Sunday, July 31, 2011

(७२) सत्याची कास

शरद आणी संतोष दोन भाऊ होते, त्यांचा परिवार अगदी गडगंज श्रीमंत होता,
पण स्वभावानी दोन्ही भाऊ अगदी वेग-वेगळ्या टोकावर
होते. शरद गर्विष्ठ, दुष्ट आणी गोर-गरीबांना छलणारा होता. संतोष त्याउलट अडलेल्या-नडलेल्यांना मदत करणारा होता.
त्यांच्या कडे गृह कामात मदत करायला कोमल नावाची एक स्त्री-गडी होती.
संतोष चा स्वभाव मन-मीळाउ असल्यानी कोमल चा भाऊ
मकरंद ,संतोष चा चांगला मित्र होता.
संतोष स्वामींकडे आल्या असतांना, स्वामी संतोष ला गीता देतात. स्वामी प्रसाद म्हणुन संतोष ग्रंथाला घरी आणतो,
पण स्वामींनी गीता आपल्याला का दिली, यावर तो फारसा विचार  करत नाही.
एक दिवशी शरद एकांत साधून कोमलला वाईट हेतूंनी धरतो.
कोमल जेव्हा फार प्रयत्न पण करुन स्वताला सोडवू शकत नाही,तेव्हा
ती  शरद च्या हाताला कड-कडीत चावा घेऊन आपली सुटका करते.
शरदच्या दरारा आणी घरच्या अन्य लोकांच्या प्रेमामुळे ती कुणालाही काहीही सांगत नाही.
पण कामांध शरद तर नवीन संधीच्या शोधात होता.
एक-दिवस घरी कोणी नसतांना तो पुन्हा कोमल वर दुराचार करायला जातो. पण योगा-योगानी संतोष तिथे येऊन
कोमल ला सोडवतो.
पण या वेळेला कोमल घरच्यांना सर्व सांगते. मकरंद पंचायत मध्ये तक्रार नोंदवतो. साक्षीदार म्हणून संतोष चा नाव देण्यात येतं.
पण संतोष धर्म संकटात पडतो,एका पक्षात त्याचा मोठा भाऊ आणी दुसऱ्या पक्षाला त्याचा जिवलग मित्र.
संतोष स्वामींचं मार्गदर्शन मागतो.
स्वामी म्हणता-" सत्याची कास धर, न्यायाच्या पक्षांनी साक्ष दे."
संतोष कोमल ला न्याय मिळवून द्यायला साक्षी साठी तैयार होतो.
चाणाक्ष शरद, आपल्या बायको ला संतोष समोर गया-वया करुन त्याला खरी साक्ष देण्यापासुन परावृत्त करायला पाठवतो.
संतोष पुन्हा गोंधळतो.
पंचायत भरते. शरद वर आरोप मांडला जातो. पंच संतोष ची उलट-तपासणी करतात.
पण शरद गप्प राहतो.
तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात.
स्वामी म्हणतात:-"शरदा! काय आप्त-जनासाठी सत्यापासुन पाठ फिरवली? अरे आम्ही तुला गीता कशाला दिली होती?"
"अरे फक्त अर्जुनासाठीच नाही तर जगातल्या सर्व दुविधेत असलेल्या लोकांना मार्ग दर्शनासाठी कृष्णानी गीता सांगितली होती."
"गीता नुसती पाठ करण्या साठी नसून आचरणात आणण्या साठी आहे."
"अरे आप्त-जनासाठी आपलं कर्तव्य आणी सत्याची कास सोडू नको."
"आत्ता पर्यंत अगणित-जन्मात अगणित-आप्तजन तुला प्राप्त झाले आहे,आणी त्या मायेतच वावरत राह्यला तर मोक्ष कधीही
प्राप्त होणार नाही."
स्वामींच्या बोधामुळे संतोष खरी साक्ष देतो आणी त्यावरून शरद ला शिक्षा होते.
मकरंद म्हणतो- "शरद ला शिक्षा झाली पण माझ्या निष्पाप बहिणीचं काय तिला काहीही न करता अपमानाचा ठपका
लागला, आता तीचाशी कोण लग्न करणार?"
स्वामी कोमल चा हात संतोष च्या हातात देतात.
कोमल आणी संतोष एकमेकासाठी अनुरूपच होते,म्हणुन सर्व लोकं फार खुश होतात.
पंच विचारतात:-"स्वामी आपल्याला तर सर्व माहित होतं, मग आपणच शरद ला शिक्षा का नाही केली?"
स्वामी म्हणतात:-" आम्ही जर ते केले असते तर कर्तव्याच्या कसोटी वर संतोषची परीक्षा झाली नसती?"
"आपले कर्तव्य पूर्ण केल्या शिवाय, सत्याची कास न धरता त्याला मोक्ष मिळाला नसता."
"आपलं कर्तव्य चोख पारपाडल्या मुळे संतोषची मोक्षाची वाट-चाल आता मोकळी झाली आहे."
संतोष गहिवरून स्वामींचे पाय धरतो.

No comments:

Post a Comment