Saturday, December 4, 2010

(40)वृक्ष वल्ली आम्हा सोयरी

गणपत नावाचा एक स्वामी भक्त होता. त्याच्या बायकोच नाव वसुधा होतं.
थोडक्यात त्यांचा संसार सुखात चालला होता.
एक दिवस गणपत स्वामींना आपल्या घरात आमंत्रित करतो, स्वामी आजच तुझ्या कडे येऊ असं सांगतात.
गणपत आनंदानी घरी परततो.गणपत च्या घरात त्याचं दिवशी त्याची सासुबाई येते.
गणपत च्या घरा बाहेर एक कडू लिम्बाचं झाड असतं.त्या झाडावर त्याच्या आईचा फारच जिव्हाळा असतो.
आल्या बरोबर वसुधाची आई वसुधा ला त्या झाडा ला कापव असा आग्रह धरते.
तिच्या मते भरलेल्या आणी सुखात नांदणाऱ्या घरा समोर असं झाड नको.
तिच्या फार आग्रहानी वसुधा नवऱ्याशी ते झाड कापण्यासाठी हट्ट धरते.
स्त्री हट्टा पुढे हार पत्करून नवरा झाड कापवायला तैयार होतो.
लाकुडतोड्याचा पहिलाच वार झाडावर पडणार तेव्हाच स्वामी तीथे येतात.
आल्याबरोबर ते गणपत ला फार रागावतात:- " मुर्खा...! गाढवा !
अरे हिरव्या गार झाडाला कशाला कापवतो आहे. अरे वृक्षा मुळेच आपल्याला प्राण वायू मिळते.
अरे नीम वृक्षामुळे रोग पसरवणारे जीवांचा नाय- नाट होतो.
अरे अश्या झाडाला कापण्याचा विचार तरी कसा येतो तुमच्या मनात."
असं म्हणुन स्वामी तिथुन ताडकन निघून जातात.
सर्व जण स्वामींच्या मागे जातात.
स्वामी त्यांना एका जागेवर बसलेले दिसतात त्यांच्या काना जवळ रक्ताच्या धारा वाहत असतात.
गणपत च्या उपचार करण्याच्या गोष्टीवर स्वामी चक्क नकार देतात.
गणपत पण म्हणतो-" माझ काहीही झालं तरी मी तुमचा उपचार करणारच."
तितक्यात स्वामींचा घाव आपोआप नाहीसा होतो, वाहणारं रक्त थांबतं.
सर्व थक्क होतात.
स्वामी म्हणतात:-" आम्हाला घाव नव्हताच आम्ही फक्त संभ्रम उत्पन्न केला होता.
तुम्हा लोकांच्या मनावर जसा परिणाम झालं तसाच परिणाम तुम्ही लोकं दुसऱ्याच्या बोलण्यानी करुन घेतात.
गणपत च्या सासूनी आपल्या शब्दांनी वसुधा वर केला आणी वसुधानी तसाच परिणाम गणपत वर केला.
त्या परिणामा पाई गणपत वृक्ष्य हत्या सारखं महापाप करायला निघाला होता.
अरे दुसऱ्यांच ऐका पण आचरणात आणल्या पूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला, विवेकानी त्या सल्ल्याची पारख करा,त्या आधी
आचरणात आणू नका.
अरे निसर्गाशी पाहिजे तस वागतात मग निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा त्याला दोष देत बसतात."
गणपत आणी त्याचे परिजन  स्वामींची क्षमा मागतात.

No comments:

Post a Comment