Sunday, October 16, 2011

(९६) गोष्ट चीमाच्या गडूची

रामचंद्र नावाच्या एका भक्ता कडे स्वामी येतात. तिथे जाऊन ते चक्क विहिरीच्या पाळीवर जाऊन बसतात.
रामचंद्राची मुलगी चीमा स्वामींना एका गडूत पाणी आणुन देते, स्वामी पाणी पिऊन गडू विहिरीत टाकतात.
तो गडू चीमाचा आवडता होता. ती स्वामींना विचारते: " गडू का विहिरीत टाकला?"
स्वामी म्हणतात:" गडू पाहिझे तर जा विहिरीत आणी काढ."
चीमा काही विचार न करता विहिरीत उडी मारते.
विहीर १०० हात खोल होती. तिच्या आईवडिलांचा जीव कासावीस होतो.
ते मदतीला लोकांना बोलावतात.
स्वामी म्हणतात: " ती आपल्या मर्जीनी गेली आणी आपल्या मर्जीनी परत येईल. "
काही वेळानी चीमा आपोआप विहिरीतून बाहेर येते.
स्वामी बोध करतात: " गुरुवर विश्वास ढळ असावा काहीही झाले तरी गुरु आपल्यासाठी जे करणार ते हिताचेच असणार
अशी भावना असावी."
रामचंद्र आपली चुक मान्य करुन स्वामी चरणी मस्तक ठेवतो.

No comments:

Post a Comment