Sunday, July 24, 2011

(71) दानात अहंकार नसावा

गोपाळ शेट नावाचा एक व्यक्ती दानशूर होता. तो गोर-गरीबांना फार मदत करायचा पण आपलं नाव-लोकिक व्हावे ह्या इच्छेनी .
लोकांच्या तोंडातून आपला उदो-उदो ऐकायला त्याला फार आवडायचं.
एकदा स्वामींच्या मनात त्याचा गर्व दुर करायचा विचार येतो, स्वामी चोळप्पाला घेऊन गोपाळशेट च्या गावाला निघतात.
रस्त्यात त्यांना एक व्यक्ती जीव द्यायला जाताना दिसतो.
स्वामी त्याला अडवतात तेव्हा तो आपले दुःख सांगतो.
तो व्यक्ती पत्नी-वियोगानी फार दुखी होता.
सर्वांचा सुखी संसार आहे पण आपला नाही, या भावनेनी तो सदैव व्याकुळ असायचा.
आणी त्या त्रासाला गांजून तो मृत्यु पत्करायला जात होता.
स्वामी त्याला बरोबर घेऊन पुढे प्रवास करतात.
पुढे कर्जापाई सावकाराच्या जाचणी मुळे गांजलेला व्यक्ती जीव देताना सापडतो.
स्वामी त्यालाही बरोबर घेऊन पुढे प्रवास करतात.
त्या दोघांना घेऊन ते गोपाळ शेट च्या घरी येतात.
स्वामी म्हणतात: "गोपाळ शेट तुमचं दानशूर असं नाव-लोकिक  ऐकुन आम्ही तुमच्या कडे या लोकांना घेऊन आलो आहे."
"आम्हाला आशा आहे तुम्ही यांच्या दुखाला दुर करणार."
कर्जानी वैतागलेला व्यक्तीला गोपाळ शेट धनाचीमोठी पोटली देतात.
पत्नी वियोगानी गांजलेल्या व्यक्तीला लग्नासाठी त्याच्या योग्य अशी नवरी पण गोपाळ शेट गाठून देतात,
त्याशिवाय धनाची एक छोटी पोटली पण देतात.
दोन्ही व्यक्तींच्या आनंदाचा पार राहत नाही.
मग गोपाळशेट स्वामींना विचारतात की त्यांना काय अपेक्षा आहे.
स्वामी अगदी फटकळ उत्तर देतात- "आम्हाला जे पाहिजे ते वर बसलेला आमचा बाप देतो."
"आणी जर त्याची इच्छा नसेल तर जगात कोणीही काहीही दिले तरी काहीही फायदा होणार नाही."
गोपाळशेट ला अनावर राग येतो पण तो दात-ओठ चावुन राहतो.
सर्व लोकं गोपाळ शेट कडून परततात.
रस्त्यात त्यातला एक व्यक्ती चोळप्पाला आपली धनाची पोटली सांभाळायला देतो, पण चोळप्पाच्या हाती आधीच एक पोटली
असल्यानी स्वामी खुद्द पोटली हातात घेऊन चालतात.
इकडे गोपाळ शेट आपल्या माणसाला सांगतो की ज्या व्यक्तीच्या हातात काही पोटली नाही त्याला धरुन आण.
गोपाळशेट ला स्वामींना धडा शिकवायचा होता,
म्हणे खूब देव-देव करतो जेव्हा अन्न-पाण्या शिवाय तळघरात डांबून ठेवणार तेव्हा बुद्धी ताळ्यावर येईल.
शेट चा माणूस जेव्हा येतो तेव्हा स्वामींच्या हाती धनाची पोटली असल्यानी त्यांना धरत नाही
आणी उलट ज्याची ती पोटली होती त्याच्या कडे काही नसल्यानी
त्यालाच धरुन आणतो.
गोपाळशेट ला पाहिजे तो व्यक्ती नसल्यानी राग येतो.
गोपाळ शेट त्या माणसाला डांबून ठेवतात आन्ही पुन्हा आपल्या माणसाला तीच
कामगिरी करायला पाठवतात.
योगा-योगानी पत्नी- वियोगानी दुखी झालेला माणूस लघु-शंकेला जायचं म्हणुन आपल्या हातातली पोटली स्वामींना देउन जायला निघतो.
तितक्यात गोपाळ शेट चा माणूस येऊन त्याला धरुन नेतो.
या वेळेला पण गोपाळ शेट चा बेत फसतो.
गोपाळ शेट बारकाईनी  विचार करतो की ज्या माणसांनी आपल्या कडून काहीही घेतले नाही त्यांना आपण पकडू शकलो नाही
आणी उलट ज्यांना पकाडायचे नव्हते ते पकडले गेले.
गोपाळ शेटला "हरी इच्छा बलीअसी" चा सुक्तीचा खरा अर्थ काय तो कळतो.
गोपाळ शेट स्वामींच्या शरणी येतो.
चोळप्पाला काय चालले आहे तेच कळत नाही.
स्वामी म्हणतात: "अरे व्यक्ती कितीही समर्थ असला तरी ज्याच्यावर ईश्वराची सावली असते त्याचे काहीही
वाईट करू शकत नाही. ही गोष्ठ गोपाळ शेटला आता कळली आहे."
"त्या दोन व्यक्तींच्या जीवनात आतापर्यंत जे घडले ते त्यांच्या कर्मा मुळे प्राप्त झालेल्या प्रारब्धा मुळे झाले."
गोपाळशेट प्रांजळ पणे हात जोडून उभा असतांना स्वामी म्हणतात:" अरे त्या निर्दोष लोकांना सोड!"
गोपाळ शेट मान्य करतो.
"लक्ष्यात घे, दान करणे चांगले आहे, पण दानाचा अहंकार नसावा."
"एका हातानी केलेले दान दुसऱ्या हाताला ही कळायला नको"
"दान करुन नाव-लोकिकाची अपेक्षा करणे हे दान नसुन व्यापार झाला."
गोपाळ शेटला चूक पटून तो पुढे नाव-लोकीकाची अपेक्षा न करायचं ठरवतो.

No comments:

Post a Comment