Saturday, October 2, 2010

(10) राघव कीर्तनकार होतो


गोविद बुवा एक नावाजलेले कीर्तनकार होते.गोविन्द बुवाचा मुलगा मुका होता पण तो फार छान चित्र काढायचा.
त्यांना लोक विचारायचे कि त्यांचा कीर्तन-वारसा पुढे कोण चालवणार, मुलाबद्दल चे प्रश्न ऐकून ते निरुत्तर व्हायचे.
इकडे स्वामी म्हणतात-" चोळ्या ! पानाचे ४ विडे आण अणि नदीवरून कावड भरून आण."
चोळ्या म्हणतो-"स्वामी कावड तर पहिलेच भरून आणली आहे!"
स्वामी कावड उलटवून पाणी सांडतात आणि म्हणतात आता तर रिकामी आहे ना कावड?
"जशी आज्ञा" असं म्हणून चोळ्या नदीवर कावड भरायला जातात.
तिकडे मुलाला चित्र काढताना पाहून गोविंद बुवा जाम भडकतात आणि त्याला चोपतात. राघव ला आता आपण काठीनी चोपू असं म्हणून ते काठी आणायला जातात.
माराला भिवून राघव नदीवर जीव द्यायला जातो.पाण्यात उडी मारतो,बुडताना चोळप्पा त्याला वाचवतात आणि समजवून स्वामी कडे आणतात.
स्वामी राघव ला विडे खायला देतात त्यामुळे राघवला वाचा येते.राघव आपल्या वाणीनी स्वामींना धन्यवाद देतो आणि स्वताला स्वामीला वाहून देणार असं म्हणतो.
तो आपल्या वडिलांना हि सुखद बातमी सांगायला जातो. स्वामी त्याला आत्ता जायचं नाही असं सांगतात.
नदीवर आंघोळ करताना गोविंद बुवांना पुष्कळ लोकांच्या तोंडातून ऐकायला मिळतं कि कोणी तरुण उत्तम पैकी कीर्तन करणारा कीर्तनकार येतो आहे. ते कुतूहलानी मंदिरात जावून पाहतात तर त्यांना आश्चर्याचा धक्काच लागतो.
तिथे राघव उत्तम पैकी कीर्तन करत होता.
ते जावून त्याला मिठी मारतात.स्वामी अडवतात आणि म्हणतात त्याला गळे लावायचं नाही.
गोविंद बुवा म्हणतात -'माझा पुत्र आहे हो!"
स्वामी रागावतात -"याला वाईट बोलला,खूब चोपलं,आता का पुत्र म्हणतात ?"
गोविंद बुवा स्वामींची क्षमा मागतात.
स्वामी त्यानां राघवची माफी मागायला सांगतात.
राघव त्यांचेच पाया पडतो.स्वामी त्याचं कौतुक करून म्हणतात-"मुलावर आकांक्षा लादु नये.प्रत्येक मनुष्य वेगळा,त्याच्या ठायी वेगळे गुण असतात.
तुम्ही वाचेने कीर्तन करतात, राघव चित्रांनी कीर्तन करतो.
शहाणे व्हा. मुलाच्या कलेवर प्रेम करा."
गोविंदबुवा स्वामीची क्षमा मागतात.

No comments:

Post a Comment