Monday, September 12, 2011

(८१) निपुत्रिक स्त्रीला पुत्र प्राप्ती

नारायण शास्त्री  पुढे जातात तर रस्त्यात एक लहान मुलगा स्वामी भक्ती करतांना दिसतो. शास्त्री त्याच्या आईला जाब विचारतात
की एवढ्या लहान मुलाला हे काय स्वामी भक्ती शिकवली.
ती बाई सांगते की हा अवधूत स्वामींच्या कृपेमुळेच झाला आहे.
ती आपली कहाणी सांगते.
तीच नाव रुख्मीणी असतं, लग्नानंतर फार वर्षे होऊन ही तिला संतती होत नसते, आणी त्यावर तिला क्षय रोग ही जडतो.
तिच्या नवऱ्याचा मित्र तिला स्वामींकडे आणतो. स्वामी तिला बोरीच्या झाडाची सेवा करायला सांगतात.
मागच्या जन्माच्या कर्मा मुळे हे झालं आहे पण बोरीच्या झाडाची सेवा केल्यानी हे दोष फिटणार.
बोरीचे झाड काही देवीय झाड नाही म्हणुन जोडपं वडाच्या झाडाची  प्रदक्षिणा करतात.
हे पाहून त्यांना स्वामी कडे नेणाऱ्या भक्ताला दुःख होतं आणी तो स्वामींकडे जातो.
स्वामी तिथे बोरीचे रोप लावत असतात. भक्त म्हणतो स्वामी हे रोप मोठे होईल तो पर्यंत रुख्मिणी काही राहणार नाही.
स्वामी म्हणतात की तिच्या साठी मुंबईच्या कामाठीपुऱ्यात कधीचे झाड लागले आहे.
भक्ताला स्वामींच्या वाक्यातली खोच कळते, तो लगबगीने रुख्मीणी कडे येउन स्वामी वचनाचे मर्म सांगतो.
भक्त म्हणतो: "रामाला बोर खाऊ घालणारी शबरी राम मय झाली होती तसेच स्वामी सुत राममय झाले आहे.
बोरीच्या झाडाशी तात्पर्य त्यांच्या मठात सेवा करण्याशी आहे."
रुख्मिणीचा क्षय रोग फार वाढला होता तरी ती कशी-बशी हिम्मत करुन मुंबईच्या मठात जाते आणी सेवा सुरु करते.
तिला तिथे दिवस जातात आणी त्या मध्ये तिला कळत सुद्धा नाही तिचा क्षय रोग केव्हा बरा झाला.
गोपाळ अष्टमीच्या दिवशी जसाच गोपाळ कृष्णाला पाळण्यात ठेवण्यात येतो तेव्हाच तिला पण पुत्र प्राप्ती होते.
त्या मुलाचे नाव अवधूत ठेवण्यात येत.
नारायण शास्त्रीना आता स्वामी कोणीतरी मांत्रिक वाटतो ते स्वामींना भेटायला पुढचा प्रवास करतात.

No comments:

Post a Comment