Friday, December 31, 2010

(४३) वाममार्गा पासुन परावृत्ती

वामनराव घोलप एका चांगल्या सरकारी हुद्यावर होता.पण त्याला लाचखोरी आणी जारकर्माची वाईट सवय लागली होती.
त्याबद्दल त्याची पत्नी अंजनी स्वामींपाशी घाराणं घालते.
स्वामी लक्ष्य देऊ असं सांगतात.अंजनीनी वामनाला समझवायचा प्रयत्न केला पण वामन उलट तिच्याशीस मारहाण करतो.
वामनाचे गाडगीळ नावाच्या गृहस्थाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते.
एकदा गाडगीळ त्या दोघांना प्रत्यक्ष रंगे हात पकडतो पण उन्मत्त वामन गाडगीळशीच मारहाण करतो.
गाडगीळ पोलिसात तक्रार नोंदवतो, त्यामुळे वामना वर खटला मांडला जातो.या बद्दल त्याच्या सुटकेसाठी अंजनी स्वामींपाशी
 घाराणं घालते.
स्वामी तिला आश्वस्त करतात.
न्याय मंदिरात पण वामन उर्मटा सारखा बोलतो पण काय, सर्व साक्ष्य वामनच्याच पक्षात बोलतात.
वामनला पण आश्चर्य होतं.
शेवटी खटल्याचा निकाल वामनच्या पक्षात होतो.
गाडगीळ त्याला येऊन सांगतो की स्वामीनी त्याला स्वप्नात दृष्टांत दिला होता म्हणुन त्यानीच साक्ष्यांना त्याच्या पक्ष्यात
साक्ष्य द्यायला सांगितलं होतं.
स्वामींच्याच आज्ञेनीच त्यांनी आपल्या पत्नीला सुद्धा माफ केले आहे.
हे ऐकुन वामनला उपरती होते. सर्व जण स्वामींकडे जातात.
स्वामी स्पष्ट सांगतात की अंजनीच्या पुण्यानीच वामनाची सुटका झाली आहे.
वामन क्षमा मागून पुन्हा वाममार्गी न जायचा प्राण करतो.

No comments:

Post a Comment