Saturday, October 2, 2010

(17) क्रांतिकारी फडके यांची गोष्ट



||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
बाळप्पांना फार दिवसा पासून पोटदुखीचा त्रास होता. अधून-मधून त्यांना तीव्र वेदना व्हायच्या.
बाळप्पा पोटदुखी मुले विव्हळत असतात चोळप्पा त्यांची विचारपूस करतात आणि "स्वामींना सांगा",असा सल्ला देतात.
बाळप्पा म्हणतात,सद्गुरूला भक्ताला वेदना व्हायच्या आधीपासून ज्ञान असतं,म्हणून स्वताहून सांगायची काहीही गरज नाही.
तितक्यात स्वामी हाका मारतात-" अरे चोळ्या,बाळ्या,कुठे आहा?"
बाळप्पा कसं-बसं पोट धरून उठून येतात..
चोळ्या ! आजकाल आमच्या सेवेत तुझ लक्ष्य नसतं, आमची आंघोळीची तयारी झाली का? चंदन कुठे आहे ?
चोळप्पा ,"तयारी झाली आहे" असं म्हणून स्वामींना आंघोळीला नेतात.
बाळप्पांना उभं सुद्धा राहवत नाही पण कसं -बसं ते पोट धरून स्वामींना आंघोळ घालतात.
पोटाच्या वेदना तीव्र झाल्यानी ,तांब्या हातातून गळुन पडतो आणि बाळप्पा जमिनीवर कोसळतात.
स्वामी विचारतात-"काय रे बाळ्या काय झालं?"
बाळप्पा कसं-बसं उत्तर देतात कि नाभी जवळ पोटदुखीचा त्रास आहे.
"बघू !" असं म्हणून स्वामी स्वामी पोटाला स्पर्श करतात.त्यानंतर स्वामी पोटाला न्याहाळतात . त्याचबरोबर बालाप्पांच्या पोटातून एक पुरचुंडी बाहेर पडते.
स्वामी-"चोळ्या ! बघ रे काय आहे?"
चोलाप्पा पाहून सांगतात कि हे निळ्या रंगाचं विष आहे.
बाळप्पा कधी विषप्राशन नाही केल्याच सांगतात.
स्वामी म्हणतात-"तुझ्या वर ३ वर्षा पूर्वी विषप्रयोग झाला होता.तुझा मृत्यू अटल होता. आम्ही तो थांबवला कारण तुझ्या भाग्यात सद्गुरुसेवेचं पुण्य होतं.
या जन्मानंतर तुला मोक्ष मिळणार."
बाळप्पा प्रेमाश्रू गाळत म्हणतात-" मी संसार करणार नाही आणि स्वामी सेवेतच आपलं आयुष्य काढणार."
काही वेळा नंतर,चोळप्पा कडे जेवणाची तैय्यारी असताना स्वामी उठून वटवृक्षा कडे जातात,कारण त्यांना अन्तरज्ञानांनी कळतं कि वासुदेव
बळवंत फडके भेटायला येत आहे.
क्रांतिकारी फडके यांनी इंग्रजा विरुद्द्ध बंड उभारला होता,व आपल्या प्रयत्नांना स्वामींचा आशीर्वाद मिळावा म्हणून अक्कलकोटला येतात.
स्वामींना परिचय देऊन ते आपला मनोगत सांगतात.
स्वामी म्हणतात-"हम जानते है | नेक काम है |"
फडके आपली तलवार समोर ठेऊन स्वामींनी स्पर्श करावं अशी विनवणी करतात.
स्वामी चोळप्पाला तलवारीला समोर झाडावर ठेव अस सांगतात आणि म्हणतात-"अभी वक्त नही है !"
फडके आपण माघार घेऊ शकत नाही अस सांगून,प्रयत्नाची शिकस्त सुरु ठेवतात.
पुढे त्यांना अटक होऊन तुरुंगात आमरण उपोषण करतांना देवाज्ञा होते.तो सन १८८३ होता, आणि स्वातंत्र्य १९४७ मध्ये लाभतं.

बोध: सद्गुरू ईश्वरी कार्य योजनेला पुढे नेण्या करता असतात ते त्यात हस्तक्षेप आणून   ईश्वरी कार्य योजनेच्या विरुद्ध जात नाही.

No comments:

Post a Comment