Sunday, April 3, 2011

(५६) शेजार धरम पाळावा


गणेश आणी वसीम शेजारी  होते, पण त्यांचं आपसात पटत नव्हतं.
गणेशचा मुलगा श्याम आणी वसीम चा साजिद मित्र होते, पण आप-आपल्या वडिलांच्या धाकानी
त्यांना आपसात खेळता येत नव्हते.
छोट्या-छोट्या गोष्टींवर, गणेश आणी वसीमच्या खटपटी व्हायच्या.
गणेश आपल्या मुलाकडून फक्त अभ्यास करवायचा पण त्याला खेळू देत नव्हता
आणी वसीम आपल्या मुलाला शिकु देत नव्हता.
वसीम म्हणायचं कि याला पुढे जाऊन आपला  धंदा करायचा आहे, मग शिकायची काय गरज?
एकदा  गणेश आणी वसीमची खटपट चालू असतांना स्वामी येतात, आणी वसीम कडे जातात.
त्याला ते समझ देतात कि मुलांसाठी शिक्षण किती महत्वाचं असतं,वसीम मुलाला शिकवायचं मान्य करतो.
मग गणेशकडे येतात ,त्याला समझ देतात कि नुसतं शिक्षणच नाही  खेळणं सुद्धा मुलांसाठी गरजेच असतं.
पुन्हा एकदा गणेश आणी वसीमच भांडण जुंपत ,
तेव्हा स्वामी येऊन गणेशला सांगतात कि त्यांनी  वसीमचा अपमान केला आहे,आणी त्याला त्याची एकदिवस सेवा करावी लागेल.
गणेश चक्क नकार देतो, वसीम सुद्धा गणेश कडून सेवा करुन घ्यायला तैयार नसतो.
शेजारधर्म पाळा असं सांगून स्वामी परततात.
एकदा वसीमची बायको आणी मुलगा उर्सला गेलेले असतात.
त्याचं दिवशी गणेश कडे सत्यनारायण कथा असते.
स्वामींना आमंत्रण असतं.
स्वामी येतात आणी आल्या बरोबर गणेशच्या हाती कुराण देउन त्याला वाचायला सांगतात.

थोड्या खिन्न माननी  पण गणेश कुराण वाचायला लागतो.
तिकडे वसीम ला देवाज्ञा होते.
वसीमचे घरचे विलाप करतात, गणेश सुद्धा तिथे शेजारी असल्यानी हजार असतो.
स्वामी सांगतात-" वसीम एक नेकदिल  बंदा होता. कुराण वाचतांना त्याच्या शेवटची वेळ आली होती,
गणेशनी वाचलेल्या कुरण ऐकतानाच त्यांनी प्राण सोडले.
आम्ही गणेशला जी सेवा करण्या बद्दल म्हणत होतो, ती सेवा आज गणेश कडून घडली आहे.
वसीम आता जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त झाला  आहे."
गणेशला पण  कळते कि लाख आपण नकार द्यावा पण मनुष्याला देवाची आज्ञा मानावीच लागते.
तो ही वसीमच्या बायको ला आली बहिण मानुन तिच्या परिवाराची जवाबदारी घेतो.

No comments:

Post a Comment