Monday, September 12, 2011

(८३) उंदीरास जीवनदान

शास्त्री पुढे निघतात, रस्त्यात त्यांना मोरोपंत नावाचा एक राजपुरोहित एक वृतांत सांगतो.
गणेश चतुर्थीचा दिवस होता.राजमहालात गणपती बसवायची पूर्ण तैयारी झाली होती.
मोरोपंत राजाची  वाट पाहत असतात. तितक्यात तिथे एक  उंदीर येऊन थैमान घालतो.
काहीही केल्या तो पकड मध्ये येत नाही.
राजा देवघरा कडे येतात तर पहातात की स्वामी आलेले आहे.
आता स्वामींशी बोलावे की गणपती स्थापना करायची, स्वामी त्याला गणपती स्थापना कर अशेसांगतात.
स्वामी बाहेर झोपाळ्यावर बसतात.
राजा पुजेला बसतो, उंदीर पुन्हा येऊन मोरोपंतांना नडतो.
मोरोपंत हातातले चंदनाचे खोड नेम धरुन उदिंराला मारतात. उंदीर प्राण सोडतो. शिपाई उन्दिराला बाहेर फेकायला जातात.
स्वामी त्याच्या कडून मृत उंदीर घेतात आणी त्याच्या पाठीवर प्रेमानी हात फिरवतात.पाहता-पाहता उंदीर जिवंत होतो.
सर्व जण थक्क होतात.
स्वामी मोरोपंताला बोध करतात: " अरे सर्व जीवात देव असतो, अरे जीवाचा वध करुन मूर्तीपुजेनी काय देव प्रसन्न होणार का?"
"अरे जर उंदीर त्रास देतो तर त्याला पकडून दुर सोडा पण जीव घेणे योग्य नाही."
"आणी मोरोपंता, रागाला आवरत जा, योग्य वेळेला राग येणे गरजेचे असले तरी शुल्लक गोष्टीवर राग करू नये."
मोरोपंत कधीही राग न करण्याचे प्राण करतात.
स्वामी म्हणतात: " अरे ह्या उंदीराला मनुष्य जन्म घेऊन आमची सेवा करायची आहे,
तो मनुष्य जन्म घेऊन आमची सेवा करेल तेव्हा त्याला मोक्ष मिळेल."
ही कहाणी ऐकुन पण नारायण शास्त्री स्वामी बद्दल अनादारानी बोलतात.
स्वामींच्या बद्दल अनादर दाखवल्या मुळे मोरोपंतांना जाम राग येतो पण ते कशे-बशे रागावर आवर घालतात.
नारायण शास्त्री  आपला पुढचा प्रवास करायला निघतात.

No comments:

Post a Comment