Sunday, October 2, 2011

(९१) स्वामीनी केली कर्जापासून सुटका

सोलापूर मध्ये राहणाऱ्या एका गृहस्थाची ही कथा आहे. विशेष म्हणजे काही वर्षा पूर्वी झालेली ही घटना
आहे.
एक गृहस्थ होता. घराच्या कर्जाचे हप्ते फेडता न आल्यानी बँक त्याचे घर जब्त करणार होती.
तो कंपनीत कर्जा साठी अर्ज करतो पण लोन पास होत नाही
आणी उलट जागतिक मंदीमुळे त्याला नारळ मिळतो.
नोकरी गेली आता घर जाऊन आपण सडकेवर येणार या भितीनी तो आपल्या मुली आणी बायकोला घरी सोडुन
वाटेल त्या वाटेला पळून जातो.
एका बागेच्या बाकावर तो हात-पाय गळुन बसला होता, तितक्यात एक रुबाबदार सुट घातलेला माणूस मोटारीतून उतरतो आणी
स्वामींच्या मंदिराचा रस्ता विचारतो.
नंतर तो श्रीमंत माणूस आपुलकीनी त्याच्या चिंतेचे कारण विचारतो. तो गृहस्थ आपले सर्व वृतांत सांगतो.
श्रीमंत व्यक्ती त्याचे सांत्वन करुन त्याला बोध करतो:
"मार्ग कधीही संपत नाही मनुष्याचा शोध संपतो "
"अरे आपले दुख किती मोठे आहे हे जगाला न सांगता, दुखाला सांग की माझा देव किती मोठा आहे"
दुखत असलेल्या माणसाला कितीही कोणी सम्झावले तर फारसे पटत नाही. श्रीमंत माणूस जातो पण त्याची ब्रीफ केस राहुन जाते.
तो गृहस्थ ओरडून श्रीमंत व्यक्तीला थांबवतो पण तो श्रीमंत माणूस कार मध्ये बसून निघून जातो.
गृहस्थ मागे परततो तेव्हा त्याच्या हातातून ब्रीफकॅस पडते आणी उघडते, गृहस्थ पाहतो तर काय त्यात पैशे होते.
तो एका निर्जन  स्थानी पैशे मोजतो तर काय नेमके तेवढेच पैशे जेवढे त्याचे कर्ज होते.
तो त्या श्रीमंत व्यक्तीला आठवतो तर त्याचा चेहरा-मोरा फार काही स्वामी सारखंा होता. त्याला कळतं की स्वामीच
श्रीमंत व्यक्तीच्या रुपात येउन त्याची मदत करुन गेले आहे.
तो घरी परततो. तेव्हा बँक त्याच्या बायको-लेकीला घराबाहेर काढून घर सील करत होतं,
तो बँकेच्या माणसाला पैशे देउन घराचा ताबा मिळवतो.
जेव्हा बायको-लेकीला सर्व वृतांत सांगतो, तेव्हा दोघींनाही गहिवरून येत.
ते अनन्य भावांनी स्वामींच्या फोटोला नमस्कार करतात.

No comments:

Post a Comment