Friday, February 25, 2011

(५१) भक्ती निरागस आणी एकनिष्ठ असावी

मंगला नावाची एक स्त्री गर्भवती होती. तीचं हे तीसरं बाळंतपण होतं.ती शरीरानी  अगदी  कृष् झाली होती.
तिचा नवरा दिवस भर शेतात राबायचा आणी तिची आणी घराची सर्व व्यवस्था तिची १० वर्षाची मुलगी 'गोरी'पाहायची.
गौरी अल्पवयीन असली तरी
फार समझदार होती. ती सकाळी उठून झाड-लोट करुन, स्वयंपाक करायची तिची केलेली भाकरी घेऊन तिचे बाबा शेतात जायचे,
मग ती आपल्या छोट्या भावाला तैयार करुन ,जेवण करवून पाठशाळेत सोडायची.
थोडक्यात ती घरची सर्व व्यवस्था नीट पाहायची.
पण या सर्व कामामुळे गौरी फार दमायची.
एकदिवस फार दमलेली असतानाच तिला पीठ दळून स्वयंपाक करायचं होतं.
तिला फार झोप येत होती. ती कळकळून स्वामी आजोबाची आठवण करते कारण तिला तिच्या आईनी सांगितलं होतं
कि स्वामी आजोबा आपली सर्व काळजी दुर करणार.
ती साळसुदपणे आपलं सर्व घाराणं सांगते.
तितक्यात तिथे एक वृद्ध आजोबा येतात. ते आपळी ओळख स्वामी आजोबा म्हणुन देतात.
गोष्टी-गोष्टीत आजोबा आणी गौरी सर्व पीठ दळून टाकतात.
पण त्या नंतर एकाएक स्वामी आजोबा तिथुन गौरीच्या नकळत निघून जातात.
गौरी सगळा वृतांत आईला सांगते. मंगळाला वाटतं कि आपण मुलांना धीर द्यायला स्वामी आजोबाचं नाव सांगितलं,
आणी मुलगी खरं समजली.
श्रमा मुळे गौरी उगीचच मनातलं बोलली असावी.
गौरीला जेव्हाही गरज असायची स्वामी आजोबा यायचे आणी तिला मदत करायचे.
एकदा गौरीच्या आईला प्रसव वेदना सुरु होतात. आधीच अशक्त असलेल्या मंगलाला हा प्रसंग अगदी जीव-घेण्यासारखा होता.
सुईण बाई सुद्धा मुल अडलं आहे असं सांगते.
पण गौरी ला ठामपणे विश्वास होता कि तिचे स्वामी आजोबा या प्रसंगातूनही तिच्या आईला आणी होणाऱ्या
 बाळाला सुखरूप वाचवतील.
ती गाव भर स्वामी आजोबांना पाहत फिरते, पण कुठेही स्वामी आजोबा तिला भेटत नाही.
हिरमुसलेली गौरी घरी परत येते.
तिथे तिची आई सुखरूप प्रसूत होते.
त्या स्थानावर स्वामी प्रगट होतात,त्यांना पाह्यल्यावर गौरी पटकन आपल्या स्वामी आजोबांना ओळखते.
ती म्हणते-"स्वामी आजोबा! तुम्ही कुठे होता? मीगाव भर तुम्हाला शोधले होते!"
स्वामी म्हणतात-"अरे मी  तर इथेच होतो, अरे मला तुझी काळजी जी दुर करायची होती."
गौरीचे वडील तर चाट पडतात.गौरी जे स्वामी आजोबाच्या गोष्टी सांगायची ते सर्व खरं होतं.
स्वामी त्यांना म्हणतात- "अरे तुम्ही लोकं दुसर्याला देवाचा केव्हा सद्गुरूचा धीर देतात, पण स्वताला मात्र त्याच्यावर फारसा
विश्वास नसतो.
तुमच्या मनात संकल्प-विकल्प उठतात.देवानी मदल केली तर बरं नाहीतर आम्हीच काही तरी करू.

पण या मुलांच्या बाबतीत अस नसतं. त्यांचा आमच्या  वर ठामपणे विश्वास असतो.त्यांची भक्ती निरागस आणी एकनिष्ठ असते.
आणि भगवंत अशाच भक्तीच्या दोरीनी बांधला जातो, आणी त्याला सर्व काम टाकून भक्तासाठी यावंच लागतं.
देवावर विश्वास कसा करावा, हा या मुलांपासून मोठ्यांनी शिकावा."

No comments:

Post a Comment