Monday, February 27, 2012

(११५) उपेक्षु नको भगवंता




शेषाचार्य एक आध्यात्मिक उंची गाठलेले व्यक्ती होते. स्वामी म्हणायचे आमची आणी शेषाची युगा-युगाची गाठ आहे.
त्रेतायुगात तो लक्ष्मण तर द्वापारात बलराम म्हणून आमची साथ देत आहे.
स्वामींना कितीही राग आला तरी तो शेषाचार्यांच्या उपस्थितिनी त्यांचा राग शमायचा.
शेषाचार्यांकडे कुलदेवता बालाजीचे पारणे असते. ते विचार करतात की स्वामी म्हणजे साक्षात बालाजी ते असतांना मंदिरात कशाला जायचे.
ते स्वामींना बोलवणे करायला येतात. तिथे असलेली मिठाई स्वामी सर्व उपस्थित लोकांमध्ये वाटायला सांगतात 
पण शेषाचार्यांना काही मिठाई मिळत नाही.
मिठाई म्हटले की शेषाचार्यांचे जीव की प्राण.
मिठाई पाहून त्यांच्या मनात 'मिठाई जिभेला किती सुखद लागते' अशे विचार येतात.
संध्याकाळी त्याच्याकडे स्वामी पारण्याला काही जात नाही. शेषाचार्य येतात तर स्वामी झोपलेले भेटतात आणी शेषाचार्य गेल्या बरोबर 
स्वामी उठून बसत्तात.
दुसऱ्या दिवशी शेषाचार्य स्वामींकडे जातात तर स्वामी त्यांना हाकलुन देतात.
शेषाचार्य मनात विचार करतात की आपल्या हातून काय चूक झाली की स्वामी आपली उपेक्षा करून राहिले आहे.
विचार करता-करता त्यांच्या लक्ष्यात येते की आपली जी मिष्टान्नावर जी वासना जडली त्यामुळे स्वामींना राग आला असावा.
त्या चुकेचे प्रायश्चित म्हणून शेषाचार्य शेण खातात..
गाईचे शेण फार पवित्र असल्यांनी स्वामींचा त्यांच्यावर असलेला रोष कमी होतो.
या वेळेला स्वामी शेषाचार्याची उपेक्षा करत नाही.
स्वामी म्हणतात: " अरे कोणाच्याही भौतिक वस्तू वर वासना जडणे म्हणजे मोक्षाच्या मार्गातली फार मोठ्ठी अडचण. अरे षड-रसाचा
मोह त्याग केल्या शिवाय अध्यात्मिक उन्नती कशी होणार ?"
शेषाचार्य पुढे वासने पासून सावध राहण्याचा निश्चय करतात.

No comments:

Post a Comment