Sunday, July 3, 2011

(६८) पेढ्यांची सांखळी

माधव आणी मंगेश  सक्खे भाऊ होते. मंगेश हा धाकटा होता. दोघेही स्वामी भक्त होते.
त्यांच्या घरी दत्ताच्या पादुका होत्या आणी दोन्ही भाऊ अगदी निष्ठेनी त्या पादुकांच पूजन करायचे.
पूजेच्या तैयारीची जवाबदारी दोघांच्या बायकांवर होती.मोठी जाऊ कामचुकार होती आपली जवाबदारी नीट पार पडायची नाही आणी
छोटी तिच्या ठरलेल्या दिवसा शिवाय पूजेची व्यवस्था करायला तैय्यार नसायची.
त्यांच्यात याच्यावरून भांडण होत राहायचे.
दोघी भावांना स्वामी सांगतात:- "अरे घराची व्यवस्था नीट ठेवणं हे पुरुषा पेक्ष्या स्त्रीच्या हाती जास्त असतं."
"पुरुषांनी स्त्रीच्या जास्त आहारी जाऊ नये. जे योग्य आहे तेच करावं."
लहान मुलांच्या भांडणावरून पुन्हा दोन्ही जावांच भांडण होतं. मोठी जाऊ छोटीच्या मुलावर हात उगारते.
मंगेश विरोध करतो आणी त्यावरून दोघा भावात भांडण होतात.
काही दिवसांनी माधवला त्याचा मित्र श्याम स्वामींचा प्रसाद म्हणुन पेढा देतो आणी सांगतो -
 "अशेच २१ जणांना पेढे वाटायचे आणी
ज्याला पेढा मिळाला त्यांनी पण २१ लोकांना पेढे वाटायचे, पेढ्याची सांखळी तुटता कामा नये.
जो असं करेल त्यावर स्वामी कृपा करतील आणी
जो नाही करणार त्याच्यावर स्वामींचा कोप होईल"
.माधव पेढे वाटतो.

मुळात दोघा भावात आपसात फार प्रेम असतं या मुळे दोघांनाही या गोष्ठीची खंत वाटतो.ते दोघे एक-मेकाची
क्षमा मागून समेट करतात. मंगेश ला एकविसावा पेढा देउन माधव त्याला साखळी कायम ठेव अस सांगतो.
पण मंगेश खऱ्या अर्थानी स्वामी भक्त होता तो अश्या अंध-विश्वासांना मानत नव्हता.
पेढे नाही वाटले तर स्वामी कोपतील, ही एक भ्रामक कल्पना आहे असं म्हणुन तो आपल्या मोठ्या भावाला सांगतो पण माधवला
पटत नाही.
पुन्हा एकदा बायकांच्या भांडणावरून दोघा भावात विवाद होतो.
पुन्हा समेट करतांना माधव मंगेश ला सांगतो कि तु पेढ्याची सांखळी मोडली म्हणून आपल्यात भांडण झालं
तरीही मंगेश चा विश्वास बसत नाही.
एकदा तर हद्दच होते. छोट्या जाऊबाईनी केलेल्या पापडा वर मोठी जाऊ घेरी आल्याच निमित्त करुन पाण्याचा घडा पाडते.
सर्व पापड खराब होतात.या वेळेला भांडण फार उग्र होउन शेवटी दोघा भावांची वेगळं व्हायची वेळ येते.
मंगेश वेगळा जायला निघतो पण दत्त-पादुका बरोबर न्यायला जातो ,माधव सांगतो कि पादुका मोठ्या भावा कडेच राहणार.
मंगेश ऐकत नाही आणी पादुका उचलायला जातो, यावरून माधव त्याला बेदम मारून हकलून देतो.
मंगेश स्वामींकडे जाऊन आपलं घाराणं सांगतो.
मग मंगेश एक क्रूर वाक्य म्हणतो कि जर माधव आणी त्याचा मुलगा मेले तर पादुका आपल्याला मिळतील.
स्वामी थोडसं रागवून त्याला साम्झावतात- "अरे काय पादुका-पादुका करत आहे? अरे देव काय फक्त पादुकात असतो का?"
"अरे जली,स्थळी,काष्ठी पाषाणी व सर्व जीवात  देव असतो."
"देव सर्वत्र व्याप्त आहे- देव नाही असं कोणचच ठिकाण नाही."
"अरे देवाची निर्गुण उपासना कर,पादुका तर उपासना करण्यात सहायता करतात पण पादुका नसल्या तर उपासनाच करता येत नाही
असं मानणं चुकीचं आहे.त्या पादुकांसाठी आपल्या भावा आणी पुतण्याची मृत्यु इच्छितो, काही वाटतं कि नाही तुला?"
मंगेश मान खाली घालुन परततो.
इकडे  चोळप्पा स्वामींनी काहीही सांगितलेलं कार्य स्वता न करता राघवच्या हाती करवून घेत होता.
एका शिष्यांनी विचारल्यावर स्वामी सांगतात कि  चोळप्पा हा पूर्व आयुष्यात गडगंज श्रीमंत  असल्यानी त्याच्यात ही वृत्ती आहे पण
त्याच्या आध्यात्मिक प्रगतीत बाधक ही गोष्ठ आम्ही दुर करू.
एकदा असच स्वामींनी दिलेलं कार्य चोळप्पा राघव ला सांगतो.
स्वामी रागावतात:- "अरे चोळ्या स्वता होऊन आमची सेवा करण्याच तु पत्करलं आहे ना? मग आम्ही दिलेले कार्य
करायला तुला पड-सेवेकरी कशाला पाहिजे?"
" 'अरे शिष्याला "दीर्घदण्डं नमस्कृत्य निर्लज्जो गुरुसन्निधौ' या वृत्तींनी गुरु कडे वावरलं पाहिजे."
(जगाची परवा न करता निर्लज्य होऊन शिष्यांनी गुरुला दंडवत नमस्कार केलं पाहिजे)
"अरे हे कार्य आमी तुमचा अहं भाव जायला करवतो,जो तुमच्या आध्यात्मिक प्रगतीत बाधक आहे."
"वरना हमे किसी से कोई काम करवाने की  जरुरत नही है."
चोळप्पा चूक मान्य करतात.
तिकडे घरी जाऊन मंगेशला कडकडून ताप येतो. काहीही केल्या ताप उतरत नाही. मंगेश ला वाटतं कि पेढ्यांची साखळी
मोडल्या मुळे हे सर्व झालं असावं.
 घरी पूजा करत असतांना माधव चा एक हात निकामी होतो.
दुसऱ्या दिवशी आप-आपल्या रोगापासून हैराण होऊन दोघे भाऊ स्वामींकडे येतात.
मंगेश म्हणतो-" स्वामी पेढ्यांची सांखळी तुटल्या मुळे माझ्यावर त्रासांचा मारा होत आहे".
माधव पण आपल्या समस्येसाठी सांखळी तुटायला कारणीभूत ठरवतो.
स्वामी जाम भडकतात:-" महा मूर्खांनो ! सांखळी तुटल्यानी काही झालं नाही. तुम्ही सर्व आपल्या कर्मामुळे दुखी झाला आहे."
"मंगेश तु पादुकांसाठी आपल्या भाउ आणी पुतण्याची मृत्यु इच्छिली."
"आणी माधव तु आपल्या पातळयंत्री आणी कामचुकार बायकोच्या सांगण्यात येऊन आपल्या भावाशी भांडण केले,
त्याला बेदम मारलं."
"अरे सांखळीचा आध्यात्मिक दशहतवाद कौन पसरवतो याचा विचार का नाही केला?
"पेढे खपल्या मुळे कुणाला फायदा होणार एवढी छोटीशी गोष्ठ तुम्ही सर्वांच्या लक्ष्यात कशी नाही आली?"
दोन्ही भाऊ आपली चूक मान्य करतात.
स्वामी म्हणतात:-"माधवा,आपल्या छोट्या भावाला प्रेमानी कुशीत घे."
माधव म्हणतो :"-स्वामी पण माझा हात निकामी झाला आहे."
स्वामींच्या कृपादृष्टीनी माधव चा हात बरा होतो, तो मंगेशला कुशीत घेतो,
आणी चटकन ओरडतो-"अरे मंगेश तुझा ताप पूर्णपणे उतरला आहे."
स्वामी कृपेनी दोघे भाऊ पूर्णपणे निरोगी होतात.
आता मागे झालेल्या चुकांना विसरून ते पुन्हा गुणा-गोविंदांनी एकत्र रहाण्याचं ठरवतात.


No comments:

Post a Comment