Sunday, August 21, 2011

(७५) चोराचा सज्जन मुलगा

शिवराम नावाचा एक चोर होता,तो आपल्या मुलगा श्रीधरलाही चोर करू पाहत होता.
त्याची बायको नलिनी स्वामी भक्त होती, ती आपल्या मुलाला चांगले संस्कार द्यायची.
या मुळे शिवराम जाम वैतागायचा.एक दिवस रोगग्रस्त होऊन नलीनी देवा घरी जाते.
शिवराम श्रीधरचा बेदम छळ करायला लागतो.
या अत्याचाराला कंटाळुन श्रीधर घर सोडुन पळतो.
एका जागेवर तो रडत बसतो तिथे एका जोडप्याला त्याच्यावर दया येते. तो आपलं कोणी नाही असे सांगतो.
ते त्याला आपल्या शेत आणी घराची राखण करण्याची नोकरी देतात. त्या बद्दल ते त्याला गुरुकुलात पाठवणार होते.
श्रीधर प्रामाणिक पणे आपलं कार्य करत होता पण एक दिवस त्याच्या मालकाचा मित्र येऊन श्रीधर चोराचा मुलगा आहे,
असा खुलासा करतो.
श्रीधर चे मालक काही विचार न करता त्याला घरातून व कामावरून बाहेर काढून टाकतात.
श्रीधर एका ओसाड जागेवर बसून राहतो. त्याचं जागेवर त्याला दोन चोरांचा वार्तालाप कानावर पडतो.
त्याला कळत की चोर त्याच्या मालका कडेच चोरी करणार आहे, तो धावत जाऊन पोलीस शिपायाला खबर देउन आणतो.
चोर पकडले जातात. ते दोघे चोर कोणी दुसरे नसून त्याचे बाबा आणी त्यांचा साथीदार असतात.
श्रीधरचे मालक पुन्हा काहीही  विचार न करता श्रीधरनीच चोरं आणले असं आरोप  करतात.
शिपाई त्यांना सांगतो की श्रीधरच्या सुचने मुळेच चोरं पकडले गेले आहे.
तितक्यात स्वामी येऊन श्रीधरच्या मालकाला समझ देतात.
स्वामी म्हणतात:" अरे पूर्ण पडताळ केल्या शिवाय कोणाच्याही गोष्ठी वर विश्वास ठेऊ नका,किचडात पण कमळ
उगवते हे विसरू नये. माणसाला त्याच्या लायकी प्रमाणे व्यवहार करा, त्याच्या घराण्यां प्रमाणे नाही."
श्रीधर चे मालक आपली चूक मान्य करतात.

No comments:

Post a Comment