Friday, November 26, 2010

(37) सद्गुरूशी एकनिष्ठ असावं

स्वामी भक्तांना एक गोष्ट सांगतात:-
"एक माणूस होता तो वाराप्रमाणे देवाची भक्ती करायचा. सोमवारी शिवाची ,गुरुवारी दत्ताची,
शुक्रवारी देवीची.
एक दिवस तो पाण्यात पडला. एका देवाला बोलावलं, तो येई पर्यंत दुसऱ्याचा धावा केला,दुसऱ्या देवाचा धावा ऐकून पहिला
परतला ,दुसरा येतो तो पर्यंत तिसऱ्याचा धावा केला.
अश्या प्रकारानी एकही देव मदतीला आला नाही आणी तो माणूस बुडून मेला.
तात्पर्य असं कि माणसांनी एकाच देवाची निस्सीम भक्ती करावी.
१० छोट्या-छोट्या विहीरी खोदल्या पेक्षा एकच भली मोठ्ठी बावडी खोदलेली बरी."
स्वामींचा शिष्य श्रीपाद प्रापंचीक त्रासांनी गांजला होता,त्याला काहीच सोसेनासं झालं होतं.
स्वामी भक्ती करूनही काही त्रास संपत नाही म्हणुन तो ज्योतिष्याच्या शरणी जातो.
ज्योतिषी ग्रहांचा त्रास सांगतो,आणी उपाय म्हणुन परवा येणाऱ्या ग्राम देवताच्या पालखीचे दर्शन घ्यायला सांगतो.
पण स्वामी नेमकी त्याचं दिवसाची कार्य जवाबदारी श्रीपादवर घालतात.
तो स्वामींना पालखी दर्शनसाठी परवानगी मागतो पण स्वामी चक्क नकार देतात.
श्रीपादच्या मनात चल-विचल होते.
पालखीच्या दिवशी स्वामी ध्यान अवस्थेत आहे असं समझुन तो भुजंग नावाच्या दुसऱ्या शिष्य बरोबर पालखी
दर्शनासाठी गुपचूप पळ काढतो.
रस्त्यात आपली मोल्यवान स्वर्णमुद्रीका तो भुजंग ला सांभाळायला देतो.
भुजंग ती हातातच ठेवतो.
पालखीवर फुलांच्या पाकळ्या टाकतांना मुद्रीका पण भिरकावली जाते,पण भूजन्गच्या लक्ष्यात येत नाही.
पालखी गेल्यावर त्यांच्या लक्षात हा प्रकरण येतो.
खूब शोध घेऊन सुद्धा मुद्रीका मिळत नाही, म्हणुन ते निराष होतात.
स्वामी आज्ञेचं उल्लंघन झालं म्हणुन हा प्रकरण घडला असं समझुन ते स्वामी शरणी जातात.
स्वामी पहिले त्यांची चांगलीच हाजरी घेतात.
भुजंग स्वामींची करुणा भाकतो-" स्वामी माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे,
माझ्या हातून एवढी मोल्यावन वस्तू हरवली गेली आहे.
माझ्यावर कृपा करा."
स्वामींना करुणा येते.
स्वामी म्हणतात-" मुकाट्याने गप्प बस, अंगठी आपोआप चालत तुमच्यापाशी येईल."
तिकडे ती मुद्रीका रस्त्यावर पडलेली एका व्यक्तीला सापडते, तो उचलणार त्याच्या आधीच दुसरा उचलतो.
यावरून दोघांचं भांडण जुंपतं, तितक्यात एक शिपाई येऊन त्यांना दम देउन खर प्रकरण  जाणतो.
मग तो त्या दोघांना व मुद्रीका घेऊन स्वामींकडे न्याय-निवाड्या साठी येतो.
श्रीपादला मुद्रीका मिळते, आणी भुजंग चिंतामुक्त होतो.
स्वामी म्हणतात:-"अरे गुरु असतांना तु ज्योतिष्य कडे कशाला गेला?
गेला तर गेला गुरु आज्ञेच उल्लंघन पण केलं.
अरे! गुरुचं ऐकत नाही आणी संकट आल्यावर गुरुकडे धावत येतात.
अरे शिष्यांनी गुरुशी एकनिष्ठ असावं , कितीही संकट आली तरी त्याची कसं सोडू नये.
 संकट पूर्व कर्मामुळे येतात, आणी त्याचवेळेला जर गुरुची कास सोडली तर व्यक्ती जास्त दु:खाला प्राप्त होतो.
गुरुकृपेनी संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते,व त्या संकटातून लवकर सुटका होते."

Friday, November 19, 2010

(36) गोष्ट सिद्धप्पा जंगमांची

सिद्धप्पा जंगम नावाचे एक साधक होते. त्यांना फार सिद्ध्या प्राप्त झाल्या होत्या.
पण ते फार जात-पात,उच्च-नीच अश्या गोष्टींना महत्व द्यायचे.
इकडे स्वामी, कडे एक भक्त स्वामींना २ डाळिंब भेट करतो. सुंदराबाई ते डाळिंब उचलून स्वामींच्या लोकिक
दृष्टीआड आपल्या नातवाला खाऊ घालतात.
नातू खातांना जे दाणे खाली पडतात ते उचलून त्या स्वामींना देतात.
डाळिंब  भेट करणारया  भक्ताच्या  पाहण्यात हे सर्व येतं, तो आक्षेप घेतो.
सुंदराबाई त्यालाच  उलट उत्तर देतात.
स्वामी सुन्दाराबाईला तुझ्या पापांचा घडा भरला आहे, अशी ताकीद देउन विषय तिथेच संपवतात.
स्वामी दर्शनाला एक कनिष्ठ जातीचा व्यक्ती येतो, आपली जात कनिष्ठ म्हणुन दुर उभा राहतो.
स्वामी त्याला जवळ बोलावतात आणी ईश्वरा कडे भेद नसतो असं सांगतात.
तिकडे सिद्धप्पा जंगम देवाची करुणा भाकतात आणी मोक्ष मिळावा अशी विनवणी करतात.
 भिंतीवरचा आरसा खाली पडून फुटतो. तेव्हाच देव वाणी होते, तडा गेलेल्या आरश्याला पूर्वीप्रमाणे केल्यास मोक्ष मिळेल.
सिद्धी वापरून सुद्धा सिद्धप्पा जंगम यांना यश येत नाही.
ते पुन्हा देवाची करुणा भाकतात.पुन्हा देववाणी होते, तोडलेल्या फुलांना पुन्हा झाडावर पूर्वीप्रमाणे लावायची.
या वेळेल सुद्धा सिद्धप्पा जंगम प्रयत्नात अपयशी ठरतात.
पुन्हा देववाणी होते,कि स्वामी समर्थांच्या शरणी जा .
सिद्धप्पा जंगम स्वामींशी भेटायला  येतात.मनात अनेक संकल्प-विकल्प असतात.
स्वामी जवळ येताना, स्वामी इच्छेनी  त्यांचे पाय स्थिरावतात ,काहीही केल्या स्वामी जवळ जाता येत नाही.
स्वामी म्हणतात: "सिद्धप्पा जंगम आमच्या विषयी शंका आहे ना!"
स्वामींनी आपल्या मनाचं जाणलं म्हणुन सिद्धप्पा जंगम थक्क होतात, त्यांना स्वामींचा थोरावा कळतो.ते क्षमा मागतात.
स्वामी इच्छेनी त्यांचे पाय मोकळे होतात.
स्वामी समीप येऊन ते आपलं मनोगत व्यक्त करतात.
स्वामी म्हणतात:- "अरे मोक्ष मिळवण्ं काही शेजारच्या गावात जाण्या इतक सोपं आहे का?"
जा तिकडे गोठ्यात जाऊन शेण आणून जमीन सारव, अशी आज्ञा करतात, सिद्धप्पा जंगम निमुटपणे मान्य करतात.
सिद्धप्पा जंगम यांचे शिष्य आपत्ती घेतात, तरी सिद्धप्पा जंगम काही पण ऐकत नाही.
स्वामी म्हणतात:-'अरे मोक्ष मिळवायला मन आधी स्वच्छ पाहिजे, भेद-भाव,त्याज्य-ग्राह्य अश्या  भावना नको."
मग स्वामी सिद्धप्पा जंगम यांना शेतात जाऊन कार्य करायला सांगतात, सिद्धप्पा जंगम निमुटपणे मान्य करतात.
सिद्धप्पा जंगम यांचे शिष्य स्थळ त्याग करतात, रस्त्यात आपल्या मनात कुणाकडूनही समाधानकारक उत्तर न मिळालेला
प्रश्न स्वामींना विचारून,
स्वामींची योग्यतेचं निर्धारण करू, असं ठरवून परततात्त.
स्वामी जवळ आल्या बरोबर, स्वामी त्यांच्या मनात असलेला तिसऱ्या अध्यायाचा ४२ वा श्लोक म्हणतात-
"इंद्रियाणि ........ स:".
"म्हनणजे शरीरा पेक्षा मन श्रेष्ठ आहे, मना पेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे पण त्या बुद्धी पेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे,
आत्मा म्हणजेच मनुष्यात असलेला ईश्वराचा अंश."
शिष्यांना स्वामींचा अधिकार कळतो, ते नतमस्तक होतात.
तेवढ्यात सिद्धप्पा जंगम कार्य करुन परततात.
स्वामी म्हणतात:-"सिद्धप्पा जंगम, अरे तुझ्या अभिमानाला  तडा घालवण्यासाठीच  आम्ही तुला निकृष्ठ वाटणारी
कार्य सांगितली."
"अरे महाला सारख्या मठात राहुन मोक्ष कसा मिळणार?"
"अरे गरीब-गुबडे,कनिष्ठ जातीचे लोकात असलेल्या नारायणा पासुन अलिप्त राहुन मोक्ष कसा मिळेल?"
"आपलं कर्तव्य चोख पाड पाडणं सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे."
"सर्वा भूती इश्वर पहिल्या शिवाय गती कशी प्राप्त होणार?"
"घे प्रसाद ग्रहण कर! "असं म्हणुन कनिष्ठ जातीच्या व्यक्तींनी आणलेली भाकरी ग्रहण करायला सांगतात.
सिद्धप्पा जंगम प्रसाद स्वीकारतात.
शेवटची परीक्षा पार केल्यामुळे सिद्धप्पा जंगम यांच्या मोक्षाची वाटचाल मोकळी होते.

Thursday, November 11, 2010

(35) गर्वहरण

पांडुरंग नावाचा एक व्यक्ती अपघातात पंगु झाला होता.
मल्हारी मार्तंडाचा  त्याला फार  लळा होता.
शरीरामुळे मल्हारीचे  दर्शन होणार नाही, म्हणुन तो नियमांनी स्वामींचे दर्शन करत होता.
काहीही झालं तरी त्याच्या नियमाला तडा गेला नव्हता.
शिवरात्रीच्या दिवशी त्याच्या मनात विचार येतो कि जर आपल्याला मल्हारीचे दर्शन झाले असते तर ....!
तो आल्या बरोबर स्वामी विचारतात:-"काय मनात धरुन आला आहे.....?"
"काहीही सांगू नको."
मग स्वामी त्याला मल्हारी  मार्तंडाच्या रुपात दर्शन देतात, इतकच नाही
त्याच्या अधू झालेल्या पायावर कृपादृष्टी घालुन
त्याचं पंगुत्व पण दुर करतात.
पांडुरंगाच्या घरी एक ब्राह्मण घर गडी म्हणुन होता.
तो अगदी प्रामाणिक आणी कामात चोख होता.
शिकला-सवरलेला असूनही तो अफाट कर्जापाई घर गड्याचे  कार्य आनंदानी करत होता.
पांडुरंगाच्या पत्नीच्या सांगण्या वरून तो स्वामी दर्शनाला जातो.
तिथे जाऊन तो स्वामींना आपल्या  गरिबीचं घाराणं सांगतो.


स्वामी म्हणतात:-" अरे आमच्याकडे तु धनाची आशा धरुन आला,
जणू काय एकादशी कडे महाशिवरात्रीच आली !"
"आमच्या कडे काय आहे ?"
"ही माती घेऊन जा."
ब्राह्मण  म्हणतो:-" मी  ह्या मातीचं काय करू?"
स्वामी ओरडतात:-"घ्यायची तर घे नाही तर नीघ इथून."
ब्राह्मण खिन्न मनानी माती कपड्यात बांधून नेतो.
रस्त्यात भार अधिक झालं म्हणुन पाहतो तर काय?
मातीचं सोनं झालेलं होतं.
तो उलट्या पावलानी परतून स्वामी चरणी नत-मस्तक होतो.
स्वामी म्हणतात:-" ह्या धनानी आपलं कर्ज दुर कर आणी आपल्या कुल देवतेचं दर्शन कर."
" 'मती कर्मानुसारिणी' म्हणुन  सर्वांना आपल्या कर्मानुसार  आमच्याशी मागायची बुद्धी होते."
"धना मुळे सर्वांचच हित होतं असं नाही.
"लोकिक धना शिवाय पण काही धन असतात जसं आध्यात्मिक धन."
"लोकिक धन प्राप्ती साठी माणसांनी मेहनत करावी,सचोटीने वागावं"
"आध्यात्मिक धनासाठी नामस्मरण करावं,सत्कर्म करावं !"

स्वामींना खंडेराव राजाकडे जेवनणाचं निमंत्रण असतं.
स्वामी आपल्या शिष्यांसह राजमहालात जातात.
तिथे असलेला साधू स्वामींना फार घालुन पडून बोलतो,
स्वामींना काही   विधी निषेध नाही म्हणुन निंदा करतो.
स्वामींची आपल्या पंक्तीत बसायची लायकी नाही म्हणून त्यांचं पान
 पंक्ती बाहेर लावा असं सांगतो.
स्वामी निमुटपणे महाला बाहेर जातात पण खंडेराव महाराजाच्या आग्रहाखातर
जेवण करुन जाऊ असं आश्वासन देतात.
तिकडे त्या साधुंसाठी लावलेल्या पानात किडे रांगतात.
स्वामींचे शिष्य साधूंना म्हणतात-"हा सर्व स्वामींच्या अपमानाचं फळ आहे!"
एकदम असं अघटीत घडल्यामुळे साधूंना आपली चूक पटते.
ते स्वामींची क्षमा मागतात.
स्वामी समझ देतात:-" अरे मन पवित्र पाहिजे,मन पवित्र असाल तरच वचनांना किम्मत असते.
मन पवित्र नसतांना म्हटलेलं सत्य सुद्धा असत्या समान असतं."
स्वामींच्या कृपादृष्टीनी किडे नाहीशे होतात.साधूला स्वामींचा अधिकार कळतो.
साधू पुन्हा क्षमा मागून आपल्या सह जेवायची विनंती करतो.
स्वामी उदार माननी साधूला क्षमा करुन विनंती मान्य करतात.

Friday, November 5, 2010

(34) गोष्ट रताळ्याची

एक सावकार क्षयानी बेजार झाला होता. काहीही केल्या त्याचा आजार
बरा होत नव्हता.
सावकाराला शेवटचा उपाय स्वामीचाच होता.
सावकार सुंदराबाईच्या हाती स्वामींना निरोप पाठवतो.
स्वामी स्वत: होऊन सावकाराच्या गावी येतात.
सावकार त्यांच्यासाठी मेणा पाठवतो.
मेणा उचलणाऱ्या लोकांना जास्त  भार होतो म्हणुन स्वामी आपला भार
अगदी कमी करतात.
मेणा फुला सारखा हलका होतो.
स्वामी सावकाराला ३ दिवस रताळे उकळून खायला सांगतात.
त्यानंतर स्वामी थेट श्मशान भूमीत जातात. तिथे जाऊन ते हाडांच्या
ढिगावर बसतात.
काही मेणा उचलणारे व्यक्ती स्वामी बद्दल शंका घेतात.
एवढे धार्मिक व्यक्ती होऊन अश्या  अमंगल गोष्टी जवळ कशे घेतात?
मेणा उचलणारा एक व्यक्ती स्वामींना आपल्या गरिबीचं घाराणं सांगतो.
स्वामी त्याला वाटेल तेवढे हाडं उचल असं सांगतात.
खिन्न मनानी तो व्यक्ती स्वामींचं मन ठेवायला ३ हाडं वेचून पोटळीत ठेवतो.
काही वेळानी पोटली जड झाली म्हणुन उघडून पाहतो तर काय, हाडं चक्क
सोन्याची झाली होती.
तो कृतज्ञ भावांनी  स्वामीचरणी नतमस्तक होतो.
शंका करणाऱ्या अन्य व्यक्तींना स्वामी अधिकाराची प्रचीती येते, ते सुद्धा
स्वामी चरणी मस्तक ठेवतात.
स्वामी म्हणतात:- " याच्या प्रारब्धात होतं म्हणुन याला मिळालं! "

इकडे सावकार गावात रताळे घ्यायला जातो. वाटेत त्याच्या मनात विचार येतात कितका सोपा उपाय
आधी माहित असता तर कधीच घेतला असता.
सावकाराला गावात कुठेही रताळे सापडत नाही.
हताश होऊन तो स्वामी कडे येतो.
स्वामी त्याला समझ देतात:-"अरे रोग बरा करायची किमया रताळयात  नाही, आमच्या वचनात होती."
"आम्ही रताळ्याच्या जागी कारले म्हटले असते तरी तोच परिणाम झालं असता."
"तुझ्या मनात जो मी पणा आला होता तो वाईट होता."
"मला माहित असतं तर मीच केलं असतं, ही भावना चुकीची होती."
"लक्षात ठेव सामर्थ्य गुरु वचनात असतं साधन म्हणुन वापरलेल्या वस्तुत नाही."
सावकार आपली चूक मान्य करतो.
स्वामी त्याला आपल्या कडे असलेली रताळे देतात.