Sunday, September 25, 2011

(८७) मीपणाचा त्याग

स्वामी नृसिंह सरस्वती चे अवतार आहे, हे नारायण शास्त्रींना फारसे पटत नाही.
मार्तंड मंदिराचा पुजारी त्यांना अक्कलकोटला जाणाऱ्या रामदासी बुवांची ओळख करुन देतो.
शास्त्रीबुवा महंता बरोबर अक्कलकोटला निघतात.
रामदासी बुवा एका मठाचे महंत होते.
 फार विद्वान चतुर्वेदी ब्राह्मण पण फार गर्विष्ठ.
वेद शास्त्रार्थात  चांगल्या-चांगल्यांचा पराभव  करायचे मग त्यांना शिक्षा म्हणुन आपले पायताण डोक्यावर घेऊन उभे ठेवायचे.
एक दिवस स्वामी तिथे येउन मुक्कामाची परवानगी मागतात. मठात जागा नसते म्हणुन ध्यान-कक्षात
फक्त एका तासा साठी त्यांना परवानगी देतात.
स्वामी तिथे गाढ झोपतात.
एका तासानी महंत येतात आणी स्वामींना उठवतात पण स्वामी काही उठत नाही.
स्वामींची अद्दल घडवायला, महंत बुवा खोलीला बाहेरून ताळा लावून जातात.
स्वामी मठात आहे म्हणुन दर्शनाला स्वामीभक्त गोरे शास्त्री येतात.
महंत त्यांना सांगतात की त्यांनी स्वामींना खोलीत डांबून ठेवले आहे.
गोरेशास्त्री समाझवतात की स्वामी चैतन्य आहे व कोणीही त्यांना अशे डांबून ठेऊ शकत नाही.
पण महंत काही ऐकत नाही.
गोरे शास्त्री स्वामींच्या खोलीच्या दाराबाहेर खिन्न मनानी बसून राहतात.
तितक्यात दारातून एक ज्योती बाहेर पडते. गोरेशास्त्री त्या जोतीच्या मागे जातात.
पुढे एक सरोवर येतं. ज्योती सरोवरात लुप्त होते आणी त्याजागी स्वामी सरोवरात सुर्याला अर्घ्य देत असतात.
महंत तिथुनच जात असतात.स्वामींना बघून महंत अगदी थबकतात.
 स्वामी बाहेर येतात. महंत आणी गोरे बरोबर स्वामी पुन्हा मठात येतात.
महंत खोलीचे दार उघडतात तर तिथे स्वामी गाढ झोपलेले दिसतात. आणी त्यांचा बरोबर स्वामी उभे पण असतात.
एका बरोबर स्वामींचे दोन रूप पाहुन महंत शरण येतात.

स्वामी शिकवण देतात-" शास्त्री  बुवा, तुम्ही ज्ञानी आहा पण अहंकार तुमच्या प्रगतीत बाधक आहे. "
"अहंकारणी राग येतो आणी राग राखेत मिळवतो."
"प्रकाशाला कोणी कोंडू शकत नाही."
"ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असते कारण ज्ञानात अपेक्षा असते पण भक्ती निरपेक्ष असते."
महंत बुवा चूक मान्य करुन स्वामी भक्त बनतात.

No comments:

Post a Comment