Friday, January 7, 2011

(44) देव आणी विज्ञान

गोविंद नावाचा एक अभियंता कर्तव्यनिष्ठ आणी तेल-बुद्धीचा होता,पण तो देव-दैव काहीही मानत नव्हता.
त्यच्या प्रमाणे कर्तव्यच जगात सर्व काही होतं.
पण त्याची पत्नी आणी आई धार्मिक आणी स्वामीभक्त होते.
कितीही म्हटलं तरी गोविंद ईश्वर भक्ती करायला तैयार नसतो.
एकदा विहीर खणनासाठी भूमीपूजनाचा कार्यक्रम असतो.
अभियंता म्हणुन गोविन्दालाच पूजनाचा मानकरी ठरवलं जातं, पण गीविंद या सर्वाला पाखंड म्हणुन कुदाली घेऊन
पहिला वार जमिनीवर घालायला जातो.
पण काय कुदाल उचलल्या बरोबर गोविंद च्या छातीत अत्यंत वेदना होतात,कुदाल हातातून गळते.
वैद्यबुवा याला हृदय विकाराचा झटका सांगतात, आणी गोविंद जेम-तेम २-३ दिवसाचा सोबती आहे असं सांगतात.
गोविंद अंथरुणात खिळून राहतो.
तितक्यात भुजंग येऊन सांगतो की तो या गावी कीर्तन करायला आला होता, तेव्हाच स्वामींनी त्याला दृष्टांत देउन सांगितलं की-"
गोविंदाला घरी जाऊन निरोप दे की त्याचा रोग ललितास्तोत्र वाचल्यानी बरा होईल"
तरीही गीविंद विश्वास न करुन स्वामी वचन फेटाळून लावतो.

घरचे फार गया-वया करतात तेव्हा त्यांच्या खुशी साठी गोविंद मन नसतानाही ललिता स्तोत्र वाचतो.
२-३ दिवसा नंतर वैद्य बुवा निदान करुन सांगतात की गोविंद पूर्णत: रोगमुक्त झाला आहे.
गोविंद तर थक्क होतो, स्वामी वचनाची महत्ता त्याला कळते.
सर्व लोकं स्वामी दर्शनाला येतात.
गोविंद म्हणतो-" स्वामी माझा तुमच्यावर विश्वास नव्हता तरी तुम्ही मला रोग मुक्त कशे केले?"
स्वामी म्हणता:- "अरे! तुझा विश्वास नव्हता पण तुझ्या परिवाराचा तर होता ना !"
"अरे!, आम्हाला आमच्या भक्तासाठी तुला बरं करावं लागलं."
"अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे, अस माननं चुकीचं आहे."
" जिथे विज्ञानाचं प्रांत संपते तिथूनच देवाच प्रांत सुरु होतो."
"तुझा विज्ञान सुद्धा ईश्वरानीच  बनवला आहे."
"जशे तुम्ही शिक्षित लोकांना अशिक्षित लोकांची कीव येते तसच आध्यात्मिक उंची गाठून ईश्वरीय साक्षात्कार झालेल्या
लोकांना तुमच्या सारखे ईश्वराला न मानणारे पढत-मुर्खांची कीव येते."

No comments:

Post a Comment