Sunday, December 18, 2011

(११०) क्यो रंडी छोडी कि नही?




सोहनी नावाचा एक माणूस विधुर होता. दोन विवाह करून पण त्याचं कुटुंब नव्हते.
आपल्या आईच्या सल्ल्यानी तो तिसरे लग्न करायचे ठरवतो व त्या साठी स्वामींची परवानगी मागतो.
स्वामी चक्क नकार देतात तरीही आईच्या सांगण्यानी सोहनी लग्न करतो.
इकडे चोळप्पा आणी त्याची पत्नी स्वामी मुळे झालेल्या सोई आणी आमदनी मुळे खुश असतात.
त्यात अक्कलकोट संस्थाना कडून स्वामिनी मिळवून दिलेल्या मेहनतान्यानी त्यांना फार आधार असतो.
पण स्वामी जर सोडून गेले तर हे सर्व सुखं नाहीसे होईल अशी शंका चोळप्पाची बायको काढते.
चोळप्पा एक खड्डा खणतो. त्याचा उद्देश तो खड्डा स्वामींच्या समाधी साठी खणण्याचा असतो.
स्वामींना जेव्हा हे कळते तेव्हा ते म्हणतात: " अरे चोळ्या, आमच्या आधी आम्ही तुला या खड्यात घालून जाऊ."
स्वामी वचनाचे गांभीर्य कळून चोळप्पाची बायको कासावीस होते.
पण चोळप्पा गुरूच्या आधी जर शिष्याचे मरण आले तर याला भाग्य समजतो.
सोहनी आपल्या नूतन पत्नी सह स्वामींचा आशीर्वाद घ्यायला येतो.
स्वामी रागावतात :"अरे नाही म्हटले तरी तू लग्न केले ना . आता कशाला इथे आला आहे?".
सोहनी आपल्या नूतन पत्नी सह स्वामींचे पाय पडतो.
स्वामी म्हणतात: "तुझ्या ललाटी जे लिहिले आहे ते तुला प्राप्त हो. "
काही दिवसांनी सोहनीची बायको जीना उतरताना खाली पडते, तिच्या कम्भरेला मार बसून ती कायमची अंथरुणाला खिळते.
सोहनी स्वामी शरणी येतो.
स्वामी म्हणतात; " अरे तुला म्हटले होते, लग्न नको करू, त्तरी आमची आज्ञा मोडून तू लग्न केले."
"तुझ्या भाग्यात लग्न होते पण लग्नाचे सुखं नव्हते."
"आता जा इथून, आमच्या कडे काही उपाय नाही."

सोहनी निराशहून परततो.
त्याच्या घरी आळंदीचे नृसिंह सरस्वती आलेले असतात.
सोहनी व त्यांची मातोश्री त्यांना सर्व घाराणे सांगून उपाय मागतात.
नृसिंह स्वामी म्हणतात: "स्वामींनी म्हटले म्हणजे विधिलिखित, ते टळणे शक्य नाही."
"माझ्या जवळ सिद्ध्य आहे पण सिद्धीनी सुखं मिळते विधिलिखित टळत नाही."
सोहनी च्या सल्ल्यावर नृसिंह महाराज स्वामींना भेटायला जातात.
नृसिंह महाराज यायच्या आधी स्वामी शिष्या कडून व्याघ्रांबर मांडून ठेवतात.
नृसिंह महाराजांना पाहताच स्वामी म्हणतात:" क्यो रंडी छोडी की नही?"
नृसिंह स्वामी म्हणतात: " अभी तक तो नाही छोडी पार आपकी कृपा हुई तो जल्दी ही छोड दुंगा."

सर्व शिष्यांना नृसिंह स्वामींचा किळस येतो, एवढे मोठे महात्मा असून अशे चाळे.
स्वामी ओरडून म्हणतत: " अरे मुर्खानो रंडी म्हणजे कोणी स्त्री नसून आमचा अर्थ सिद्धीशी आहे.
जो पर्यंत हा नृसिंह सिद्धीच्या तावडीतून सुटणारा नाही तो पर्यंत त्याचा मोक्ष मार्ग उघडणार नाही.
मग स्वामी नृसिंह महाराजांना त्या व्याघ्रांबरा वर ध्यान लावायला सांगतात.
स्वामी कृपेनी त्यांना मोक्ष मार्ग सापडतो. आपण कुठे कमी पडत होतो ते कळते.
मग स्वामी त्यांना आशीर्वाद देतात, कि तुला तर मोक्ष मिळेलच पण तुझे दर्शन करणाऱ्यांना पण मोक्ष मिळणार.

No comments:

Post a Comment