Saturday, October 2, 2010

(4) स्वामी नखाचे ताईत करुन विकणारा न्हावी

एक न्हावी दुसऱ्या लोकांची श्रीमंती बघून दु:खी व्हायचा.
 असमाधानी राहून , सुख प्राप्तीसाठी जास्त प्रयत्न  करत राहावे ,असं त्याचं मत होतं.
स्वामींच दर्शन करून तो त्यांचे नखं कापतो.
स्वामी त्याला परिवाराबद्दल प्रश्न  विचारतात .
न्हावी उत्तर देतो, जमेल तितकं मुला-बाळांचे हट्ट पुरवतो.
स्वामी म्हणतात: "भाग्यवान आहे तुझे मूलं-बाळ." .
मग अगदी केविळवाण्या स्वरात म्हणतात: "आमच्या कडे कोणी पाहत नाही, दोन वेळेचं जेवण मिळतं फक्त!"
"मोठे मोठे भक्त, गोष्ठी मात्र मोठ्या करतात, पण करत काही नाही !"
"आम्हाला पण सुख ऐश्वर्य, मिळायला नको का ?"
"आता विचार करतो कि महाराजांकडेच जाऊन राहवं."
"तुझ काय मत आहे ?"
"मी काय सांगू" असं म्हणून न्हावी थोडा ओशाळतो आणी परततो.
घरी जाऊन न्हावी बायकोला स्वामींच्या नखाची पुरचुंडी फेकायला देतो, पण त्याची
स्वामीभक्त पत्नी, संसारी लोकांच दुख दुर करण्यासाठी नखांचा वापर करू असं सुचवते.
ती म्हणते: "स्वामींच्या नखांच  ताईत करुन अडलेल्या-नडलेल्यान्ची मदत करू."
इकडे स्वामींकडे एक भट नावाचा एक व्यक्ती पोटदुखीनी बेजार होऊन येतो.
स्वामी त्याला मुरलीधराच्या मंदिराजवळ असलेल्या कडु लिंबाचा पाला खायला सांगतात.
पण त्या झाडाचे पानं कडू जहर असल्यानी भट बुवा खाऊ शकत नाही.
ते प्रांजळपणे स्वामींना कडू पाला खायची कुवत नाही, अशी कबुली देतात.
स्वामी भक्ता सह झाडाजवळ येतात, तिथे एका भक्ताला म्हणतात-
'पाह रे! पाला कडू आहे का?"
भक्त पाला चाखून, पाला फार कडू आहे, असं उत्तर देतो.
स्वामी मग स्वता होऊन एक फांदी तोडून भटबुवांना देतात.
भट बुवा त्या फांदीची पाने खातात आणी ती गुळासारखी गोड आहे, असं सांगतात.
मग म्हणतात : "स्वामी तुमच्या स्पर्शांनी कडू-जहर पाला गोड झाला, त्या बरोबर माझा पोटदुखीचा त्रास पण गेला.
आपल्या कृपे मुळे माझं कडू लिंबा सारखं आयुष्य धन्य झालं.

स्वामी नखाचे ताईत करुन विकणारा न्हावी भाग # २
न्हाव्याच्या शेजाऱ्याचा मुलगा तापांनी फणफणत होता.न्हाव्याची बायको त्याला स्वामीनखाचं ताईत देते.
विहीरी वर सावकाराची निपुत्रिक सुन जीव द्यायला येते. न्हाव्याची पत्नी तिला अडवते,समझुत घालुन एक ताईत देऊन
परतवते.
न्हाव्याचा एक लाकुडतोड्या मित्र सावकाराच्या कर्जात आकंठ डुबला होता. न्हावी त्याला पण एक ताईत देतो.
काही दिवसांनी लाकुडतोड्या न्हाव्याला बातमी देतो कि तुझ्या दिलेल्या ताईतानी तर माझे दिवसच फिरले.
सावकाराच्या सुनेला दिवस गेले व त्या आनंदात सावकारांनी सगळ्यांचे कर्जे माफ केले.
इकडे, बाळप्पा स्वामींना ताईता मुळे भक्तांना झालेले फायदे सांगतात.
स्वामी म्हणतात: "एक राज कि बात बताये !"
"भक्तांना फायदा नखामुळे नाही त्यांच्या विश्वासाच्या भावनेनी होतो "
तिकडे, लाकुडतोड्या मित्र न्हाव्याला सल्ला देतो कि तु ताईत फुकट न देता विक्रय करत जा ,
अशांनी तु श्रीमंत होणार.
न्हाव्याला पण ते पटतं.
मग काय,परमार्थात आपला स्वार्थ पाहिल्या मुळे ताईताची किमया जाते.
ताईत खरेदी करणारे लोकं फळ न मीळाल्या मुळे भडकतात आणी न्हाव्याला चोप देतात.
न्हावी त्या लोका पासून जीव वाचवत पळून स्वामी चरणी येऊन पडतो.
स्वामी मग त्याला चांगलीच समझ देतात- "अरे पहिले तुझी भक्ती आणी विश्वास पाहून , आम्ही तुझा शब्द
ठेवत होतो."
"पण तु स्वताच्या स्वार्थासाठी परमार्थाचा विक्रय करायला लागला."
"परिणाम काय? चोप मिळाला ना?"
"अरे काय कमी होती तुला ,सुज्ञ बायको आहे सोन्या सारखी मुलं आहे."
अरे दुसऱ्यांचा पैसा कशाला पाहतो?
"अरे प्रत्येकाला आप-आपल्या पूर्वकर्मानुसार देव प्रारब्ध देतो."
"भगवंताची सेवा करुन मनाची श्रीमंती प्राप्त कर."
"मनाची श्रीमंतीच खरी श्रीमंती आहे."
"तुझ्या बायको-मुलांना पाहून तुला क्षमा करतो , पुन्हा अशी चूक करू नको."

बोध: परमार्थात निज स्वार्थ साधू नये.  

No comments:

Post a Comment