Monday, October 24, 2011

(९९) गुरु तारणहार

राज्यात पाण्याची टंचाई होते, म्हणुन राजे विहीरी आणी पाणपोई बनवा अशी आज्ञा देतात.
नथोबाला ही जवाबदारी देण्यात येते. नथोबा अनन्य स्वामीभक्त होता.
राज्याच्या दरबारात दाजीबा नावाचा एक  अगदी अप्रामाणिक व्यक्ती होता.
तो नथोबाला खर्च जास्त दाखवून उरलेली रकम आपसात वाटू, असा सल्ला देतो.
प्रामाणिक नथोबा ठाम पणे नकार देतो.
रघुनाथ शास्त्री दाजीबाला कुटील सल्ला देतो. त्याप्रमाणे दाजीबा राजाला चाहाडी करतो की नाथोबा सरकारी खजिन्यात
गफलत करत आहे.
राजा हिशोब मागवतात तर खरच फार मोठी रकम कमी निघते.
राजा नथोबाला बडतर्फ करतात आणी १०० फटक्याची शिक्षा पण ठोठावतात.
रात्री राजा स्वामींच्या दर्शनाला येतात, नमस्कार करतांना स्वामी राजाला हातानी ढकलून पाडून देतात.
स्वामी रागावतात: "अरे राजा असून डोळ्यावर झापड  लाऊन काय बसला आहे. राजानी डोळस असले पाहिजे."
"अरे पूर्ण शाहनिशा न करता तु प्रामाणिक आणी निष्पाप लोकांना काय शिक्षा करतो."
"अरे हे सर्व दाजीबानी रचलेला कट आहे.तितक्यात खजिन्याचे अधिकारी येउन सांगतात की हिशोब अगदी चोख आहे आणी
काही गल्लत झाल्यामुळे हिशोब चुकला होता."
राजा नथोबाची शिक्षा माफ करुन पुन्हा कामावर पण रुजू करतो.
पण नथोबाचा तर मोह्भंग झाला होता, तो संसाराला राम-राम करून स्वामी-सेवेत आयुष्य काढायचे ठरवतो.

No comments:

Post a Comment