comments:

Post a Comment