Sunday, September 18, 2011

(८५) रिकाम्या चिलीमीच दम

नारायण शास्त्री अक्कलकोट मध्ये मार्तंडाच्या मंदिर समोर येतात.
मंदिराचा  पुजारी त्यांना सांगतो अक्कलकोटची यात्रा या मंदिरापासूनच सुरु होते.
पुजारी या मागचे कारण सांगायला पूर्व-वृतांत सांगतो.
सोलापूर मधले चिंतोपंत टोळ यांचा  कडून स्वामी कुणालाही काही  न सांगता निघून जातात.
अक्कलकोटला ते मार्तंड मंदिरा समोर बसून राहतात. कुणी त्यांना काहीही आगत्याचे तर विचारात नाही उलट शंका-कुशंका करतात.
स्वामी ३ दिवस एकाच जागेवर बसून राहतात.
एक गावकरी गावाच्या  राखणदार अधिकारी अहमदला स्वामींना गावातून हकल अशे सांगतो.
अहमद येतो, स्वामी फक्त एका लंगोटीत होते, काही तरी असंबद्ध हातवारे करत होते.
अहमदला थट्टा-मस्करी करायची सुचते.
अहमद: " बाबाजी चिलीम पियोगे?"
स्वामी: "क्यो नही?"
अहमद स्वामींना अगदी खाली चिलीम देतो.
स्वामी त्या चिलीमीतुन  आर-पार पाहतात आणी मग हातावर आपटून त्यात असलेले काही तंबाखूचे कण सुद्धा काढून टाकतात.
मग दोनी हातांच्या पकड मध्ये चिलीम धरुन स्वामी चिलीमिचा दम मारतात, पाहता पाहता त्या रिकाम्या चिलीमी तुन धूर निघतो.
अहमद तर गारठून जातो.तो स्वामींची करुणा भाकतो.
अहमद: " आप तो औलिया हो !"
स्वामी विचारतात की चोळ्या कुठे राहतो.
अहमद त्यांना चोळप्पाच्या घरी नेतो.
स्वामी चोळप्पाच्या घरीच मुक्काम करतात.

No comments:

Post a Comment