Saturday, October 2, 2010

(12) धनाचे झाले कोळसे


वडिलांच्या मृत्युनंतर विनायक चे सावत्र भाऊ, गोपाल आणि मारुती, संपत्ती वाटणीची मागणी करतात.
सर्व वडिलोपार्जित संपत्तीचे तीन बरोबर वाटे करण्याचं ठरते.
विनायकची बायको,त्याला निम्मा वाटा घ्या, असं सांगते.
दोन्ही भाऊ या गोष्टीला तयार नसतात.

विनायक स्वामींना नवस करतो कि जर दोन्ही भाऊ त्याला निम्मा वाट देणार तर तो आपल्या वाट्यातला एक-चतुर्थांश स्वामींना देणार.

सरपंच येऊन, तिघा भावांना त्यांच्या वडिलांचं मृत्युपत्र देतात.
त्या प्रमाणे विनायकनी केलेली सेवे मुळे त्याला सर्व संपती चा निम्मा वाटा मिळावा, असा उल्लेख होता.
विनायकची बायको दरोडेखोरांच्या भीतीनी सर्व धन खोलीत पुरून ठेवायला सांगते.

विनायक एक-चतुर्थांश स्वामींना द्यायची गोष्ठ काढतो तेव्हा त्याची बायको साफ नकार देते.तिच्या मते सर्व आपल्याला नशिबामुळे प्राप्त झाले आहे स्वामींमुळे नाही,म्हणून स्वामींना काहीही द्यायची गरज नाही.विनायक मान्य करतो.

इकडे स्वामी म्हणतात- "गरज सरो आणि वैद्य मरो"!
" तुम्ही वचन देवून विसरला तरी भगवंताला त्याची आठवण असते."

स्वामी साधूचं रूप घेऊन विनायक कडे येतात.
विनायकच्या बायकोला सांगतात कि विनायकला स्वामींचे देणे लागते.
विनायकची बायको काही पण ऐकायला तैयार नसते.
स्वामी म्हणतात-" मी विनायक ला आठवण करून दिली आहे, आता पुन्हा सांगणार नाही."
विनायकची बायको,विनायकला स्वामींचा निरोप देत नाही.

विनायकच्या बायकोला गोदा नावाची स्त्री ,'दरोडेखोरांना अटक झाली',असा निरोप देते.
दरोडेखोरांची भीती नाही म्हणून ते जोडपं पुरलेले धन उरकून काढतात.
धनाच्या पोटलीत कोळश्याचे तुकडे निघतात.
विनायक बायकोला दम देऊन विचारतो कि साधू बाबा कशाला आले होते.
बायको खरं-खरं सांगते.
विनायक वैतागतो आणि म्हणतो कि स्वामिनी मला पण आठवण केली होती,हे सर्व स्वामींच्या अवकृपेनी झालं आहे.
ते स्वामींची माफी मागायला जातात.
स्वामी: "काय रे विनायक! आता कशाला आला, तेही जोडीनी?"
विनायक सांगतो-"सर्व धन हिरवलं गेले, धनाचे कोळसे झाले."
स्वामी:"उपरवाले ने दिया,और वापस ले लिया!"

विनायक: "स्वामी माफ करा."
स्वामी:"हे शहाणपण आत्ता सुचले!"
विनायक: "मी तुम्हाला म्हाझ्या वाट्याचा निम्मं देईन."
स्वामी:"आम्हाला लाळूच देतात, आमच्या कडे काही उपाय नाही"
"नशीबाचं खाता ना! आता नशिबाचे फळं भोगा,मी कशाला पाहिझे, उचापती करायला!"
निराश जोडपं परततं

स्वामी भक्तांना संबोधन करतात-"तुम्ही देवाची भक्ती करतात ,मनोकामनेसाठी नवस करतात, पण फळ मिळाले की, नवस विसरतात!"
"देवाला केलेला नवस विसरायचा नसतो तो पाळण्यासाठी असतो ".

No comments:

Post a Comment