Sunday, October 17, 2010

(27) स्वामींचं छायाचित्र

घोलप बुवा समाज सुधारक होते. ते कनिष्ठ जातींच्या लोकांना मंदिरात प्रवेश मिळवून द्यायचे.
त्या मुळे सर्व गावकरी चिडतात व त्यांचा कट काढण्याचं विचार करतात.
 आपल्या  कंपनीत  निर्मित केमेऱ्यानी स्वामींचे छाया चित्र घ्यायच्या विचारांनी,
कोडक कंपनीचे संचालक जॉन आपल्या सहायका बरोबर अक्कलकोटला येतात.
चोळप्पा त्यांचा मनोगत स्वामींना सांगतात, पण स्वामी चक्क नकार देतात.
जॉन, चोळप्पांना चिरमिरी देउन मदत मागतात.
चोळप्पा पुन्हा स्वामींना निवेदन करतात पण स्वामी पुन्हा फेटाळून लावतात.
मग चोळप्पा, जॉन ला स्वामींच्या नकळत फोटो घेऊ असं सुचवतात.
तिकडे गावकरी रात्री घोलप बुवांच्या घराला आग लावून देतात, स्वामींना अंतरज्ञानांनी हे कळतं.
ते वरुणदेवाला निवेदन करतात. वरुणदेव पावसाळा नसतांना पाऊस पाडतात. घराला लागलेली आग विझते.
गावकऱ्यांना आश्चर्य होतं. दुसऱ्या दिवशी घोलप बुवा आपल्या घरात जळक्या वस्तूंचे अवशेष पाहतात,
तितक्यात एक सन्यासी त्यांना अक्कलकोटला जायची सूचना करतात.
इकडे जॉन लपून स्वामींचं चित्र घेतात.पण छायाचित्र डेवलप करतांना प्रिंट बिघडतं.
दुसऱ्यांदा तसाच प्रयत्न करण्यात येतो,पण प्रिंट पुन्हा बिघडतं.
शेवटी स्वामींच्या इच्छेशिवाय आपण छायाचित्र घेऊ शकत नाही, असं जाणुन जॉन परतायचं ठरवतात.
जातांना शेवटचं स्वामी दर्शन घ्यायला येतात.
स्वामी म्हणतात-" काय रे जॉन! मिळालं का आमचं छायाचित्र? "
"अरे आम्ही चैतन्य आहो! आम्हाला एका चोखटीत कशे कैद करणार?,तेही आमच्या इच्छे विरुद्ध!"
जॉन प्रांजळपणे अपराध कबुल करुन परतायला निघतो."
तितक्यात प्रेमळ स्वामी म्हणतात-" जॉन! परत जातो आहे! "आमचं छायाचित्र नाही घेणार? "
स्वामींची परवानगी मिळाल्यावर जॉन पुन्हा छायाचित्र घेतो आणी या वेळेला स्वामींचं सुरेखसं छायाचित्र येतं.
घोलपबुवा अक्कलकोटला येतात, तेव्हा स्वामींकडून त्यांना सर्व खुलासा होतो.
स्वामी म्हणतात-" अरे सर्वांना जन्म देणारा देव भेद करत नाही, तरी हे माणसं भेद का करतात?"
"रामाची उपासना करतात पण त्या रामानी शबरीचे बोरं खाल्ले होते, हे कशे विसरतात ?"
"अरे तु समाज सुधारणा करतो, माणसातला भेद दुर करतो; आम्ही  तुझं रक्षण कसं नाही करणार?"
"आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे."

No comments:

Post a Comment