Sunday, October 16, 2011

(९५) मृत्युपासून सुटका

शास्त्रीबुवा काशीचे प्रकांड ज्योतिषी होते. लग्नाचे अनेक वर्षे झाले तरी त्यांना अपत्य झाले नव्हते.
काही काळ लोटल्यावर त्यांना अपत्य प्राप्ती होते- तीही दत्त जयंतीच्या दिवशी.
पण शास्त्री बुवांच्या चर्येवर विशाद पसरला होता. कारण त्यांनी त्याची कुंडली मांडुन तो अल्पायुषी आहे असे जाणले होते.
कुंडली प्रमाणे वयाच्या आठव्या जन्मदिवसा वर मुलाला देवाज्ञा होणार होती.
जशे-जशे मुलाचे वय वाढत होते, शास्त्रीबुवांची बैचेनी वाढत होती.ते श्रीधर च्या आयुष्यासाठी कठोर अनुष्ठान करतात.
त्यांना देववाणी होते की अक्कलकोटला स्वामी समर्थ यांच्या कडे जायची..
शास्त्रीबुवा आपल्या परिवारासह अक्कलकोटला जातात. स्वामी त्यांची राहण्याची व्यवस्था करवतात.
दत्त जयंती येणार होती. सर्व जन आनंदात होते पण शास्त्रीबुवा अत्यंत चिंतीत होते,
कारण दत्त जयंतीच्या दिवशीच त्यांचा मुलगा श्रीधरला याला देवाज्ञा होणार होती.
दत्त जयंतीच्या दिवशी स्वामींची पाद्य पूजा झाल्यावर श्रीधर धरतीवर कोसळतो, त्यचे हात-पाय गार पडायला लागतात.
शास्त्री बुवा स्वामींची करुणा भाकतात. स्वामी शिष्याकडून काळे उडीद मागवतात.
शास्त्रीबुवांचा  तर थरकम्पच सुटतो कारण काळे तीळ अंतिम संस्कारात लागतात.
स्वामी तिळात साखर घालुन श्रीधरच्या तोंडात घालतात.
श्रीधर खाडकन उभा राहतो.
 मग स्वामी त्याला घ्यायला आलेल्या यमदूताना एक सुकलेले झाडाला घेऊन जा अशी आज्ञा करतात.
झाड जमिनीवर कोसळते.श्रीधरचे गंडांतर टळतो.

No comments:

Post a Comment