Sunday, October 2, 2011

(९०) गोष्ट इच्छा भोजनाची

दामाजी आणी तुळसा एक जोडपे होते. ते अत्यंत दरिद्री असले तरी त्यांना स्वामींना भोजन करावायचे होते.
ते शिधा घेऊन स्वामींकडे येतात.
स्वामी त्यांना आम्ही चर-चरात आहे असं सांगुन धर्मशाळेत जेवण तैयार करुन चार ब्राह्मण वाढ, असे सांगतात.
दामाजी चार ब्राह्मणांना जेवण घालतो.
आता त्यांच्या कडे तीन पत्रावळी इतकेच अन्न शिल्लक उरते. एक पत्रावळ स्वामींना देउन
नंतर आपण भोजन करू असे ते ठरवतात.
तितक्यात एक हिंदी भाषी बिहारी ब्राह्मण येउन जेवणाची इच्छा प्रगट करतो.
दामाजी त्याला एक पत्रावळभर अन्न देतो.
पण तो पूर्वी ब्राह्मण जेवणाचा पक्का होता. तो अजून जेवण मागतो.
दामाजी दुसरी पत्रावळ पण देतो.
ब्राह्मण तरीही अन्न मागतो.
शेवटी दामाजी त्याला शेवटची उरलेली पत्रावळ पण देतो.
ब्राह्मण तृप्त होतो आणी जाता-जाता त्यांना  पत्रावळीतली काही भजी प्रसाद म्हणून देतो.
दामाजी आणी तुळसा स्वामींचे दर्शन करुन प्रसाद ग्रहण करू अशे ठरवतात.
स्वामी त्यांना पहिल्या बरोबर म्हणतात: " अरे पेट भर भोजन कराया पर भजीये में नमक कम था."
दामाजी आणी तुळसा भजी खातात तर खरच मीठ कमी होते.
त्यांची खात्री पटते की स्वामी बिहारी ब्राह्मणाच्या रुपात येउन अन्न ग्रहण करुन गेले होते.
तितक्यात नारायण शास्त्रीनी पाठवलेली दोन इंग्रज अधिकारी स्वामींची उगीच्ची शहा-निशा करुन चमत्कार दाखवा असा हट्ट करतात.
स्वामी फाडकन म्हणतात: "पहिले एकमेकांच्या बायका बरोबर झोपणे बंद करा मग या आमची चोकशी करायला या."
आपले गुपित स्वामी जाणुन आहे हे कळल्यावर इंग्रज अधिकारी मान खाली घालुन चालते होतात.

No comments:

Post a Comment