Thursday, December 2, 2010

(39) कुणावरही आंधळा विश्वास नको

भुजंग स्वामींपाशी येऊन तक्रार करतो कि मित्राला उधार दिलेले पैशे परत नाही मिळत आहे.
स्वामी पहिले हाजिरी घेतात-:-
"अरे माहित होतं ना मित्राचा स्वभाव कसा आहे, तरी पैशे उधार  कशाला दिले?
अरे  व्यवहारात सावधगिरी बाळगायला पाहिजे."
मग स्वामी म्हणतात दोन दिवसात पैशे मिळतील.
चोळप्पाला म्हणतात-"जसा  राजा तसी प्रजा!
राजाला सुद्धा कळत नाही कुणावर विश्वास ठेवावा."
राजा खंडेराव यांचा कारभारी दाजीबा यांना इंग्रजांनी अटक केली होती,
त्यांच्या स्वभाव फार कठोर असल्यामुळे तो इंग्रजांशी सुद्धा उर्मटपण्यानी वागतात  ,त्यामुळे  इंग्रज अटक  करतात.
राजा खंडेराव आपली जामीन देउन आणी दंड भरून दाजीबाला सोडवून आणतात, आणी त्याला प्रमुख कारभारी नियुक्त करतात.
न्यायनिवाडा दाजीबाच्या हातात दिला जातो. दाजीबा अविवेकानी शुल्लक अपराधासाठी सुद्धा कठोर दंड देतात.
स्वामींच्या कानावर दाजीबाच्या कारस्तान्या येतात.
स्वामी म्हणतात:- "दाजीबा आपल्या कर्माचे फळ भोगणार आणी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवणारा राजा पण फळ भोगणार."
चोळप्पा राजाशी जाऊन दाजीबा बद्दल बोलतात.
"प्रजा सुखी नाही, न्यायपदाधिकाऱ्या मुळे प्रजा हैराण  झाली आहे."
राजा म्हणतो- "आमचं रयतेवर पूर्ण लक्ष्य आहे.आम्ही योग्यच माणसाची  नेमणूक केली आहे."
राजा चोळप्पाच बोलणं फेटाळून काढतात.
इंग्रजांचा खलिदा येतो, संस्थान जब्त करण्या बाबद.
राजा स्वामी शरणी येतो.
स्वामी सांगतात:- "चुकीचा माणूस अटक झाल्यावर सावध होण्या ऐवजी त्याला सोडवून बढती का देण्यात आली?"
दाजीबा आधीच मर्कट त्यावर बढतीचं मद्य प्यायला घातलं गेलं, त्याचाच हा परिणाम आहे.
रयत पिडली गेली.दाजीबा क्षमा मागतो
स्वामी म्हणतात:-"तुला क्षमा नाही.
तुला इंग्रज शिपाई पकडून नेतील."
स्वामींचं वाक्य संपायचाच अवकाश असतो कि इंग्रज शिपाई दाजीबाला अटक करतात.
राजा स्वामींची करुणा भाकतात.
स्वामी म्हणतात:-"तु गुरुपदेश मानला नाही आपल्या मनाचं केलं."
राजा शरणागती  पत्करतो.
स्वामींना करुणा येऊन म्हणतात :-"जो पर्यंत आम्ही आहे तोपर्यंत या संसाथानाचं काहीच वाकडं होणार नाही."

No comments:

Post a Comment