Sunday, September 4, 2011

(७७) गोष्ट मणब्याची

राम नवमी होती. रामजन्मासाठी गावातले प्रकांड विद्वान नारायण शास्त्रींना बोलावण्यात येतं.
रामजन्माच्या वेळेला केशव सपत्नीक येतो. केशवला पहून शास्त्री बुवाच्या तळपायाची आग मस्तकात जाते.
शास्त्रीबुवा केशवच्या कमरेत लात घालुन पाडून देतात. ते
गड्याच्या हाती केशवला हकलून देतात.
केशवचे सर्व पुत्र जन्मापासून मतिमंद होते, म्हणुन शास्त्री बुवा त्याला पापी समझुन तिरस्कार करायचे.
पण केशव अनन्य स्वामीभक्त होता, कितीही वाईट झालं तरी त्याची स्वामी वर श्रद्धा अढळ होती.
त्यांच्या मते गावात अशे पापी माणसे राहिले तर गावावर गंडांतर येतं.
दुसऱ्या दिवशी शास्त्रीबुवा पंचायत बोलावून केशवला परिवारा सकट गावा बाहेर काढायला लावतात.
सगळ्या गावात शास्त्रीबुवांचा दरारा होता, म्हणुन पंच त्यांच्या इच्छेप्रमाणे निकाल देतात.
गाव सोडुन, आपल्या मतीमंद मुलांना कुठे जाऊ या चिंतेनी केशव परिवारा सकट विषपान करतो.
संध्याकाळी केशव गाव सोडुन गेला की नाही, हे पाह्यला शास्त्री बुवा गावकऱ्या बरोबर येतात.
पाहतात तर पूर्ण परिवार विषप्राशन करुन पडला होता,फक्त मणब्याची नाडी चालत होती.
शास्त्री बुवा मणब्याला वनात सोडायला सांगतात.
गावकरी मणब्याला वनात सोडायला जातात. वनात त्यांना भारदस्त चाहूळ लागते, कोणी तरी हिंस श्वापद
असावं, असं समझुन गावकरी मणब्याला तिथेच सोडुन परततात.
दुसऱ्या दिवशी शास्त्रीबुवा आणी गावकरी मणब्या बद्दल गोष्ठी करत असतात..
शास्त्रीबुवा म्हणतात: "अर्ध्या रस्त्यात मणब्याला सोडले तरी काही काळजी करू नका,
आधीच पोटात विष आहे आणी तुम्ही लोकांच्या
मागे जे श्वापद लागले होते त्यांनीच त्याला खाऊन टाकले असावे.
" नाही... नाही ...., शास्त्रीबुवा तुमच्या दोन्ही गोष्ठी चूक आहे, मी जिवंत आहे."

शास्त्रीबुवा पाहतात तर काय? हे वाक्य मणब्याच्या तोंडाततुन पडले होते.
मणब्या जो आधी बे..बे असा आवाज काढून इशाऱ्यानी बोलायचा तो असं अस्खळीत बोलत होता.
शास्त्री बुवा म्हणतात: "तु जिवंत कसा आणी तु बोलायला कसा लागला?"
मणब्या फाड-फाड बोलून सांगतो की वनात एक साधू आले आणी त्यांच्या कृपेनी मी बोलायला लागलो आणी
माझा मतीमंद पण पण गेला.
गावकरी म्हणतात की असं भेटलं तरी कोण तुला ?
मणब्या ओल्या मातीवर काडीनी रेखा चित्र काढून दाखवतो.
गावकरी पटकन ओळखतात: " हे तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ"
शास्त्रीबुवा दातओठ चावुन राहतात. आता कोणच्याही कारणांनी मणब्याला गावा बाहेर काढता येणार नव्हते.
सर्व लोकं स्वामींचा जय-जयकर करतात.
शास्त्रीबुवा पुन्हा मणब्याला विचारतात " स्वामींनी मग तुझ्या आई-वडिलांना आणी भावांना का नाही वाचवले?"
मणब्या एका विद्वानासारखे उत्तर देतो-" संत निसर्ग नियमात सहसा बदल करत नाही, अगदी विशिष्ट परिस्थिती ला वगळून"
"माझे आई-वडील आणी भाऊ आपल्या गतीला प्राप्त झाले, त्यांच्या साठी हेच उत्तम होते."
"जीवन जगणे हे महत्वाचे नाही जन्म-मरणाच्या चक्रातून सुटणे हे महत्वाचे आहे."
मणब्याच्या काय पालट मुळे शास्त्री बुवांचे डोके एकदम फिरते.
ते मुकाट्यानी असा स्वामी समर्थ आहे तरी कोण हे पहायला अक्कलकोट साठी प्रस्थान करतात.

No comments:

Post a Comment