Friday, January 21, 2011

(४८) भक्ताची काळजी सद्गुरूला असतेच

नारायण नावाचा एक फार मोठा सरकारी अधिकारी होता.
तो मनापासुनी स्वामी भक्ती करायचा.
 त्याची पत्नी, आई आणी मुलगा पण धार्मिक होते पण त्या लोकांची स्वामीवर श्रद्धा नव्हती.
त्यांच्या मते स्वामी म्हणजे काय एका मनुष्यच, कोणी  देव नाही.
नारायण स्वामींच्या दर्शनाला येतो. आशीर्वाद घेऊन परतताना त्याच्या लक्ष्यात येतं कि स्वामींना भेट म्हणुन आणलेली शाल द्यायची राह्यली आहे.
रस्त्यात त्याला गौराबाई अडवतात. गोरा बाई म्हणजे काय जणू दुसऱ्या सुन्दाराबाईच.
स्वामींना शाल देईन, असं म्हणुन शाल घेतात, पण स्वामींना काही देत नाही.
इकडे नारायणाला एका सरकारी कामा निमित्य अपरात्री बाहेर गावी जायचं असतं. नारायणाची आई आज किंकरांत आहे असं म्हणुन त्याला जाण्यापासुन परावृत्त करते.
तरी नारायण "स्वामींच्या सेवका नाही भयं चिंता" अस म्हणुन बाहेरगावी जातो.
इकडे स्वामी थंडीनी कुड कुडतात.समोर शेकोटी असली तरी. भुजंग, आणी चोळप्पाला घोंगडी सुद्धा पांघरु देत नाही.
गौर तिथे येते. स्वामी तिला रागावून नारायनणानी दिलेली शाळे बद्दल जाब विचारतात.गौरा निमुटपणे स्वामींना शाल आणून देते.
रस्त्यात त्याला दोन वाटमारे अडवतात आणी मारहाण करुन गाठोडी हिसकून घेतात.
नारायण रक्तबंबाळ होऊन तिथेच धरतीवर कोसळतो ,व कसा-बसा स्वामी-स्वामी म्हणत राहतो.
या जागेच्या काही अंतरावरून दोन पोलीस जात असतात. त्यांना एक मुस्लीम व्यक्ती येऊन, 'मागे एकाला दुखापत झाली आहे' असं सांगतो.
तरी ते पोलीस आम्हाला वेळ नाही असं सांगून पुढे जातात.
पुढे गेल्यावर त्यांना पुढे एक हिंदू वृद्ध भेटतो आणी तीच सूचना देतो, तरीही पोलीस आपल्या वाटेला पुढे जातात.
काही अंतरावर गेल्यावर त्यांना स्वामी प्रत्यक्ष येऊन तीच सूचना देतात.
मात्र या वेळेला स्वामींच्या तेज आणी रुबाबा मुळे पोलिसांना नाही म्हणता येत नाही आणी ते दुखापत झालेल्या नारायणाला मदत करायला परततात.
सांगायची काही गरज नसावी की मागचे दोन व्यक्तीच्या रुपात स्वमीनीच सूचना दिलेली असते.
नारायणाला पाहिल्या बरोबर पोलीस अधिकारी त्यांना लगेचच  ओळखतो आणी घरी आणून सोडतो.
वैद्याचा उपचार करण्यात येतो आणी नारायणाची प्रकृती हळू हळू सुधरते.
नारायणाची  आई  नारायणाला म्हणते- "स्वामी स्वामी, करुन काय मिळालं? किंकरांती च्या दिवशी नको जाऊ म्हटलं तरी गेला! काय केलं स्वामींनी?"
नारायणाचा तरीही स्वामीवर विश्वास ढळ राहतो.
काही दिवसांनी तोच पोलीस अधिकारी नारायणाचे हाल-हवाल विचारायला येतो.
नारायण विचारतो-"तुम्हाला मला दुखापत झाल्याची सूचना कोणी दिली  हो?"
पोलीस म्हणतो-"आम्हाला एका वृद्ध माणसांनी सूचना दिल होती."
नारायण विचार करतो, त्या दिवशी अपरात्री च्या वेळी, ते पण किंकरांतीच्या  दिवशी कोणी त्या सामसूम जागेत आपल्याला पहिले असावे?
नक्कीच स्वामीनीच काही केलं असावं.
तो आपल्या मुलाकडून स्वामींचं चित्र मागवतो आणी पोलिसांना विचारतो- " काहो! हेच का ते, ज्यांनी तुम्हाला सूचना दिली?"
पोलीस अधिकारी म्हणतो:-"हो! हो! हेच ते ."
नारायणाला गहिवरून येतं.त्याच्या घरच्यांना सुद्धा स्वामीकृपेची प्रचीती येते.पण त्यांना प्रश्न पडतो कि स्वामींनी अपघात व्हायचाच का नाही टाळला?
तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात.
स्वामी म्हणतात:-" अरे तुम्हाला काय वाटलं की आम्ही मनुष्य आहे म्हणुन काही करू शकणार नाही?"
"अरे भगवंताला कोणत्याही रुपात भक्ताची काळजी असतेच."
"नारायणाच्या नियतीत मारहाण होतीच. आम्ही नियती बदलत नाही पण भक्ताची त्यातून सुटका कशी करावी, याचं धोरण ठेवतो."
"अरे खुद्द प्रभू श्रीरामांनी आपलं वनवास चुकवायचा प्रयत्न केला नाही."
"नियती स्वताच्याच कर्मानी बनलेली असते, तिला चुकवता येत नाही पण त्या नियतीच्या तडाख्यातून आपल्या भक्ताला कसं सोडवावं, याचावरच सद्गुरूचं लक्ष्य असतं."

No comments:

Post a Comment