Tuesday, February 21, 2012

(११२) हरी इच्छा बलीयसी


चोळपा स्वामी आज्ञा घेऊन आपली मुलगी राजुबाई ला  भेटायला जातो. तिच्या घरी गेल्यावर त्याला कळते की राजुबाई ला क्षय झाला आहे.
काहीही इलाज केला तरी गुण येत नाही. इकडे स्वामी शेणाच्या गवऱ्या बनवतात.
चोल्प्पा अक्कलकोटला परतून स्वामींकडे  साकडे घालतो. स्वामी काही न म्हणता त्याला केलेली गवरी देतात.
स्वामींचा इशारा समझुन चोळप्पा थबकतो.
काही दिवसांनी राजु बाईला देवाज्ञा होते. 
 महिन्या नंतर चोळपाच्या मुलगा- कृष्णप्पा आजारी पडतो.
त्याल वैद्या कडे नेता-नेताच त्याला देवाज्ञा होते.
चोल्प्पा वर तर जणू दुखाचा पर्वतच कोसळतो.कृष्णप्पाच्या ओर्ध्देहिकाची तैयारी चालू असताना स्वामी तिथे येतात.
स्वामी म्हणता: " रडायला काय झाले आहे?"
चोळप्पाची सासू फणफणून महानते:- 'अहो स्वामी कृष्णप्पा गेला हो .."
चोलप्पाची पत्नी स्वामींना दूषण लावते.
स्वामी म्हणता: " कौन म्हणतो कृष्णप्पा मेला आहे ? तो झोपला आहे."
मग स्वामी कृष्णप्पाला आवाज देतात- "कृष्णप्पा उठ......."
मग स्वामी हाक मारतात:- "अरे नीलकंठा उठ...".
स्वामींची ही हाक ऐकून कृष्णप्पा उठून बसतो.
स्वामी मग खुलासा करतात: " राजु बाई चा वेळ आला होता आणी त्यानंतर तिला नवीन जन्म पण घ्यायचा पण होता पण 
कृष्ण्प्पाचा हा शेवटचा जन्म होता.
या जन्मा नंतर त्याला मोक्ष मिळणार होता. तुमच्या साठी आम्ही त्याला जीवन दिले. आम्ही विधीलीखीतात अत्यंत विशेष परिस्थितीतच बदल करतो.
चोळप्पाचा परिवार स्वामींची क्षमा मागतो.

No comments:

Post a Comment