Friday, December 2, 2011

(१०८) हमारी कस्तुरी लाओ






ठाकुरदास नावाचा एक प्रसिद्ध प्रभोधनकार होता. तो जेव्हा कीर्तन करायचा तेव्हा लोकं साक्षात डोलायचे.
तो अनन्य दत्तभक्त होता. इतके असूनही तो दुखी होता-कारण त्याच्या अंगावर उभरलेले कोढ.
त्याला फक्त हाच प्रश्न होता कि जन्म भर एवढी अनन्य भावानी दत्त उपासना करून आपल्याला कोढ का झाला!
एक दिवस तो वैतागून निर्णय करतो कि आता संसार सोडून काशीला जाऊन वाचलेले जीवन तिथेच काढावे.
तो आपल्या परिवाराची व्यवस्था लाऊन काशी ला जायची तैयारी करतो.
त्याआधी तो गाणगापूरला जाऊन दत्तचरणी कस्तुरी अर्पण करायचा विचार करतो.
जायच्या आधी तो गावकऱ्यांच्या आग्रहाखातर गावात दत्तप्रभोधन करतो.
त्या रात्री साक्षात दत्तगुरु स्वप्नात येऊन आज्ञा करतात कि काशी ला न जाता अक्कलकोटला जा.
दत्त आज्ञा झाल्यानी तो काशी ला न जाता अक्कलकोटला जातो.
स्वामी त्याला पाहताच म्हणतात: "हमारी कस्तुरी लाओ !"
ठाकुरदासला स्वामींचा अधिकार कळतो. स्वामी साक्षात दत्त अवतार आहे, अशी त्याला प्रचीती होते.
तो स्वामी चरणी मस्तक ठेवतो.
ठाकुरदास स्वामींना म्हणतो: " जन्म भर दत्त-उपासना करून पण मला कुष्ठ रोग का झाला ?"
स्वमी म्हणतात: "हे तुझे भोग आहे. वेळ आले कि ते संपतील."
काही दिवसांनी स्वामी ठाकूरदासला चुलीतले विझलेले लाकूड आणायला सांगतात व त्याचे काळोख तोंडावर फासायला सांगतात.
ठाकूरदासचा कुष्ठ बरा होतो.
स्वामी बोध करतात: " कर्म मुळे विपरीत-प्रारब्ध प्राप्त झाल्यानी सद्कर्माची कास सोडू नये. उपासना पंथ सांडू नये."
"भोग आपली वेळ आली कि आपोआप संपणार".
ठाकुरदास स्वामी चरणी मस्तक ठेवतो.

No comments:

Post a Comment