Sunday, September 18, 2011

(८४) ईश्वरीय देणगीचा बाजार मांडू नये

नारायण शास्त्रींना रस्त्यात एक महंत भेटतात. महंत त्यांना आपली कहाणी सांगतात.
त्रिविक्रम क्षेत्री नारायण सरोवराची फार प्रचीती होती.
त्यात आंघोळ केली तर मागच्या सात जन्माचे पापं फिटतात अशी मान्यता होती.
पण एका महंतांनी त्यावर आपला ताबा घेतला होता. सरोवरात आंघोळ करणाऱ्यांकडून तो कर घ्यायचा.
ज्यांना  कर देता येत नव्हता त्यांना तो सरोवराजवळ  फटकू सुद्धा देत नव्हता.
एकदा अशाच वृद्ध गरीब माणसाला तो गड्यानमार्फत हकलतो. तितक्यात स्वामी तिथे येउन त्याला जाब विचारतात.
महंत त्यांचाशी पण दुरुत्तर करतो.
स्वामी म्हणतात: " हम कोई कर नही देंगे और स्नान करेंगे."
स्वामी सरोवरा कडे जातात. महंताचे गडी त्यांना अडवणार त्याआधीच स्वामी अदृश्य होतात.
काही वेळानी महंत पाहतो तर काय , स्वामी चक्क सरोवराच्या  मधो-मध पाण्यावर बसले होते.
स्वामींच्या अधिकाराची प्रचीती महंताला येते. तो शरणागती पत्करतो.
स्वामी म्हणतात: " अरे ईश्वरानी बनवलेल्या सर्व काही, सर्वांचे  असते त्याच्यावर अधिकार गाजवू नये.
तीर्थस्थळी असा बाजार मांडुनलोकांचा छळ करू नये "
महंत आपली गादी बंद करतो. त्यानंतर नारायण तीर्थात कोणचेही कर आकारणे बंद झाले.
महंत पुढे स्वामी-संदेसचा प्रचार करायला लागला.

No comments:

Post a Comment