Sunday, December 18, 2011

(११०) क्यो रंडी छोडी कि नही?




सोहनी नावाचा एक माणूस विधुर होता. दोन विवाह करून पण त्याचं कुटुंब नव्हते.
आपल्या आईच्या सल्ल्यानी तो तिसरे लग्न करायचे ठरवतो व त्या साठी स्वामींची परवानगी मागतो.
स्वामी चक्क नकार देतात तरीही आईच्या सांगण्यानी सोहनी लग्न करतो.
इकडे चोळप्पा आणी त्याची पत्नी स्वामी मुळे झालेल्या सोई आणी आमदनी मुळे खुश असतात.
त्यात अक्कलकोट संस्थाना कडून स्वामिनी मिळवून दिलेल्या मेहनतान्यानी त्यांना फार आधार असतो.
पण स्वामी जर सोडून गेले तर हे सर्व सुखं नाहीसे होईल अशी शंका चोळप्पाची बायको काढते.
चोळप्पा एक खड्डा खणतो. त्याचा उद्देश तो खड्डा स्वामींच्या समाधी साठी खणण्याचा असतो.
स्वामींना जेव्हा हे कळते तेव्हा ते म्हणतात: " अरे चोळ्या, आमच्या आधी आम्ही तुला या खड्यात घालून जाऊ."
स्वामी वचनाचे गांभीर्य कळून चोळप्पाची बायको कासावीस होते.
पण चोळप्पा गुरूच्या आधी जर शिष्याचे मरण आले तर याला भाग्य समजतो.
सोहनी आपल्या नूतन पत्नी सह स्वामींचा आशीर्वाद घ्यायला येतो.
स्वामी रागावतात :"अरे नाही म्हटले तरी तू लग्न केले ना . आता कशाला इथे आला आहे?".
सोहनी आपल्या नूतन पत्नी सह स्वामींचे पाय पडतो.
स्वामी म्हणतात: "तुझ्या ललाटी जे लिहिले आहे ते तुला प्राप्त हो. "
काही दिवसांनी सोहनीची बायको जीना उतरताना खाली पडते, तिच्या कम्भरेला मार बसून ती कायमची अंथरुणाला खिळते.
सोहनी स्वामी शरणी येतो.
स्वामी म्हणतात; " अरे तुला म्हटले होते, लग्न नको करू, त्तरी आमची आज्ञा मोडून तू लग्न केले."
"तुझ्या भाग्यात लग्न होते पण लग्नाचे सुखं नव्हते."
"आता जा इथून, आमच्या कडे काही उपाय नाही."

सोहनी निराशहून परततो.
त्याच्या घरी आळंदीचे नृसिंह सरस्वती आलेले असतात.
सोहनी व त्यांची मातोश्री त्यांना सर्व घाराणे सांगून उपाय मागतात.
नृसिंह स्वामी म्हणतात: "स्वामींनी म्हटले म्हणजे विधिलिखित, ते टळणे शक्य नाही."
"माझ्या जवळ सिद्ध्य आहे पण सिद्धीनी सुखं मिळते विधिलिखित टळत नाही."
सोहनी च्या सल्ल्यावर नृसिंह महाराज स्वामींना भेटायला जातात.
नृसिंह महाराज यायच्या आधी स्वामी शिष्या कडून व्याघ्रांबर मांडून ठेवतात.
नृसिंह महाराजांना पाहताच स्वामी म्हणतात:" क्यो रंडी छोडी की नही?"
नृसिंह स्वामी म्हणतात: " अभी तक तो नाही छोडी पार आपकी कृपा हुई तो जल्दी ही छोड दुंगा."

सर्व शिष्यांना नृसिंह स्वामींचा किळस येतो, एवढे मोठे महात्मा असून अशे चाळे.
स्वामी ओरडून म्हणतत: " अरे मुर्खानो रंडी म्हणजे कोणी स्त्री नसून आमचा अर्थ सिद्धीशी आहे.
जो पर्यंत हा नृसिंह सिद्धीच्या तावडीतून सुटणारा नाही तो पर्यंत त्याचा मोक्ष मार्ग उघडणार नाही.
मग स्वामी नृसिंह महाराजांना त्या व्याघ्रांबरा वर ध्यान लावायला सांगतात.
स्वामी कृपेनी त्यांना मोक्ष मार्ग सापडतो. आपण कुठे कमी पडत होतो ते कळते.
मग स्वामी त्यांना आशीर्वाद देतात, कि तुला तर मोक्ष मिळेलच पण तुझे दर्शन करणाऱ्यांना पण मोक्ष मिळणार.

(१०९) अहमदअली ला धडा




अहमदअली एक कट्टर मुस्लीम व्यक्ती होता. इतर मुस्लीम व्यक्तीनी स्वामींकडे गेलेले त्याला अगदी खपत नव्हते.
एक दिवस तो वैतागून स्वामींची हाजिरी घ्यायला जातो.
तो दिवस तो वटवृक्षा कडे  जाऊन उद्धटपणे विचारतो-" यहा स्वामी समर्थ कौन है?"

स्वामी म्हणतात: " आम्ही आहे स्वामी समर्थ!"
अहमद अली स्वामींना पाहतो तर पाहतच राहतो. जणू त्याचा पुतळाच होतो. तो अगदी स्थिर तसाच उभा राहतो.
काही काळानी स्वामी-इच्छेनी तो भानात येतो.
स्वामी त्याला चंद्र पाहायला सांगतात. त्याला चंद्रात स्वामींचा चेहरा दिसतो.
त्याला स्वामींच्या अधिकाराची जाणीव होतो. ज्या चंद्राला मुस्लीम एवढं पवित्र मानतात त्यात स्वामी दिसल्यानी
त्याला कळतं कि स्वामीच त्याचा अल्ला आहे.
तो स्वामींच्या शरणी येतो.

Friday, December 2, 2011

(१०८) हमारी कस्तुरी लाओ






ठाकुरदास नावाचा एक प्रसिद्ध प्रभोधनकार होता. तो जेव्हा कीर्तन करायचा तेव्हा लोकं साक्षात डोलायचे.
तो अनन्य दत्तभक्त होता. इतके असूनही तो दुखी होता-कारण त्याच्या अंगावर उभरलेले कोढ.
त्याला फक्त हाच प्रश्न होता कि जन्म भर एवढी अनन्य भावानी दत्त उपासना करून आपल्याला कोढ का झाला!
एक दिवस तो वैतागून निर्णय करतो कि आता संसार सोडून काशीला जाऊन वाचलेले जीवन तिथेच काढावे.
तो आपल्या परिवाराची व्यवस्था लाऊन काशी ला जायची तैयारी करतो.
त्याआधी तो गाणगापूरला जाऊन दत्तचरणी कस्तुरी अर्पण करायचा विचार करतो.
जायच्या आधी तो गावकऱ्यांच्या आग्रहाखातर गावात दत्तप्रभोधन करतो.
त्या रात्री साक्षात दत्तगुरु स्वप्नात येऊन आज्ञा करतात कि काशी ला न जाता अक्कलकोटला जा.
दत्त आज्ञा झाल्यानी तो काशी ला न जाता अक्कलकोटला जातो.
स्वामी त्याला पाहताच म्हणतात: "हमारी कस्तुरी लाओ !"
ठाकुरदासला स्वामींचा अधिकार कळतो. स्वामी साक्षात दत्त अवतार आहे, अशी त्याला प्रचीती होते.
तो स्वामी चरणी मस्तक ठेवतो.
ठाकुरदास स्वामींना म्हणतो: " जन्म भर दत्त-उपासना करून पण मला कुष्ठ रोग का झाला ?"
स्वमी म्हणतात: "हे तुझे भोग आहे. वेळ आले कि ते संपतील."
काही दिवसांनी स्वामी ठाकूरदासला चुलीतले विझलेले लाकूड आणायला सांगतात व त्याचे काळोख तोंडावर फासायला सांगतात.
ठाकूरदासचा कुष्ठ बरा होतो.
स्वामी बोध करतात: " कर्म मुळे विपरीत-प्रारब्ध प्राप्त झाल्यानी सद्कर्माची कास सोडू नये. उपासना पंथ सांडू नये."
"भोग आपली वेळ आली कि आपोआप संपणार".
ठाकुरदास स्वामी चरणी मस्तक ठेवतो.

(१०७) राज हट्टाचा पराभव




बडोद्याचे राजा मल्हारराव गायकवाड यांच्या मनात स्वामींना बडोद्याला आणायचा विचार येतो..
लोकानी  स्वामींना बडोद्याचे स्वामी समर्थ अशे जाणावे, असे  त्यांना वाटले.
ते दरबारात विडा ठेवतात कि जो कोणी स्वामींना बडोद्याला आणेल त्यांना धन आणी जागीर देऊ.
तात्या साहेब नावाचे सरदार तो विडा उचलतात.ते अक्कलकोट साठी निघतात.
सुंदराबाई नावाची एक स्त्री होती, ती पायाला झालेल्या घावांनी बेजार झाली होती. काहीही केल्या घाव बरा होत नव्हता.
कोणी तरी तिला अक्कलकोटला स्वामींच्या शरणी जा, अस सुचवतात.
तात्या साहेबांना आपण स्वामी भक्त आहे अशी सूचना देऊन सुंदराबाई चक्क त्यांच्या रिकाम्या असलेल्या घोड्यावर बसून अक्कलकोटला येतात.
स्वामींच्या फक्त कृपादृष्टीनी सुन्दाराबाईचा पाय बरा होतो.
स्वामींकडे येणाऱ्या लोकांची गर्दी आणी अक्कलकोटचे ऐश्वर्य पाहून सुंदाराबाई अक्काल्कोटलाच राहण्याचा विचार करत्तात.
तात्यासाहेब स्वामींना बडोद्याला या अस निमंत्रण करतात, स्वामी साफ ते निमंत्रण फेटाळून लावतात.
तात्यासाहेब खूप प्रयत्न करतात. दान-धर्म.,अन्नदान पण स्वामी काही अक्कलकोट सोडायला तैयार होत नाही.
शेवटी ते चोळप्पा ला १०,००० रु. ची जागीरीचे लालूच देतात.
चोळप्पा स्वामींना बडोद्याला चला असा सल्ला देतात.
स्वामी म्हणतात: " अरे चोळ्या ! साक्षात तुझ्या समोर त्रिभुवनाचे वैभव लोळत आहे तरी तू १०,००० रु. च्या जागिरी बद्दल विचार करत आहे."
चोळप्पा खजील होतात.
शेवटी हार मानून तात्या साहेब परततात.
यशवंत राव या वेळेला विडा उचलतात.
ते स्वामींना थोड्या धाकाच्या भाषेत बोलतात, स्वामी एकदम ओरडतात- " अरे याला बेड्या घाला.".
कुणालाही काही कळत नाही. पण  थोड्याच वेळात बडोद्याचे सैनिक येऊन यशवंतरावला बेडया घालून अटक करतात.
नंतर उलघडा होतो कि यशवंतरावानी राजाला दासीच्या हाती विष दिले होते. पण राजाचे प्राण वाचतात.


राजाला पण आपली चूक कळते कि राजहट्टाचा अंमल मायेत गुंतलेले साधारण माणसावर चालवता येतो पण मायेचा समुद्र ओलांडून गेलेले 
थोर संतांवर आपण सत्ता गाजवू शकत नाही.
राजा आपला हट्ट सोडतो.