Sunday, September 25, 2011

(88) चोळप्पाच का?

अखेर नारायणशास्त्री  स्वामींच्या सामोरे येतात.
ते स्वामींना फटकळ पणे विचारतात की फार दंत कथा ऐकल्या आहे तुमच्या बद्दल, काही चमत्कार करुन दाखवा.
स्वामींच्या प्रत्येक चमत्कारा माघे काही विशिष्ठ हेतू असायचा त्या अतिरिक्त स्वामींनी कधीही चमत्कार दाखवले नव्हते.
नारायणशास्त्रीला ही चमत्कार दाखवणे त्यावेळी स्वामीनी गरजेचे समजले नाही. आणी प्रांजळपणे 
मी सामान्य माणूस आहे असे म्हणुन टाळतात.
नारायण शास्त्री स्वामींना बोल बोलत गर्वाने तिथुन निघतात.
अहमद एका गावकऱ्या बरोबर जाऊन नारायण शास्त्रींना जाब विचारतो. कुटील नारायण शास्त्री त्यांना भ्रमित करतात.
नारायण शास्त्री:- "अरे गुरूंना सर्व शिष्य समान असायला हवी मग स्वामी चोळप्पा- चोळप्पा कशाला करतात?"
"चोळप्पा त्यांना पोसतो म्हणुन स्वामींनी त्याला विशेष दर्जा दिला आहे."
शिष्य या तर्काच्या आहारी जातात.
ते स्वामींना जाब विचारण्यासाठी येतात.
स्वामी त्यांना आपल्या बरोबर या असे सांगतात.
चोळप्पा बरोबर सर्व लोकं स्वामींच्या मागे जातात.
स्वामी काटेरी रस्त्यात शिरतात चोळप्पाला वगळून सर्व शिष्य थांबतात.
काही दुर जाऊन स्वामी परततात आणी म्हणतात :-" ह्या साठी आम्हाला चोळप्पा प्रिय आहे."
"खरा शिष्य कितीही अडचणी आल्या तरी गुरुची साथ सोडत नाही,सर्व शिष्य मान खाली घालतात. त्यांना आपली चुक कळते."
स्वामी म्हणतात: "अरे चोळप्पाचे आणी आमचे नाते जन्मा-जन्मा पासुन आहे."
" शिष्याला गुरु प्रती श्रद्धा, निष्ठा आणी भक्ती पाहिजे."
"आणी चोळप्पा मध्ये हे सर्व गुण असल्यामुळे चोळप्पा  आम्हाला प्रिय आहे."


No comments:

Post a Comment